शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
4
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
5
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
6
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
7
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
8
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
10
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
11
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
12
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
13
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
14
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
15
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
16
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
17
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
18
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
19
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
20
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या निवडणुकीच्या ना ना कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:48 IST

मिलिंद कुलकर्णी पहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या ...

मिलिंद कुलकर्णीपहिलटकरणीचे बाळंतपण कायमस्वरुपी स्मरणात राहणारे असते. पहिलटकरीण आणि माहेरची मंडळी या प्रसंगाचे साक्षीदार असतात. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या माहेरच्या माणसांमध्ये हा प्रसंग साजरा होत असल्याने वेदना सुसह्य होतात. माहेरची मंडळी घेत असलेली काळजी सुखवत असते. बहुदा असाच अनुभव निवडणुकीतील पहिल्यांदा लढणाऱ्या उमेदवाराला येत असावा. मित्रमंडळी, नातेवाईक निवडणूक लढविण्याचा आग्रह धरतात. निवडणुकीला आवश्यक असलेले सर्व गुण अंगी असल्याचे भासवितात. त्यामुळे स्वत: उमेदवारालाही काही दिवसांनी तसे वाटायला लागते. आजूबाजूची दोन-चार उदाहरणे सांगितली की, परिस्थिती अनुकूल वाटायला लागते. खिसा खुळुखुळू लागतो. मित्र सर्व प्रकारच्या सहाकार्याचे आश्वासन देतात. आणि उमेदवार शड्डू ठोकून तयार होतो. ग्रामीण भागात याला अगदी समर्पक शब्द आहे, ‘घोड्यावर बसविणे’. तुम्ही घोडेस्वार आहात काय, तुम्हाला घोड्यावर मांड ठोकणे जमते काय, घोड्याला ताब्यात ठेवता येते काय, याचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता मित्र, नातलगांच्या सहकार्याने घोड्यावर बसतो तर खरे, पण पुढे ज्या वेदना होतात. घोडा ऐकत नाही, रस्ता कळत नाही. मदतीला धावून येणारे केव्हाच गायब झालेले असतात. तेव्हा घोडामैदान जवळ असले तरी ते क्षितीजापल्याड असल्याचा भास होतो, हे सगळे पहिल्या निवडणुकीत घडत असते. असा अनुभव प्रत्येकाने घेतला असतो. पुढे अनुभवाचे शहाणपण येते. आणि निवडणुकांना निर्भयपणे, समंजसपणे सामोरे जायला लागतो. पण ही पहिली निवडणूक कायमस्वरुपी स्मरणात राहते, असा बहुसंख्य उमेदवारांचा अनुभव असतो.२००९, २०१४ या दोन निवडणुकांचा आढावा घेतला तर लक्षात येते की, पहिल्यांदा निवडणूक लढवून जिंकणारे नंतर दुसºया निवडणुकीत मात्र पराभवाची चव चाखताना दिसतात. आता यशाची हवा डोक्यात गेली की, विकास कामांवर भरोसा असताना मतदारांना तो जाणवला नाही, कारण काहीही असो. विजय रथ जमिनीवर आलाच.२००९ च्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे तब्बल ४ उमेदवार पहिल्यांदा विजयी झाले. माजी महापौर गुलाबराव देवकर हे नवनिर्मित जळगाव ग्रामीणमधून, नंदुरबारचे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे शालक जगदीश वळवी चोपड्यातून, माजी आमदार ओंकार वाघ यांचे पूत्र दिलीप वाघ हे पाचोºयातून, माजी नगराध्यक्ष अनिलदादा देशमुख यांचे पूत्र राजीव देशमुख चाळीसगावातून तर राजवडचे साहेबराव पाटील हे अमळनेरातून पहिल्यांदा निवडून आले. साहेबराव पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. याचवेळी काँग्रेसतर्फे रावेरमधून शिरीष मधुकरराव चौधरी तर शहाद्यामधून अ‍ॅड.पद्माकर वळवी विजयी झाले. डॉ.गावीत यांचे बंधू शरद गावीत हे समाजवादी पक्षातर्फे नवापुरातून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव केला. असाच धक्कादायक पराभव माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा धुळे ग्रामीण या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा.शरद पाटील यांनी केला.२०१४ मध्ये ९ आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. सगळ्यांचा पराभव झाला. यावर्षी भाजपतर्फे उदेसिंग पाडवी (शहादा), सुरेश भोळे (जळगाव शहर), उन्मेष पाटील (चाळीसगाव), काँग्रेसतर्फे कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), शिवसेनेतर्फे प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), किशोर पाटील (पाचोरा), अपक्ष शिरीष चौधरी (अमळनेर) हे निवडून आले. या ७ पैकी उन्मेष पाटील हे खासदार झाल्याने रिंगणात नाहीत. तर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या निवडणूक लढवत आहेत. अमळनेरचे शिरीष चौधरी हे यंदा भाजपचे उमेदवार आहेत.२०१९ मध्ये पहिल्यांदा भविष्य अजमावणाºया प्रमुख उमेदवारांमध्ये राजेश पाडवी (शहादा), भरत गावीत व शिरीष नाईक (नवापूर), ज्ञानज्योती भदाणे (धुळे ग्रामीण), हिलाल माळी (धुळे शहर), जगन सोनवणे (भुसावळ), पुष्पा महाजन (जळगाव ग्रामीण), मंगेश चव्हाण (चाळीसगाव), रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या भवितव्याचा फैसला २४ रोजी होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव