शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

चेहरा वाचता येणे गरजेचे !

By किरण अग्रवाल | Published: November 09, 2017 7:31 AM

चेहरा वाचता येतो, असे नेहमी म्हटले जाते. बव्हंशी ते खरेही असते. कारण चेहरा कसाही असो, त्यावरील भाव बरेच काही बोलून जाणारे असतात.

चेहरा वाचता येतो, असे नेहमी म्हटले जाते. बव्हंशी ते खरेही असते. कारण चेहरा कसाही असो, त्यावरील भाव बरेच काही बोलून जाणारे असतात. आपापल्या आकलनानुसार ते भाव समजणे अगर जाणता येणे म्हणजेच चेहरा वाचता येणे. चेहरा व त्यावरील किंवा त्यामागील मुखवटा ओळखणे त्यामुळेच तर शक्य होते. पण हे चेहरा वाचन सर्वांनाच जमते असे नाही. जेव्हा ते जमत नाही किंवा चेहरा वाचता येत नाही, तेव्हा ठोकर खाणे स्वाभाविक ठरते. चेह-यांचे पुस्तक, म्हणजे ‘फेसबुक’च्या माध्यमातून ओळख-परिचय घडून आलेल्यांमध्ये फसवणुकीचे, गंडवणुकीचे वा बदनामी केल्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत ते त्यामुळेच. सोशल माध्यमांवरचे मित्र कितीही सज्ञान वा उच्चशिक्षित असले तरी, ते या चेहरे वाचनात अपयशीच ठरत असल्याचे या घटनांतून अधोरेखित होणारे आहे.

भ्रमणध्वनी व सोशल माध्यमांनी जग जवळच नव्हे तर मुठीत आणले आहे हे खरे, त्यातून माणूस नको तितका ‘सोशल’ झाला. अगदी गावातली किंवा गावाजवळचीच नव्हेे तर दूरदेशीची, दुरान्वयानेही कधी काही संपर्क-संबंध नसलेली व्यक्तीही फेसबुकसारख्या सोशल माध्यमावर परस्परांशी मैत्रीचे आवतण देण्यास व आलेले निमंत्रण स्वीकारण्यास आसुसलेली दिसून येते. खरा आहे की खोटा, याची फारशी फिकीर न बाळगता किंवा खात्री करून घेण्याच्या भानगडीत न पडता स्क्रीनवरचा चेहरा पाहून या माध्यमांवर अनेकांची मैत्री जुळते. मैत्रीतून ओळख, संपर्क, भेटीगाठी असे एकेक टप्पे ओलांडत विश्वासाची पातळी जेव्हा गाठली जाते, तेव्हा काहींचे हे मैत्रीचे बंध नात्यांमध्ये परिवर्तित होतात. काही जण त्यातून उद्योग-व्यवसायाच्या, भागीदारीच्या संधी शोधतात. यात ‘स्क्रीन’च्या माध्यमातून पुढे आलेला चेहरा नीट वाचता आला तर चांगले काही घडते. ‘फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्री जुळली अन् नंतर जुळल्या रेशीमगाठी’, सोशल माध्यमामुळे लाभला आधाराचा हात; यासारखे प्रकार त्यामुळे वाचावयास मिळतात. परंतु चेहरा वाचता आला नाही तर फसवणूकही घडून आल्याखेरीज राहात नाही. शिवाय काही प्रकरणांत बदनामीस सामोरे जावे लागून मनस्ताप सहन करण्याची वेळ येते. आता अशा सोशल माध्यमांद्वारे ओळख वाढवून गंडविले गेल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने या माध्यमांचा वापर सावधपणे केला जाणे गरजेचे ठरून गेले आहे.

हल्ली ‘कॅशलेस’ व्यवहार वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले जात असताना दुसरीकडे तांत्रिक पद्धतीने किंवा आॅनलाइन फसवणुकीचे प्रकार घडून येऊ लागले आहेत. मुंबई, पुणेपाठोपाठ नाशकातही अशा स्वरूपाच्या घटना वरचेवर घडू लागल्याने खास ‘सायबर पोलीस ठाणे’ स्थापले गेले आहेत. यातच आता फेसबुक फ्रेंडशिप व चॅटिंगच्या माध्यमातून जवळीकता साधत फूस लावण्याचे व गंडविण्याचे प्रकार समोर येत आहेत. देशातील सायबर गुन्ह्यात महाराष्ट्र अव्वल असून, ‘सायबर दहशतवादा’चेही प्रकार येथे घडू लागले आहेत. नाशकातले उदाहरण घ्या, येथे सायबर पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर मे २०१७ पासून आतापर्यंत, म्हणजे ६ महिन्यात असे ३१ गुन्हे नोंदविले गेले असून, यात फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून फसवणूक व बदनामी केली गेल्याच्या १० गुन्ह्यांचा समावेश आहे. कॅन्सरसाठी औषध देतो असे सांगून फेसबुक फ्रेण्ड्सची सहानुभूती मिळवणाºया व नंतर त्यांच्याकडून पैसे उकळणाºया एका नायजेरीयन तरुणास मागे अटक केली गेली होती, तर व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क वाढवून अश्लील संदेश पाठविणाºयास राजस्थानातून पकडून आणले होते. आता एका टीव्ही मालिकेत काम करणाºया अभिनेत्रीशी फेसबुकवरून ओळख वाढवून, ब्रिटनमध्ये हॉटेल सुरू करण्याचे आमिष दाखवत ठाणे येथील एका तरुणाने सुमारे अडीच लाख रुपयांस तिला लुबाडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्थात, हे प्रकार यापुढील काळातही वाढणारच आहेत. कारण इंटरनेटवर टाइमपास करणाºयांची संख्या ४५ कोटींपेक्षा अधिक असून, २०२१ पर्यंत ती सुमारे ८० कोटींहून अधिक होण्याचा अंदाज न्यूज १८ लोकमत वृत्तवाहिनीने अलीकडेच वर्तविला आहे. त्यातून सायबर क्राइम वाढणे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा, प्रश्न आहे तो चेहरा वाचता येण्याचा. आपण परिचयातल्या, नातेसंबंधातल्या व प्रसंगी घरातल्या व्यक्तींशी तुसडेपणाने किंवा त्रयस्थपणे वागतो आणणि अनोळखींशी मात्र मैत्री वाढवतो. अशा मैत्रीत चेहरा वाचता येत नसेल तर धोका अगर अपघात टाळता येणे शक्यच नसते. ‘आ बैल मुझे मार’ या प्रकारात बसणारेच आहे हे सारे. पण, हे लक्षात घेणार कोण? त्यासाठी शासनाच्या चावडी वाचन योजनेप्रमाणे चेहरा वाचन कार्यक्रम राबविण्याची किंवा तसे प्रशिक्षण देण्याची गरज भासावी इतके हे प्रमाण वाढू पाहते आहे. तेव्हा सावधानता बाळगलेलीच बरी !

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया