शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सतर्कता गरजेची!

By admin | Updated: February 15, 2017 00:26 IST

देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. रेल्वेला अलीकडे मात्र कुणाची तरी नजर लागली

देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. रेल्वेला अलीकडे मात्र कुणाची तरी नजर लागली आणि अपघातांची मालिकाच सुरू झाली. यातील काही अपघात तांत्रिक कारणांमुळे घडले, तर काही अपघातांमागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येते. वर्षभरापूर्वी कानपूर येथे झालेला भीषण रेल्वे अपघात हा घातपाताचा प्रकार होता, यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. या दुर्घटनेतील प्रमुख संशयित समशूल होडा हा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा कथित एजंट आहे. कानपूर रेल्वे अपघातामागे समशूलचा हात असल्याचे एका गुन्हेगाराची चौकशी करताना पुढे आल्यापासून तो तपास यंत्रणेच्या ‘रडार’वर होता. गत सोमवारी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर समशूलच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्या चौकशीतून सत्य काय ते समोर येईलच! गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातही रेल्वगाड्यांना घातपात करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून झाल्याचे समोर आले आहे. दिवा रेल्वे स्थानकानजीक रेल्वेमार्गावर मोठी लोखंडी सळई ठेवल्याचे लक्षात येताच, रेल्वे चालकाने सावधानतेने संभाव्य अपघात टाळला. अकोला जिल्ह्यातही रेल्वे मार्गावर मोठा दगड ठेवून अकोला-वाशिम इंटरसिटी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनांची शाई वाळते न वाळते, तोच शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेरवाडी ते ओढा दरम्यान रेल्वे रुळांवर १५ किलो वजनाचा सीमेंटचा दगड ठेवून हावडा-कुर्ला एक्स्प्र्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने ती घटनाही टळली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दगड ठेवण्यात आला होता, तेथून जवळच वीस फूट उंचीचा पूल होता. काही विपरीत घडले असते तर... या कल्पनेनेच अंगावर शहारे उभे राहतात. मुंबई, ठाणे, अकोला आणि नाशिक येथील या घटनांमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या घटना अत्यंत गंभीर असून, त्यामागील प्रवृत्तींचा शोध घेणे हे तपास यंत्रणांसमोर आव्हानच आहे. या घटनांमागे समाजकंटकांचा हात आहे, की केवळ काहीतरी करायचे म्हणून टवाळखोरांनी केलेली कृत्ये आहेत, हे तपासण्याची जबाबदारी तपास यंत्रणांची आहेच; पण सोबतच रेल्वेमार्गांलगत वास्तव्य असलेल्या नागरिकांनी, रेल्वेमार्गांलगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती संशयास्पद स्थितीत रेल्वे मार्गालगत आढळल्यास, पोलिसांशी संपर्क साधून नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडायला हवे, तरच अशा प्रवृत्तींना पायबंद घालणे शक्य होईल.