शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

इतका बदल कशामुळे? वर्षभरापूर्वी भाजपसोबत गेलेले अजित पवार आता भाजपलाच अंगावर का घेताहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 06:59 IST

अजितदादांनी बरेच महिने मौन बाळगले होते; पण विधिमंडळ अधिवेशनात वेगळेच दादा जाणवले. सरकारवरची प्रत्येक टीका ते अंगावर घेताना जाणवले.

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत२३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने पहाटेचा शपथविधी केला होता. मोठ्या साहेबांनी डाव उलटवला. महाविकास आघाडीचं सरकार आलं. अजितदादा इकडेही उपमुख्यमंत्री झाले; पण बरेच महिने त्यांनी एक गूढ मौन बाळगलं होतं. राज्य सरकारसाठी अडचणीचा विषय असला तरी ते बोलण्याचं टाळत. आपलं काम भलं की आपण भलं असं सुरू होतं; पण विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात वेगळेच दादा जाणवले. सरकारवर होणारी प्रत्येक टीका ते अंगावर घेताना दिसले. सभागृहातही आणि सभागृहाबाहेरही. ‘बदले बदले से नजर आते हैं अजितदादा’ असं नक्कीच म्हणता येईल. एका पहाटे भाजपबरोबर गेलेल्या अजितदादांनी, परवा विधानसभेत भाजपलाच सुनावलं की, येत्या चार महिन्यांत आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील ते तुम्हाला कळणारही नाही. हा मोठा बदल आहे. अजितदादांचं काही वेगळं तर चाललं नाही ना याची चाचपणी अधूनमधून होतच असेल. अदृश्य हातांचे सीसीटीव्ही कॅमेरे त्यांच्यावर असतीलच. अशी चाचपणी करणाऱ्यांचं टेन्शनही त्यांनी कमी केलं.  फडणवीस हे दादांचा वीकपॉइंट, पण यावेळी त्यांनी फडणवीसांनाही सोडलं नाही. बदललेली परिस्थिती त्यांनी स्वीकारलेली दिसते. आता चमत्कार होण्याची शक्यता नाही वा त्यांची इच्छा किंवा क्षमता नाही म्हणून की काय सरकारचा आक्रमक चेहरा बनण्याचा त्यांचा मानस दिसतो. दादा आक्रमक झाले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील भार तर हलका होईलच; पण सरकार मजबूत व्हायलाही मदत होईल.  भूकंपाचा एक केंद्रबिंदू असतो, दादा आतापर्यंत तसेच वाटत होते; पण आता ते नव्या मोडमध्ये गेले आहेत. त्यांचा नवीन पवित्रा पाहून वर्षभरापूर्वी फडणवीसांसोबत शपथ घेणारे हेच का ते दादा, असा प्रश्न पडला. एक शेर आठवला, ‘कुछ बदले बदले से उनके तेवर नजर आ रहे हैं, वह भूल गए हैं, या...! भुलाने की कोशिश किए जा रहे हैं!’ 

फडणवीस-मुनगंटीवार गट्टी! देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनंगटीवार यांची गट्टी झालेली दिसते. म्हणजे आधी कट्टी वगैरे नव्हती; पण दोघे अगदी धरम-वीरची जोडीही नव्हते. दोन दिवसांच्या अधिवेशनात दोघांचं गणित जमल्याचं दिसलं. पुरवणी मागण्यांवरील भाषणाला सुरुवात सुधीरभाऊंनी केली. दोघांनी तेंडुलकर-सेहवागसारखी बॅटिंग  केली.  सत्ता पक्षावर तुटून पडले. दोघांचं काहीतरी ठरलंय वाटतं. सोबत किल्ला लढवला तर दोघांचाही फायदा आहे हे दोघांना कळलेलं दिसतं. नागपुरात गडकरी-फडणवीस असे गट असल्याचे चित्र अधिक गडद होत असताना गडकरींचे निकटवर्ती असलेल्या सुधीरभाऊंचं ट्युनिंग फडणवीसांशी जुळत असेल तर तो पक्षाला मोठा दिलासा आहे. 
साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना पॅकेज देण्यासाठी देवेंद्र फडणवीस मध्यंतरी साखर कारखानदारांचं शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत अमित शहांना भेटले होते. त्याचा फायदा झाला. ३५०० कोटींची मदत मिळाली. राज्यातील साखर कारखान्यांना जवळपास सोळाशे कोटी रुपये मिळतील. भाजपसोबत असलेल्या साखर कारखानदारांना राज्यात सत्ता नसतानाही सांभाळून ठेवण्यासाठी ही मदत म्हणजे टॉनिक आहे. भाजपमध्ये राहूनही साखर कारखानदारीचे प्रश्न सुटू शकतात हा विश्वास फडणवीस यांनी या निमित्तानं दिला.मेट्रोचं कारशेड आरेमध्येच व्हावं असा फडणवीसांचा आग्रह होता. मुख्यमंत्री ठाकरेंनी ते कांजूरमार्गला हलविलं, पण उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं सरकारला दणका बसला, फडणवीस जिंकले. ते काहीही असो मुंबईचा विकास हरता/थांबता कामा नये. आम्ही म्हणतो तिथे तुम्ही कारशेड होऊ देत नसाल तर तुमच्या बुलेट ट्रेनच्या छातीवर आम्ही कारशेड आणतो ही विकास थांबविण्याची स्पर्धा बरी नाही.मुख्य सचिवपदी कोण?राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार फेब्रुवारीत निवृत्त होत आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे हे नवे मुख्य सचिव असतील असे म्हटले जाते. सध्या युनोमध्ये जबाबदारी सांभाळत असलेले प्रवीणसिंह परदेशी हेही या पदासाठी इच्छुक आहेत म्हणतात. ख्रिसमसनंतर जवळपास वीस दिवस ते मुंबईत आहेत. लॉबिंग होईल असे दिसते. संजय कुमार यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. ते महारेराचे प्रमुख म्हणून जाऊ शकतात. अर्थात तेथे आर.ए. राजीव त्यांचे स्पर्धक असतील. एमएमआरडीएचे आयुक्त असलेले राजीव हेही फेब्रुवारीत निवृत्त होताहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता सेंट्रल इलेक्ट्रीसिटी कमिशनचे चेअरमन म्हणून दिल्लीत जाताहेत अशीही जोरदार चर्चा आहे, पण मुख्यमंत्री त्यांना सोडतील असं वाटत नाही.माहिती आयुक्त कधी मिळतील?राज्यात माहिती अधिकाराची द्वितीय सुनावणीची ५१ हजार प्रकरणे आणि ८ हजार तक्रारी विविध माहिती आयुक्त कार्यालयांमध्ये सध्या प्रलंबित आहेत. माहिती अधिकाराच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतची उदासीनता त्यातून दिसते. माहिती आयुक्तांची तीन पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत ती भरण्यासाठी सर्च कमिटीने तीन महिन्यांपूर्वीच शासनाकडे डझनभर नावे पाठविली. त्यातून तिघांची निवड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते या तिघांच्या उच्चाधिकार समितीला करायची आहे; पण त्याचा मुहूर्त अद्याप सापडत नाही. माहिती आयुक्त कधी नेमणार यासाठीच माहिती अधिकार वापरण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल! काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठे बदल होऊ शकतात. मुंबई काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळेल. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवा चेहरा दिला जाऊ शकतो. एका बड्या नेत्यानं परवा छातीठोकपणे सांगितलं की, काँग्रेसच्या दोन-तीन मंत्र्यांची खाती बदलली जातील. काँग्रेसमध्ये तडकाफडकी काही होत नसतं; पण, कुछ तो पक रहा हैं. सहज सुचलं : एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरनं फिरणाऱ्या मंत्र्यांची सध्या फार चर्चा आहे. या चर्चेमुळे वादळ निर्माण होण्याआधी अशा हवाईसफारीचा मोह कुटुंबासह आवरलेला बरा. आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत त्याच खात्याशी संबंधित कंपनीचे हेलिकॉप्टर वापरले तर ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’चा मुद्दा होईल हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार