शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘नाथा’ची फेसाटी ‘बाळा’च्या खांद्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:13 IST

विक्रेत्यांशी थेट संपर्क साधून पुस्तकविक्रीचे जाळे विणण्याच्या जमान्यात, गावोगावी डोक्या-खांद्यावर पुस्तके नेत पायपीट करणारा बाळासाहेब घोंगडेंसारखा प्रकाशक दुर्मीळच म्हणायला हवा.

- संजय वाघविक्रेत्यांशी थेट संपर्क साधून पुस्तकविक्रीचे जाळे विणण्याच्या जमान्यात, गावोगावी डोक्या-खांद्यावर पुस्तके नेत पायपीट करणारा बाळासाहेब घोंगडेंसारखा प्रकाशक दुर्मीळच म्हणायला हवा. चांगला लेखक प्रकाशकाला बळ देतो तर चांगला प्रकाशक लेखकाला संधी देतो. साहित्य व्यवहारात हे नाते खूप महत्त्वाचे आहे. काही जण व्यवहाराच्या पलीकडे जाऊन या नात्याकडे पाहतात. हे नाते जपतात. असेच काहीसे सध्या युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे आणि प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांच्याबद्दल म्हणता येईल.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कुडाच्या घरात राहणारा नवनाथ गोरे या युवकाच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला सन २०१८चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होताच एका रात्रीत तो उजेडात आला. जगण्यासाठी आणि शिक्षणासाठी मेंढ्या वळणे, गवंड्याच्या हाताखाली बिगारी, एटीएम सेंटरवर सिक्युरिटी गार्ड अशा विविध भूमिका पार पाडत नवनाथने एम.ए., बी.एड.पर्यंतचे शिक्षण मित्र व मार्गदर्शकांच्या साहाय्याने पूर्ण केले. मित्राच्या सल्ल्यानेच नवनाथने शिक्षणापर्यंतचा प्रवास कागदावर साकारला. ते लिखाण व्यासंगी समीक्षक प्रा. डॉ.रणधीर शिंदे यांना दाखविले. त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनंतर दुष्काळग्रस्त भागातील पशुपालक समाजाच्या जीवनातील जळजळीत सत्य सुंबरानच्या आख्यानरूपात ‘फेसाटी’ बनून वाचकांसमोर आणले. सुरुवातीला काहीशा दुर्लक्षित असलेल्या ‘फेसाटी’ची डॉ. राहुल पाटील व डॉ. आशुतोष पाटील या समीक्षकांनी उचित दखल घेतल्याने पुन्हा ती चर्चेत आली. नवोदितांचे साहित्य गांभीर्याने न वाचता ते नाकारल्याची आजवर अनेक उदाहरणे आहेत. त्या साहित्यकृतीला यश मिळाल्यानंतर मान्यवर प्रकाशक त्या लेखकाकडे आगामी आवृत्त्या व अन्य लेखन प्रकाशित करण्यासाठी पाठपुरावा करतात. तसा अनुभव नवनाथच्याही वाट्याला आला; परंतु स्वामित्वधनाच्या मोठमोठ्या आकड्यांना नवनाथने धुडकावून लावत मित्र व पाठीराखा असलेल्या अक्षरवाङ्मय प्रकाशनच्या घोंगडे यांना पुढील आवृत्त्यांचे अधिकार दिले. घोंगडे यांनी नव्या रूपात बाजारात आणलेल्या ‘फेसाटी’चा गठ्ठा खांद्यावर घेऊन महाराष्टÑभर पायपीट सुरू केली आहे. केवळ स्वत:चीच नव्हे, तर अन्य प्रकाशकांची पुस्तकेही ते गावोगावी नेतात. त्यांच्या जिद्दीचे, साहित्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचे व अभिनवतेचे सर्वत्र कौतुक होत असल्याने ‘फेसाटी’ची दुसरी आवृत्ती अवघ्या चार दिवसात संपली. डॉ. दत्ता घोलप यांच्यासारखे मार्गदर्शक मित्र त्यांचे नीतिधैर्य उंचावत आले आहेत. त्यामुळेच कसदार साहित्यनिर्मिती करणाऱ्यांचा शोध घेऊन ते आपल्या परीने ‘अक्षरपेरणी’ करीत आहेत. प्रकाशन क्षेत्रात काळाची पावले ओळखून जे प्रवाहासोबत चालत राहिले, ते स्थिरस्थावर झालेत. त्यांनी मात्र नवोदितांना नाउमेद करण्यापलीकडे काहीही दिले नाही. अशा वातावरणात बाळासाहेब घोंगडे, सुशील धसकटे व घनश्याम पाटील आदी लेखक /प्रकाशक आजही पाय घट्ट रोवून उभे आहेत.