शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

‘नाथा’ची फेसाटी ‘बाळा’च्या खांद्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:13 IST

विक्रेत्यांशी थेट संपर्क साधून पुस्तकविक्रीचे जाळे विणण्याच्या जमान्यात, गावोगावी डोक्या-खांद्यावर पुस्तके नेत पायपीट करणारा बाळासाहेब घोंगडेंसारखा प्रकाशक दुर्मीळच म्हणायला हवा.

- संजय वाघविक्रेत्यांशी थेट संपर्क साधून पुस्तकविक्रीचे जाळे विणण्याच्या जमान्यात, गावोगावी डोक्या-खांद्यावर पुस्तके नेत पायपीट करणारा बाळासाहेब घोंगडेंसारखा प्रकाशक दुर्मीळच म्हणायला हवा. चांगला लेखक प्रकाशकाला बळ देतो तर चांगला प्रकाशक लेखकाला संधी देतो. साहित्य व्यवहारात हे नाते खूप महत्त्वाचे आहे. काही जण व्यवहाराच्या पलीकडे जाऊन या नात्याकडे पाहतात. हे नाते जपतात. असेच काहीसे सध्या युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे आणि प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांच्याबद्दल म्हणता येईल.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कुडाच्या घरात राहणारा नवनाथ गोरे या युवकाच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला सन २०१८चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होताच एका रात्रीत तो उजेडात आला. जगण्यासाठी आणि शिक्षणासाठी मेंढ्या वळणे, गवंड्याच्या हाताखाली बिगारी, एटीएम सेंटरवर सिक्युरिटी गार्ड अशा विविध भूमिका पार पाडत नवनाथने एम.ए., बी.एड.पर्यंतचे शिक्षण मित्र व मार्गदर्शकांच्या साहाय्याने पूर्ण केले. मित्राच्या सल्ल्यानेच नवनाथने शिक्षणापर्यंतचा प्रवास कागदावर साकारला. ते लिखाण व्यासंगी समीक्षक प्रा. डॉ.रणधीर शिंदे यांना दाखविले. त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनंतर दुष्काळग्रस्त भागातील पशुपालक समाजाच्या जीवनातील जळजळीत सत्य सुंबरानच्या आख्यानरूपात ‘फेसाटी’ बनून वाचकांसमोर आणले. सुरुवातीला काहीशा दुर्लक्षित असलेल्या ‘फेसाटी’ची डॉ. राहुल पाटील व डॉ. आशुतोष पाटील या समीक्षकांनी उचित दखल घेतल्याने पुन्हा ती चर्चेत आली. नवोदितांचे साहित्य गांभीर्याने न वाचता ते नाकारल्याची आजवर अनेक उदाहरणे आहेत. त्या साहित्यकृतीला यश मिळाल्यानंतर मान्यवर प्रकाशक त्या लेखकाकडे आगामी आवृत्त्या व अन्य लेखन प्रकाशित करण्यासाठी पाठपुरावा करतात. तसा अनुभव नवनाथच्याही वाट्याला आला; परंतु स्वामित्वधनाच्या मोठमोठ्या आकड्यांना नवनाथने धुडकावून लावत मित्र व पाठीराखा असलेल्या अक्षरवाङ्मय प्रकाशनच्या घोंगडे यांना पुढील आवृत्त्यांचे अधिकार दिले. घोंगडे यांनी नव्या रूपात बाजारात आणलेल्या ‘फेसाटी’चा गठ्ठा खांद्यावर घेऊन महाराष्टÑभर पायपीट सुरू केली आहे. केवळ स्वत:चीच नव्हे, तर अन्य प्रकाशकांची पुस्तकेही ते गावोगावी नेतात. त्यांच्या जिद्दीचे, साहित्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचे व अभिनवतेचे सर्वत्र कौतुक होत असल्याने ‘फेसाटी’ची दुसरी आवृत्ती अवघ्या चार दिवसात संपली. डॉ. दत्ता घोलप यांच्यासारखे मार्गदर्शक मित्र त्यांचे नीतिधैर्य उंचावत आले आहेत. त्यामुळेच कसदार साहित्यनिर्मिती करणाऱ्यांचा शोध घेऊन ते आपल्या परीने ‘अक्षरपेरणी’ करीत आहेत. प्रकाशन क्षेत्रात काळाची पावले ओळखून जे प्रवाहासोबत चालत राहिले, ते स्थिरस्थावर झालेत. त्यांनी मात्र नवोदितांना नाउमेद करण्यापलीकडे काहीही दिले नाही. अशा वातावरणात बाळासाहेब घोंगडे, सुशील धसकटे व घनश्याम पाटील आदी लेखक /प्रकाशक आजही पाय घट्ट रोवून उभे आहेत.