शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

मंत्र, तंत्र आणि यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:49 PM

जामनेरच्या दोघांनी मतदान यंत्र हॅक करण्यासाठी पैसे घेतल्याची तक्रार करीत पराभूत उमेदवार जामनेरला येऊन धडकले. त्यामुळे मंत्र, तंत्र आणि यंत्रात पारंगत असलेला पक्षच २०१९ चा सत्ताधारी राहणार हे मात्र निश्चित आहे.

मिलिंद कुलकर्णी२०१९ हे वर्ष भारताच्या दृष्टीने महत्वाचे वर्ष आहे. पंचवार्षिक निवडणुका होणार असल्याने या वर्षाचे महत्त्व अधोरेखित होते. महाराष्टÑासारख्या प्रगत राज्याची विधानसभेची निवडणूकदेखील याच वर्षात होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, प्रशासकीय यंत्रणा, प्रसार माध्यमे आणि जनसामान्यांना या निवडणुकांविषयी उत्सुकता कायम राहणार आहे.२०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश आणि भाजपाला पराभवाचा धक्का बसल्याने लोकसभा निवडणुकीत काय होईल, याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. तत्पूर्वी झालेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्वांचलातील छोटी राज्ये यात भाजपाने दणदणीत यश मिळविल्याने भाजपा आणि मोदींना २०१९ ला काहीच धोका नाही, असे म्हटले जात होते. भाजपाचा मंत्र होता, ‘काँग्रेसमुक्त भारत’. पण भारतीय मतदार किती हुशार, चाणाक्ष आणि समजदार आहे, याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. तो २०१८ च्या मावळतीला आला.कोणताही पक्ष आणि नेता जनतेला गृहित धरु लागला की, त्याला जमिनीवर आणण्यात भारतीय मतदार कधी चुकत नाही. मग ती आणीबाणी, जनता सरकारचा प्रयोग, पुलोद आणि कॉंग्रेसमुक्त भारताचा नारा असो..असे घडलेले आहेच.काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला होता. विरोधकांनी त्याला ‘गरीब हटाव’ असा काँग्रेसचा मंत्र असल्याची टीका केली होती. ‘जय जवान, जय किसान’ हा लालबहादूर शास्त्री यांचा नारा प्रसिध्द आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुभाषचंद्र बोस यांचा ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा’ हा नारा अनेकांना क्रांती कार्यात सहभागी होण्यास प्रेरक ठरला. महात्मा गांधीजींचा ‘चले जाव’चा नारा निर्णायक ठरला. हा इतिहास पाहता भारतीय जनता ही एखादी घोषणा, मंत्राला भारावते असेच चित्र आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाने ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. ही घोषणा जनतेला आवडली. परंतु, पाच वर्षात त्या घोषणेवरुन भाजपा आणि मोदींना अनेकांनी धारेवर धरले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात निवडणुकीला सामोरे जाताना ‘शायनिंग इंडिया’चा नारा देण्यात आला; पण वाजपेयींसारखा नेता असूनही भारतीयांनी त्यांना पुन्हा संधी दिली नव्हती. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस २०१९ च्या निवडणुकीसाठी कोणता नारा देते, आणि जनता त्याला कसा प्रतिसाद देते, याची उत्सुकता आहे.मंत्रापाठोपाठ येतो तंत्र. देशात सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे ६० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. निवडणूक तंत्र कॉंग्रेसला पुरते अवगत होते. एकहाती सत्तेचे दुष्परिणाम पक्ष आणि जनतेवर होतात, तसे झाले. देशातील राजकारण बदलले. मंडल आणि कमंडलच्या राजकारणात काँग्रेसचा जनाधार कमी झाला. अनेक राज्ये हातातून निसटली. काँग्रेसमधील नेत्यांनीच राज्या-राज्यात स्वत:च्या जहागिऱ्या तयार केल्या. प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी, ओरिसात बिजू पटनाईक आणि आता नवीन पटनाईक, छत्तीसगडमध्ये अजित जोगी, महाराष्टÑात शरद पवार असे नेते प्रभावशाली बनले. त्याचे नुकसान कॉंग्रेसला झाले. मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, कांशिराम-मायावती, देवेगौडा, एन.टी.रामाराव-चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव, असे प्रादेशिक नेते आपल्या राज्यापुरती सीमित राहिले परंतु त्यांची शक्ती तयार झाली. निवडणूक तंत्र म्हणून प्रादेशिक अस्मिता, जातीय समीकरणे यांचा प्रभावी वापर काँग्रेसप्रमाणेच ही मंडळी करु लागल्याने त्यांना कमी-अधिक यश मिळू लागले. अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्याच्या असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांचे देवदर्शन करीत मवाळ हिंदुत्वाचा नारा लोकांना भावत आहे. आता तर ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा देऊन नेते ‘साम-दाम-दंड-भेद’चा वापर करा, असे जाहीर आवाहन करीत आहे. भाजपाच्या या नवीन तंत्राला महाराष्टÑात तरी चांगले यश मिळत आहे. एक आकडी संख्या असलेल्या धुळे महापालिकेत भाजपाचे ५० नगरसेवक निवडून येतात, हे या तंत्राचे यश नव्हे काय?मंत्र, तंत्रापाठोपाठ निवडणुकीत आता यंत्राला महत्त्व आले आहे. भाजपाच्या यशात मतदान यंत्राचा मोठा वाटा आहे, असा काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांचा आरोप आहे. तीन राज्यात यश मिळूनदेखील कॉंग्रेसचा मतदान यंत्रांना विरोध कायम आहे. इव्हीएम मशीन हॅक करता येतात, असा संशय जाहीरपणे धुळे महापालिका निवडणुकीत व्यक्त झाला. पराभूत उमेदवारांनी थेट महापालिकेवर मोर्चा काढून चौकशीची मागणी केली. जामनेरच्या दोघांनी मतदान यंत्र हॅक करण्यासाठी पैसे घेतल्याची तक्रार करीत पराभूत उमेदवार जामनेरला येऊन धडकले. त्यामुळे मंत्र, तंत्र आणि यंत्रात पारंगत असलेला पक्षच २०१९ चा सत्ताधारी राहणार हे मात्र निश्चित आहे.

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकBJPभाजपा