शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

अग्रलेख: एकनाथ शिंदे अधिक बलवान! महायुतीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार झाली दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 08:07 IST

शिंदे यांची मांड अधिक पक्की झाली आहे. एक अग्निपरीक्षा त्यांनी पार केली.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निकालानंतर राज्यातील शिंदे सरकारचा धोका टळला आहे. अर्थातच या निकालाविरुद्ध उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सर्वोच्च न्यायालयात दाद मागतीलच. मात्र, अध्यक्षांच्या निकालाच्या निमित्ताने राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल; नवे मुख्यमंत्री येतील, प्रचंड राजकीय उलथापालथी होतील हे जे तर्क गेले काही दिवस दिले जात होते त्यास पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार तर टिकलेच, पण या निकालाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. शिंदे यांची मांड अधिक पक्की झाली आहे. एक अग्निपरीक्षा त्यांनी पार केली.

गेली दीड-पावणेदोन वर्षे त्यांच्या सरकारवर असलेली टांगती तलवार दूर झाली आहे. आधी पक्षात झालेली उभी फूट आणि आता लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर आलेली असताना विधानसभाध्यक्षांनी शिंदे गटाचा दावा मान्य करत कौल दिल्याने आणखी एका महापरीक्षेला ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सामोरे जावे लागणार आहे. अध्यक्षांच्या निकालाने ठाकरेंना दिलासा मिळाला असता तर महाविकास आघाडीलाही मोठे बळ मिळाले असते; पण आता तेही होणार नाही. आता ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा तेवढा शिल्लक राहिला आहे. त्यांच्या याचिकेवर लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल की नंतर, हा राजकीय औत्सुक्याचा विषय असेल. अध्यक्ष नार्वेकर यांनी निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि त्यावर ठाकरे यांनी सडकून टीका तर केलीच; शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे. नार्वेकर यांचा निकाल कसा पक्षपाती आहे हे जनतेच्या न्यायालयात जाऊन सांगण्यावर आता ठाकरे व महाविकास आघाडीचा भर असेल.

त्याचवेळी हा निकाल देताना नार्वेकर यांनी कायद्याच्या चाैकटीतच कसा निर्णय दिला, हे शिंदे सेना आणि भाजपला लोकांमध्ये जाऊन सांगावे लागणार आहे. अध्यक्षांवर सरकारच्या हातचे बाहुले असल्याचा आरोप करीत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न ठाकरे गट करेल. त्यामुळे आजच्या निकालावरून रस्त्यावरची जंग पाहायला मिळू शकते. निकालानंतर लगेच दोन्ही बाजूंनी ज्या आक्रमक प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या बघता या मुद्द्यावरून संघर्ष अधिक तीव्र होत जाणार हे स्पष्टच आहे.  सर्वोच्च न्यायालय आणि त्या बरोबरीनेच जनतेच्या न्यायालयातही ही लढाई सुरू राहील. सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सांगताना सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिलेले होते, त्याला फाटा देणारा अगदी उलट निकाल अध्यक्षांनी  दिला, असा दावा करत महाविकास आघाडीकडून टीकेची झोड उठविली जाईल. लोकसभा निवडणुकीत भाजपकडे असलेल्या मोदी कार्डचा प्रभाव कमी करण्यासाठीही अध्यक्षांसमोरची लढाई हरलेले ठाकरे भावनिकतेचा आधार घेतील. नार्वेकरांच्या निमित्ताने शिंदे आणि विशेषत: भाजपला लक्ष्य केले जाईल. गेले काही महिने राहुल नार्वेकर हे राज्यातील सत्तांतर नाट्याच्या निमित्ताने केंद्रस्थानी होते. बुधवारी त्यांनी विस्ताराने निकालाचे वाचन केले तेव्हा त्यांच्यातील अभ्यासू वकीलदेखील जाणवत होता. अध्यक्षांनी शिंदेंना व पर्यायाने सरकारला वाचविले, अशी टीका होणारच; पण यानिमित्ताने कायद्यातील तरतुदींचा आधार घेत त्यांनी दिलेला निकाल विधिवर्तुळात नक्कीच चर्चिला जावा असा आहे.

अपात्रतेसंबंधी घटनेच्या परिशिष्ट १० मधील तरतुदींचा त्यांनी नमूद केलेला अर्थ व दिलेल्या निकालाचा अन्य राज्यांमध्ये भविष्यात असा तिढा निर्माण झाल्यानंतर नक्कीच आधार घेतला जाईल. शिंदे आणि ठाकरे गटाचेही आमदार अध्यक्षांनी पात्र ठरविले आहेत. मात्र खरा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचाच असा दिलेला निर्णय, प्रतोदपदी शिंदे गटाचे भरत गोगावले यांचीच निवड वैध ठरविणे आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हिप अवैध असल्याचा दिलेला निर्वाळा, असे तीन महत्त्वाचे निर्णय शिंदे यांना मोठा दिलासा देणारे आहेत. निकालात ठाकरेंना धक्क्यामागून धक्के बसलेले असले तरी त्यांच्या गटाच्या १४ आमदारांना अध्यक्षांनी पात्र ठरविले हाच काय तो एकमेव दिलासा त्यांना मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याआधीच शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मान्यता दिलेली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हही त्यांच्याच पक्षाला बहाल केले होते. त्यावेळी शिंदे यांनी मोठी बाजी जिंकली होती. आजच्या निकालाने त्यांचा खुंटा अधिक बळकट झाला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Narvekarराहुल नार्वेकरMaharashtraमहाराष्ट्र