शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

दुष्काळाचे कालचक्र सोडेना महाराष्ट्राची पाठ

By सुधीर महाजन | Published: November 01, 2018 5:43 PM

चव्वेचाळीस वर्षांपूर्वी १९७४ साली दुष्काळाने ग्रामीण महाराष्ट्राची घडी जी विस्कटली ती पुन्हा सावरता आली नाही.

- सुधीर महाजन

चव्वेचाळीस वर्षांपूर्वी १९७४ साली दुष्काळाने ग्रामीण महाराष्ट्राची घडी जी विस्कटली ती पुन्हा सावरता आली नाही. त्यानंतरही दुष्काळ पडला नाही असेही नाही मराठवाडा, विदर्भाच्या तर तो पाचवीला पुजलेला. दोन वर्षे बरी एक वर्ष चांगले आणि दोन वर्षे दुष्काळ असे कालचक्र काही वर्षांत आकाराला येत आहे आणि प्रत्येक दुष्काळाची तुलना ७२ च्या दुष्काळाशी केली जाते. त्याच निकषावर सामान्य माणूस परिस्थिती तपासतो. त्यावेळी खायला अन्न नव्हते. जनावरांना चारा नव्हता, हाताला काम नव्हते. पिण्याच्या पाण्याची टंचाई होती; पण आजच्याइतकी जीवघेणी नव्हती.

दुष्काळग्रस्तांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजना आली. ही महाराष्ट्राने देशाला दिलेली नवी कल्पना वि.स. पागे यांनी ती मांडली व पुढे सरकारने अमलात आणली. जिचे अनुकरण अनेक राज्यांनी केले. हाताला काम असेल, तर पैसा येतो व परिस्थितीशी झगडण्याचे बळही येते. एक आश्वासक वातावरण निर्माण होते. १९७२ पासूनच टँकर, रोजगार हमी, सुखडी या गोष्टी अस्तित्वात आल्या आणि पोटभरण्यासाठी शहरांची वाट तुडवणारी माणसेही. ही वाट आजही वाहते आहे. एकदा खेडे सुटले की माणूस परतत नाही. जे काम गावात करायची लाज वाटते ते शहरात बिनदिक्कत करतो.

दुष्काळाचा इतिहास तपासला तर पार मागे जावे लागते. ७२ चा दुष्काळ हा २० व्या शतकातील मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा समजला जातो. मराठवाड्याला दुष्काळ तसा नवा नाही. अगदी ताजा विचार करायचा, तर २०१० पासून आठ वर्षांत मधली दोन वर्षे चांगल्या पावसाची सोडली, तर दुष्काळाचा ससेमिरा कायम आहे. इतिहासाचा धांडोळा घेतला तर पार यादवांच्या काळापासून या दुष्काळाने पाठ सोडली नाही. देवगिरीच्या पतनानंतर १३२२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. अलाउद्दीन खिलजीची त्यावेळी राजवट होती. परकीय आक्रमण आणि दुष्काळ यात जनता भरडली गेली. पुढे १३९६ ते १४०७ हा सलग ११ वर्षांचा मोठा दुष्काळ इतिहासात ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ या नावाने प्रसिद्ध आहे. या दुष्काळाचे वर्णन साहित्यातून, धार्मिक ग्रंथातून आले आहे. रस्त्यावर पडलेले मृतदेह, जनावरांचे सांगाडे या चित्रणावरून त्याची भीषणता जाणवते.

पुढे १६२६ मध्ये मोठ्या दुष्काळाची नोंद आहे. दिल्लीत लोधी घराण्याची राजवट मोगलांनी संपुष्टात आणली आणि इकडे देवगिरीच्या सुभेदारीवरून आझम खानला पायउतार व्हावे लागले त्यावेळी भीषण दुष्काळ पडला. हा दुष्काळ पुढे बरीच वर्षे चालला त्यावेळी मोगल सम्राट शहाजहानने दर आठवड्याला जनतेला पैसे वाटण्याची पद्धत सुरू केली व यासाठी पाच जणांची नियुक्ती केली. यात दख्खनसाठी आजम खानचा समावेश होता. या काळात २० आठवडे दर सोमवारी पाच हजार रुपयांचे जनतेत वाटप केले जात होते. सरकारने सगळीकडे कामे सुरू केली होती. 

पुढे मोठा दुष्काळ औरंगजेबाच्या मराठ्यांवरील आक्रमणाच्या वेळी होता. शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला. तो हा काळ त्यावेळी ज्वारी व भाताची पेरणी झाली नव्हती. १७०३ ते १७०७ हा दुष्काळाचा आणखी एक फटका. या काळात मराठ्यांनी मोगलांना जेरीला आणले होते. दख्खनमध्ये अन्नधान्याची टंचाई असल्याने उत्तरेकडून मोगलांनी धान्याचा पुरवठा सुरू केला. त्यावेळी अजिंठा घाटात मराठ्यांनी या धान्याची लूट केली. हा दुष्काळ औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत कायम होता. १७४९ च्या दुष्काळात ज्वारी ८० रुपये पल्ला या दराने विकली गेली, तर १७८७ च्या दुष्काळात १ रुपयाला ९ शेर ज्वारी या दराची नोंद आहे. 

दुष्काळाचा पहिला सरकारी अहवाल निजाम राजवटीत करण्यात आला. १८७५-७६ साली मौलवी महदी अली यांनी हा अहवाल त्यावेळी सादर केला होता. त्यावेळी अपेक्षित उत्पन्न व झालेले उत्पन्न याचा ताळेबंद मांडण्यात आला. बाजारपेठेतील धान्याच्या आवक-जावकची नोंद झाली. दुष्काळ व आक्रमण यातच महाराष्ट्राची १३०० ते १८०० अशी पाचशे वर्षे गेली पुढे परचक्र संपले; पण दुष्काळ पाठ सोडत नाही.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र