शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत संपादकीय - तो दिवस दूर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 07:12 IST

‘आम्ही पडलो त्यास त्यांचे पाप कारणीभूत’ असा त्यांचा पडलो तरी नाक वर असा दावा आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील जनतेने सत्तेवरून खाली खेचल्यानंतर आणि तेलंगण व मिझोरम या दोन राज्यांत काहीएक करणे न जमल्यावर भाजपाचे पुढारी व त्याचा संघ परिवार त्यातून काही चांगले शिकेल असे साऱ्यांना वाटले होते. पण साºया जणांचे गुरूपण आपल्याकडे आहे अशीच ज्यांची स्वत:विषयीची खात्री आहे ते शिकत नसतात. नापास झाल्यानंतरही जगद्गुरूपदाचा आव आणून ते जगालाच शहाणपण शिकवीत असतात. शिवाय तसे करताना आपला पराभव हा पराभव नव्हेच; प्रत्यक्षात तो आपला नैतिक विजय आहे अशीच त्यांची भाषा असते. पराभवानंतर मोदी त्यांचे दगडी मौन सांभाळून आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातले राजनाथसिंह, सुषमा स्वराज किंवा नितीन गडकरी हेही गप्प आहेत. परंतु ज्यांना राजकारणात भाव नाही ते रुद्रप्रताप सिंहांसारखे मंत्री व त्या पक्षाचे काही प्रवक्ते या पराभवातील मतांची गणिते मांडून त्यात आपणच कसा विजय मिळविला आहे ते सांगत आहेत. तसे सांगत असतानाही ‘काँग्रेसचा प्रचार कसा फसवा व अनैतिक होता’ हेही सांगायला ते विसरत नाहीत.

‘आम्ही पडलो त्यास त्यांचे पाप कारणीभूत’ असा त्यांचा पडलो तरी नाक वर असा दावा आहे. देशातले राजकारणाचे काही अभ्यासू भाष्यकार व बडी वर्तमानपत्रे मोदींचा पराभव मोदींमुळेच झाला हे सप्रमाण सांगत असताना ही प्रचारी माणसे त्यांची मुजोरी थांबवायला तयार नाहीत. या पराभवाची सर्वांत मोठी कारणे मोदींनी लादलेली नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारी ही आहेत. या सरकारने आपल्या कारकिर्दीत ग्रामीण भाग व गरीब माणसांची केलेली उपेक्षा हे त्याचे दुसरे कारण आहे. शिवाय त्यांनी राजकारणात रामाचा एवढी वर्षे एवढा वापर केला की लोकांना रामही भाजपाचाच प्रवक्ता वाटू लागला आहे. या सरकारची गोवधबंदी फसली, नीती आयोग नाकाम ठरला, विद्यापीठ आयोगाची मोडतोड करून सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदावर संघाच्या बौद्धिकात तयार झालेली माणसे आणून बसविली. शिवाय प्रथम सर्वोच्च न्यायालय व सारी न्यायव्यवस्था भाजपाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला व आता त्यांची नजर रिझर्व्ह बँकेजवळ असलेल्या नऊ लाख कोटी रुपयांच्या राखीव निधीवर असल्याने ती बँकही आपली मांडलिक बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातूनच रघुराम राजन गेले आणि आता ऊर्जित पटेल गेले. नवे गव्हर्नर शक्तिकांता दास सरकारच्या हातचे बाहुले आहेत. ही बाब साºयांच्या लक्षात आली आहे. ‘मी बँकेची स्वायत्तता टिकवीन,’ असे ते आज म्हणत असले तरी तेच उद्या त्या बँकेच्या किल्ल्या मोदी सरकारच्या हाती नेऊन देतील असे सारेच म्हणतात. सारी यंत्रणा अशीच ताब्यात असल्यानंतरही एकूण पराभव वाट्याला येत असेल तर त्याचा दोष कोणी घ्यायचा असतो? भारत हा एकेकाळी नाम परिषदेचा नेता होता. या परिषदेत १४८ राष्टÑे होती. प्रत्यक्षात या परिषदेचा आरंभ व स्थापनाच नेहरूंनी केली. मोदींनी तिच्याकडे एवढे दुर्लक्ष केले की या वर्षी त्या परिषदेच्या बैठकीला ते किंवा त्यांचा कोणताही मंत्री हजर राहिला नाही. लहान देशांचे जगाच्या राजकारणात एक महत्त्व आहे. त्यांचे संघटित व नैतिक वजन मोठे आहे. मात्र मोदींना त्यापेक्षा ट्रम्प यांना मिठी मारणे, पुतीन यांच्या गळ्यात पडणे आणि शिपिंग यांना ढोकळे खाऊ घालणेच महत्त्वाचे वाटले आहे. ते पुढारी भारताला महत्त्व देत नाहीत आणि जे देश ते देत होते त्यांच्यापासून मोदींनी देशाला दूर नेले आहे. गांधी आणि नेहरूंना शिव्या देणे, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुसून टाकणे आणि त्यात भाग घेणाºया लक्षावधी लोकांची उपेक्षा करणे यातच धन्यता मानण्याचे राजकारण मोदींनी व संघाने केले. कारण संघाचा स्वातंत्र्याच्या लढ्याशी कोणताही संबंध नाही. तो नसल्याने त्याला १९४७ पूर्वीचा इतिहास नाही. ही स्थिती, इतरांचे इतिहास पुसून काढायला त्याला भाग पाडते. मात्र लोक डोळस आहेत. त्यांना या स्वातंत्र्यामागची कारणे समजतात. त्यांना सरकारचे अपयशही समजते. आज त्याचा परिणाम ते स्वत:च्या अडचणींमध्ये पाहत असतात. काही थोडीच माणसे धनाढ्य का होतात आणि आपली अडचण वाढतच कशी जाते हे ज्यांना कळले त्या गरीब माणसांनी मोदींचा पराभव केला आहे. मोदी त्यातून काही शिकणार नसल्यास ते त्यांना आणखीही एक धडा लवकरच शिकवतील. आणि तो दिवस दूर नाही.ज्यांना राजकारणात भाव नाही ते रुद्रप्रताप सिंहांसारखे मंत्री व त्या पक्षाचे काही प्रवक्ते या पराभवातील मतांची गणिते सविस्तरपणे मांडून त्यात आपणच कसा विजय मिळविला आहे ते सांगत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा