शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

लोकमत संपादकीय - तो दिवस दूर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 07:12 IST

‘आम्ही पडलो त्यास त्यांचे पाप कारणीभूत’ असा त्यांचा पडलो तरी नाक वर असा दावा आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील जनतेने सत्तेवरून खाली खेचल्यानंतर आणि तेलंगण व मिझोरम या दोन राज्यांत काहीएक करणे न जमल्यावर भाजपाचे पुढारी व त्याचा संघ परिवार त्यातून काही चांगले शिकेल असे साऱ्यांना वाटले होते. पण साºया जणांचे गुरूपण आपल्याकडे आहे अशीच ज्यांची स्वत:विषयीची खात्री आहे ते शिकत नसतात. नापास झाल्यानंतरही जगद्गुरूपदाचा आव आणून ते जगालाच शहाणपण शिकवीत असतात. शिवाय तसे करताना आपला पराभव हा पराभव नव्हेच; प्रत्यक्षात तो आपला नैतिक विजय आहे अशीच त्यांची भाषा असते. पराभवानंतर मोदी त्यांचे दगडी मौन सांभाळून आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातले राजनाथसिंह, सुषमा स्वराज किंवा नितीन गडकरी हेही गप्प आहेत. परंतु ज्यांना राजकारणात भाव नाही ते रुद्रप्रताप सिंहांसारखे मंत्री व त्या पक्षाचे काही प्रवक्ते या पराभवातील मतांची गणिते मांडून त्यात आपणच कसा विजय मिळविला आहे ते सांगत आहेत. तसे सांगत असतानाही ‘काँग्रेसचा प्रचार कसा फसवा व अनैतिक होता’ हेही सांगायला ते विसरत नाहीत.

‘आम्ही पडलो त्यास त्यांचे पाप कारणीभूत’ असा त्यांचा पडलो तरी नाक वर असा दावा आहे. देशातले राजकारणाचे काही अभ्यासू भाष्यकार व बडी वर्तमानपत्रे मोदींचा पराभव मोदींमुळेच झाला हे सप्रमाण सांगत असताना ही प्रचारी माणसे त्यांची मुजोरी थांबवायला तयार नाहीत. या पराभवाची सर्वांत मोठी कारणे मोदींनी लादलेली नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारी ही आहेत. या सरकारने आपल्या कारकिर्दीत ग्रामीण भाग व गरीब माणसांची केलेली उपेक्षा हे त्याचे दुसरे कारण आहे. शिवाय त्यांनी राजकारणात रामाचा एवढी वर्षे एवढा वापर केला की लोकांना रामही भाजपाचाच प्रवक्ता वाटू लागला आहे. या सरकारची गोवधबंदी फसली, नीती आयोग नाकाम ठरला, विद्यापीठ आयोगाची मोडतोड करून सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदावर संघाच्या बौद्धिकात तयार झालेली माणसे आणून बसविली. शिवाय प्रथम सर्वोच्च न्यायालय व सारी न्यायव्यवस्था भाजपाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला व आता त्यांची नजर रिझर्व्ह बँकेजवळ असलेल्या नऊ लाख कोटी रुपयांच्या राखीव निधीवर असल्याने ती बँकही आपली मांडलिक बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातूनच रघुराम राजन गेले आणि आता ऊर्जित पटेल गेले. नवे गव्हर्नर शक्तिकांता दास सरकारच्या हातचे बाहुले आहेत. ही बाब साºयांच्या लक्षात आली आहे. ‘मी बँकेची स्वायत्तता टिकवीन,’ असे ते आज म्हणत असले तरी तेच उद्या त्या बँकेच्या किल्ल्या मोदी सरकारच्या हाती नेऊन देतील असे सारेच म्हणतात. सारी यंत्रणा अशीच ताब्यात असल्यानंतरही एकूण पराभव वाट्याला येत असेल तर त्याचा दोष कोणी घ्यायचा असतो? भारत हा एकेकाळी नाम परिषदेचा नेता होता. या परिषदेत १४८ राष्टÑे होती. प्रत्यक्षात या परिषदेचा आरंभ व स्थापनाच नेहरूंनी केली. मोदींनी तिच्याकडे एवढे दुर्लक्ष केले की या वर्षी त्या परिषदेच्या बैठकीला ते किंवा त्यांचा कोणताही मंत्री हजर राहिला नाही. लहान देशांचे जगाच्या राजकारणात एक महत्त्व आहे. त्यांचे संघटित व नैतिक वजन मोठे आहे. मात्र मोदींना त्यापेक्षा ट्रम्प यांना मिठी मारणे, पुतीन यांच्या गळ्यात पडणे आणि शिपिंग यांना ढोकळे खाऊ घालणेच महत्त्वाचे वाटले आहे. ते पुढारी भारताला महत्त्व देत नाहीत आणि जे देश ते देत होते त्यांच्यापासून मोदींनी देशाला दूर नेले आहे. गांधी आणि नेहरूंना शिव्या देणे, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुसून टाकणे आणि त्यात भाग घेणाºया लक्षावधी लोकांची उपेक्षा करणे यातच धन्यता मानण्याचे राजकारण मोदींनी व संघाने केले. कारण संघाचा स्वातंत्र्याच्या लढ्याशी कोणताही संबंध नाही. तो नसल्याने त्याला १९४७ पूर्वीचा इतिहास नाही. ही स्थिती, इतरांचे इतिहास पुसून काढायला त्याला भाग पाडते. मात्र लोक डोळस आहेत. त्यांना या स्वातंत्र्यामागची कारणे समजतात. त्यांना सरकारचे अपयशही समजते. आज त्याचा परिणाम ते स्वत:च्या अडचणींमध्ये पाहत असतात. काही थोडीच माणसे धनाढ्य का होतात आणि आपली अडचण वाढतच कशी जाते हे ज्यांना कळले त्या गरीब माणसांनी मोदींचा पराभव केला आहे. मोदी त्यातून काही शिकणार नसल्यास ते त्यांना आणखीही एक धडा लवकरच शिकवतील. आणि तो दिवस दूर नाही.ज्यांना राजकारणात भाव नाही ते रुद्रप्रताप सिंहांसारखे मंत्री व त्या पक्षाचे काही प्रवक्ते या पराभवातील मतांची गणिते सविस्तरपणे मांडून त्यात आपणच कसा विजय मिळविला आहे ते सांगत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा