शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक निवडणुकीत सत्तेच्याच ‘पॅटर्न’ची चलती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 06:06 IST

भिवंडी महापालिकेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व शिवसेना या भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली.

- संदीप प्रधान 

भिवंडी महापालिकेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व शिवसेना या भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत येण्याचा प्रयोग भिवंडीच्या प्रयोगशाळेत यशस्वी झाल्यावर मग त्याला व्यापक स्वरूप दिले गेले, असे म्हटले तर नवल वाटणार नाही. महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या ९० असताना व सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४७ नगरसेवक विजयी झाले असतानाही फाटाफुटीच्या संभाव्य भीतीमुळे काँग्रेसने शिवसेनेचा हात धरला. बहुमताकरिता ४६ नगरसेवकांची गरज असताना व काँग्रेसकडे बहुमताच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त नगरसेवक असतानाही काँग्रेसने शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेताना त्यांना उपमहापौरपद दिले होते.

राज्यात महाविकास आघाडी सत्तारूढ झाल्यावर खरे तर भिवंडीत स्पष्ट बहुमत असताना व शिवसेनेची साथ असताना महाविकास आघाडीचाच महापौर बसायला हवा होता. मात्र फाटाफुटीचा शाप लागलेल्या काँग्रेसचे एक-दोन नव्हे तर तब्बल १८ नगरसेवक फुटले आणि जेमतेम चार नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांच्या पत्नी प्रतिभा पाटील या महापौरपदी विजयी झाल्या. काँग्रेसच्या बंडखोर गटाचे इम्रानवली महंमद खान हे उपमहापौर झाले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात व विशेषकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात असे भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष अनेकदा हातमिळवणी करतात. राजकीय विचारसरणी अडसर ठरू नये याकरिता विकास पॅनल, समन्वयवादी पॅनल वगैरे गोंडस नावे देऊन पॅनल निवडणूक रिंगणात उतरवली जातात. स्थानिक पातळीवरील सत्ता ताब्यात असणे ही सर्वच पक्षांची गरज असते.

भिवंडीत काँग्रेस पक्षाला भक्कम बहुमत प्राप्त झाल्यावर काही स्थानिक नेत्यांचे पक्षातील व महापालिकेतील प्राबल्य वाढले. निधीच्या वाटपापासून अनेक छोट्या-मोठ्या निर्णयांमध्ये हे नेते मनमानी करू लागले, अशी तक्रार फुटीर नगरसेवक करीत आहेत. काही नगरसेवकांवर तर कर्जाचा डोंगर निर्माण झाला. आपली कैफियत नेतृत्वाच्या निदर्शनास आणूनही त्याची दखल न घेतली गेल्याने त्यांनी कोणार्क विकास आघाडीच्या नेत्यांशी हातमिळवणी केली. राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या निकालाशी शिवसेनेने गद्दारी केली, अशी ओरड भाजप नेतृत्व गेले काही दिवस करीत असून जोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर राहील तोपर्यंत करणार आहे. भिवंडीतील जनतेनेही अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊन कौल दिला होता.

मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे नाक कापण्याकरिता भिवंडीतील प्रयोगशाळेतील मूळ प्रयोग उधळून लावण्याच्या राजकीय डावपेचात येथील जनतेच्या निकालावर बोळा फिरवला गेला, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भिवंडीतील असंतोषाबाबत प्रदेश स्तरावरील नेत्यांनी दाखवलेली गाफिली आश्चर्यजनक आहे. शिवसेनेला धडा शिकवण्याकरिता नाशिक, सोलापूर येथे भाजपने केलेल्या खेळीने सत्ता खेचून घेतली. हे चित्र आता पुन:पुन्हा दिसणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षभेद व पक्षीय भूमिका बाजूला ठेवून अनेकदा युती, आघाडी केली जाते. पुणे महापालिकेत २००९ मध्ये सुरेश कलमाडी यांना ‘कात्रजचा घाट’ दाखवण्याकरिता अजित पवार व गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची युती घडवून आणली होती. ‘पुणे पॅटर्न’ म्हणून ती युती महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली होती. यामुळेच राजकारणात हे दोन्ही पक्ष एकत्र येणार, अशा चर्चांना ऊत आला होता. २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने देऊ केलेल्या बिनशर्त पाठिंब्याचा संबंध त्या ‘पुणे पॅटर्न’शी जोडला गेला होता.

यापूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती. रिपाइंच्या १२ नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा होता. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पुष्पकांत म्हात्रे यांचा शिवसेनेच्या मिलिंद वैद्य यांनी पराभव केला होता. त्या वेळी काँग्रेसचे २८ ते ३५ नगरसेवक फुटले होते. त्यानंतर पुन्हा काँग्रेसला मुंबई महापालिकेत सत्ता प्राप्त झाली नाही. भिवंडी महापालिकेच्या भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांच्या मनमानीमुळे या पक्षाला सत्ता गमवावी लागली तर आश्चर्य वाटायला नको. (लेखक लोकमत समूहाचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत.)

टॅग्स :BhiwandiभिवंडीElectionनिवडणूकMayorमहापौरShiv Senaशिवसेना