शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नेत्यांनो, कामाला लागा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 06:39 IST

मोदींनी नियोजन आयोग मोडला, निर्वाचन आयोग अधिकारहीन केला,

अमेठीत पराभूत झालेले राहुल गांधी वायनाड या केरळमधील लोकसभा क्षेत्रातून प्रचंड बहुमताने विजयी झाले. अमेठीतील पराभवाचा परिणाम काही काळातच त्यांनी झटकल्यासारखा दिसला व ते पुन्हा आपल्या जबाबदाऱ्यांच्या मागे लागले. पुढ्यात राहिलेले मोठे स्वप्न विरल्यानंतर येऊ शकणारी विरक्ती त्यांना शिवली नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची व गांधी कुटुंबाबाहेरचा नेता त्या पक्षाच्या अध्यक्षपदावर निवडण्याची विनंती पक्षाला करून ते पुनश्च जनतेत सामील झाले. केरळात त्यांनी किमान तीन मोठ्या पदयात्रा व लोकयात्रा काढल्या. नेत्याच्या या कृत्याने त्याच्या अनुयायांना काहीच शिकवू नये काय? कारण ते अजून घराबाहेर पडल्याचे, लोकांत मिसळू लागल्याचे व पक्षाची डागडुजी करू लागल्याचे अन्यत्र कुठे दिसले नाही. निवडणुकीतील जय-पराजय या नित्याच्या व सहजपणे घेण्याच्या बाजू आहेत. त्या तशा न घेता, हाच जणू साºयाचा अंत आहे अशी मनाची समजूत करून थिजून बसणारी माणसे पक्ष कसा उभा करणार? आणि ते देशाला दिशाही कशी दाखवणार? खरे तर त्यांच्यासमोर आज असलेले आव्हान निवडणुकीतील स्पर्धेहूून मोठे आहे.

मोदींनी नियोजन आयोग मोडला, निर्वाचन आयोग अधिकारहीन केला, रिझर्व्ह बँकेला भाजपची खासगी बँक बनविली, देशातल्या सगळ्या बँका बुडवल्या, विमान कंपन्यांना टाळे लावले, विद्यापीठ अनुदान आयोगाची इभ्रत घालविली आणि शिक्षणाचे संघीकरण चालविले. आता तर त्यांनी न्यायालयाचेही संघीकरण करण्याची सुरुवात करून कर्नाटकच्या न्यायालयावर कॉलेजियमचा सल्ला धुडकावून आपला एक माणूस नेमला. यातली प्रत्येक गोष्ट घटनेचा अवमान करणारी, प्रस्थापित लोकशाहीचे हातपाय तोडणारी आणि घटनेला पोथी बनविण्याचा त्यांचा इरादा सांगणारी आहे. यातल्या प्रत्येक गोष्टीविरुद्ध लढा देण्याची व त्यासाठी जनतेला सोबत घेण्याची गरज आहे. अनेक लहान-मोठे राजकीय पक्ष (आता त्यांनाही त्यांची खरी किंमत समजली आहे) सोबत यायला तयार आहेत. पण मध्यवर्ती नेतेच गळाठले असतील तर? की एकट्या सोनिया, राहुल आणि प्रियंका यांनीच साºया राजकारणाचे ओझे अंगावर घ्यायचे असते?

काँग्रेस पक्षात तरुण नेत्यांची फळी मोठी आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, देवरा, गोगोई, तांबे अशी किती तरी नावे सांगता येतील. पण त्यांचे अस्तित्व त्यांच्या क्षेत्राबाहेर दिसत नाही. त्यातले बहुतेक जण स्वत:साठी काम करतात, पक्षासाठी नाही. महाराष्ट्रातले किती नेते त्यांच्या मतदारसंघाबाहेरच्या लोकांना ठाऊक आहेत? आणि त्यातल्या किती जणांना महाराष्ट्र ठाऊक आहे? असे एक मतदारसंघीय पुढारी व कार्यकर्ते स्वत:शिवाय पक्ष वाढू देत नाहीत, उलट आहे तोही छोटा करण्याचाच प्रयत्न करतात. भाजप व संघ यांनी अनेक सेवा संस्था काढल्या. नेत्रपेढ्या, रक्तपेढ्या, डॉक्टरांच्या संघटना किंवा कायदेशीर सल्ला देणारी पथके. काँग्रेसला हे सहज करता येणारे होते. पण त्यासाठी सेवाकार्याला वाहून घेण्याची व त्यातून पक्षाला माणसे देण्याची जी दृष्टी लागते ती त्यांच्यात नाही. परिणामी पक्ष तुटतो, संघटना जाते, घरे तुटतात आणि पिढ्यान्पिढ्या पक्षात राहिलेली माणसे पक्षाबाहेर जातात. तसे जाताना त्यांना संकोच वा लाज, शरम वाटत नाही. सत्ता ही आकर्षक बाब आहे. पण ती स्वबळावर मिळवायची असते. अन्यथा आपण सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोईच फक्त होऊ शकतो हे विख्यांना, राण्यांना किंवा मोहित्यांना कळत नाही काय? देशात पंतप्रधानाचे पद एक असते व ते १३० कोटी लोकांमधून एकालाच मिळणारे असते. हीच बाब मुख्यमंत्र्याबाबतही आहे. केवळ ती पदे आम्हाला आमच्या नेत्यांनी दिली नाही म्हणून कळ काढणाºयांची खरे तर पतच तपासून पाहिली पाहिजे. देशाची मागणी मोठी आहे, ती त्यागाची व परिश्रमाची आहे. भाजपला पर्याय देण्याची आहे. आव्हाने मोठी आहेत आणि ती तुमच्या सामर्थ्याला समर्थ आव्हान देणारीही आहे. अशा आव्हानांसमोर जे उभे होतात तेच संघटना बांधतात व तेच देशही उभा करीत असतात.

निवडणुकीतील जय-पराजय या नित्याच्या व सहजपणे घेण्याच्या बाजू आहेत. त्या तशा न घेता, हाच जणू साºयाचा अंत आहे अशी मनाची समजूत करून थिजून बसणारी माणसे पक्ष कसा उभा करणार? आणि ते देशाला दिशाही कशी दाखवणार?

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा