शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समितीच्या बैठका पाठपुराव्याअभावी निरर्थक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:42 IST

- मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘नवा भिडू, नवा राज’ असे एकंदर वातावरण तयार झाले. मंत्रिमंडळ ...

- मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘नवा भिडू, नवा राज’ असे एकंदर वातावरण तयार झाले. मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्र्यांची नियुक्ती हे टप्पेदेखील पार पडले. राज्य आणि जिल्ह्याचा प्रशासकीय गाडा रुळावर येण्यास सुरुवात झाली. कारण चार महिन्यांपासून हा गाडा संथगतीने सुरु होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, निवडणुका, राष्टÑपती राजवट यामुळे जिल्हापातळीवर आनंदीआनंद होता. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेण्यात येत आहे. जळगावची आटोपली, नंदुरबार आणि धुळ्याची या आठवड्यात होत आहे.मागील सरकारच्या काळातील बैठक आणि आताची बैठक यात फरक काय असे विचारले तर मागील पानावरुन पुढे एवढेच म्हणावे लागेल. मंच आणि सभागृहातील चेहरे बदलले एवढाच काय तो फरक. परंतु, प्रश्न तेच, विचारणारेदेखील तेच आणि उत्तरे देणारे अधिकारीही तेच अशी स्थिती आहे. वाळूचोरी, आरोग्य, रस्ते, वीज या विषयांवर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली. लोकप्रतिनिधी सुखावले. मतदारांपर्यंत संदेश गेल्याचा क्षणिक आनंद मिळाला. प्रशासनाला तर या गोष्टींची सवय होऊन गेली आहे. कुणी जात्यात तर कुणी सुपात असते, बाकी काही नाही. एका दिवसासाठीची विकासाविषयी तळमळ, कळकळ ही वर्षभर का राहू नये.जळगावच्या नियोजन समितीच्या बैठकीत जाब विचारणारे लोकप्रतिनिधी तालुकापातळीवर काय करतात? तालुका समन्वय समितीची बैठक नियमित होते काय? पंचायत राज व्यवस्थेतील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाशी संवाद आणि समन्वय साधून विकास कामे मार्गी लावण्यासाठी कालबध्द कार्यक्रम का आखला जात नाही? स्थानिक पातळीवर पाठपुरावा का केला जात नाही? विकास कामांसाठी आलेला निधी अखर्चित राहणे किंवा परत जाणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या दोघांसाठी नामुष्की नव्हे काय?केवळ बैठकांमधून प्रशासनाला जाब विचारुन प्रसिध्दी मिळविण्यापेक्षा नियोजन, पाठपुरावा करुन ‘कार्यसम्राट’ होण्याची इच्छाशक्ती लोकप्रतिनिधींमध्ये का दिसून येत नाही, हा मोठा ंिचतेचा विषय आहे. प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतातच, पण त्यांना पाच वर्षानंतर जनतेकडे कौल घ्यायला जायचे नसते. लोकप्रतिनिधींना जायचे असते, त्यामुळे त्यांनीच सजग, सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ अशी नुरा कुस्ती या बैठकांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये होत असते, हे देखील जनतेपासून लपून राहिलेले नाही. प्रशासनाला मोकळेपणाने काम करु दिले तर निश्चित त्याचे सुपरिणाम दिसून येतील. परंतु, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांचा प्रशासकीय कामकाजातील हस्तक्षेप वाढला असून त्याचा परिणाम विकास कामांवर होऊ लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अलिकडचे विधान हे लोकप्रतिनिधींच्या मानसिकता आणि कार्यपध्दतीवर नेमके बोट ठेवणारे आहे.त्यामुळे उपचार म्हणून नियोजन समितीच्या बैठका होऊ नये. प्रशासकीय कामकाजातील अडचणी दूर सारण्यासाठी उपाययोजना करण्याचे आणि प्रशासन योग्य दिशेने कामकाज करीत आहे किंवा नाही, त्याचे निरीक्षण आणि नियंत्रण ठेवण्याचे ते व्यासपीठ आहे, त्याचा सुयोग्य वापर व्हायला हवा. अन्यथा, जनतेचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागणार नाही. सरकार बदलले आहे तर बदलदेखील दिसायला हवा. याची काळजी पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी घेतील, अशी अपेक्षा करुया. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव