शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हातचे गेले... दुष्काळ कधी जाहीर होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 19:41 IST

राज्यात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पंचनामे वेगाने सुरू आहेत.

- धर्मराज हल्लाळे

राज्यात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पंचनामे वेगाने सुरू आहेत. केंद्रीय पथकाचा दौरा झाला की, दुष्काळाचा निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सद्यस्थिती मात्र भीषण दुष्काळाकडे वाटचाल करणारी आहे. मराठवाड्यात ७० टक्के व त्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. सरासरी इतका पाऊस पडल्यानंतरही उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसतात. यंदा तर सरासरीही गाठली नाही. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने किती मदत दिली आणि विद्यमान भाजपा सरकारने किती मदत दिली, याचा हिशेब मुख्यमंत्री सांगत आहेत. किती कोटींचा शेतमाल खरेदी केला, हेही सांगायला ते विसरले नाहीत. नक्कीच शेतमाल खरेदी केला, परंतु त्याचा संपूर्ण पैसा शेतक-यांच्या हाती पडला का, हेही एकदा सांगा. चार महिन्यांपूर्वी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या एकट्या लातूर जिल्ह्यातील २ हजार ५०० शेतक-यांचे १२ कोटी रुपये शासनाकडे थकित आहेत. शेतमाल विक्रीची रक्कम कधी मिळणार, याची शेतक-यांना चिंता आहे. म्हणजेच किती मदत केली आणि किती शेतमाल खरेदी केला यापेक्षा प्रत्यक्षात किती मदत मिळाली आणि प्रत्यक्षात शेतमालाच्या विक्रीतून पदरी काय पडले, हेच पहावे लागेल.

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीवर सातत्याने चर्चा होते. सरकारने जलयुक्त शिवारची कामेही केली आहेत. परंतु, प्रत्यक्षात पावसाने हुलकावणी दिल्याने, नियोजन फसले आहे. खरीप हातचे गेले आहे. रबीचे काय होणार हा प्रश्नच आहे. मराठवाड्यातील बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील २ हजार ९५८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. लातूर जिल्ह्यातील परिस्थिती बिकट असतानाही सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांपैक्षा जास्त आली आहे. एकंदर खरीप कोरडे गेले. अनेक ठिकाणी दूबार पेरणी करुनही हाती काहीच पडले नाही. निदान रबी हंगामात तरी पेरता येईल म्हणून शेतक-यांनी शेतजमिनी तयार करून ठेवल्या आहेत. हातउसने पैसे घेऊन, कर्ज काढून ज्यांना खरिपातून काहीच मिळाले नाही त्यांना सरकार कधी मदत करणार, हा विषय आहे. जिथे काही प्रमाणात पाऊस झाला, तिथे खरिपाचे उत्पादन ६० टक्क्यांच्या पुढे जाणार नाही.या दुष्काळाची तुलना अनेक जण १९७२च्या दुष्काळपेक्षाही भयंकर दुष्काळ अशी करीत आहेत. आॅक्टोबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. भूगर्भपातळीत घट झाली आहे. प्रकल्प कोरडेठाक पडली आहेत. एकीकडे शेतक-यांच्या मदतीचा प्रश्न तर दुसरीकडे पेयजलाचे संकट उभारले आहे. माणसे कुठूनही पाणी आणून पितील परंतु आमच्या जनावरांचे काय होणार? हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. जिथे टॅँकरचे पाणी माणसांनाच पुरत नाही, तिथे घरातील चार जनावरे कशी जगवायची, हा शेतक-यांसमोरील प्रश्न आहे. मराठवाड्यातील सोयाबीन करपले. कपाशी भुईसपाट झाल्या. मका वाळला आहे. जिथे ऊसक्षेत्र आहे तेथील जलसाठ्यांनीही तळ गाठला आहे. परिणामी, मराठवाड्यातील शेतीव्यवस्था मोठ्या संकटात आहे. अशा वेळी सरकारची भूमिका यापूर्वीच्या सरकारने काय केले, याचा हिशेब सांगणारी नको, तर तत्काळ मदत करणारी हवी आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर ३१ डिसेंबरपर्यंत दुष्काळाचा निर्णय होईल, असे लातूरमध्ये सांगितले. दुस-याच दिवशी जळगावमध्ये ३१ आॅक्टोबरपर्यंत निर्णय होईल, असे सांगितले. तारखेचा सरकारी घोळ काहीही असो, त्या निर्णयाची तारीख जेवढ्या लवकर येईल, तेवढा अधिकचा दिलासा जनतेला मिळणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ