शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
2
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
3
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
4
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
5
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
6
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
7
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
8
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
9
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
10
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
11
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
12
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
13
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
14
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
15
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
16
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
17
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
18
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
19
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
20
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात

दिल्लीत प्रमोशनची किल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 4:15 AM

नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीचा इतिहास तसा फार जुना. नेते कितीही दिग्गज असोत येथील काँग्रेस नेहमीच गटातटात विखुरलेली राहिली आहे.

नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीचा इतिहास तसा फार जुना. नेते कितीही दिग्गज असोत येथील काँग्रेस नेहमीच गटातटात विखुरलेली राहिली आहे. विशेष म्हणजे एका नेत्याला अस्थिर करण्यासाठी दुसऱ्या गटाला हाताशी धरून बळ देण्याचे काम ‘दिल्ली’ मोठ्या शिताफीने करीत आली आहे. देशभरात काँग्रेसची झालेली पडझड पाहता आता दिल्लीकरांनीही काहीसे समजदारीने घेतल्याचे नागपुरातील राजकीय ‘प्रमोशन’ वरून दिसून येते. नाराजी व्यक्त करणाºयांना काहीतरी देऊन ताकद देण्याची भूमिका आता दिल्लीने घेतली आहे. यातून स्थानिक नेत्यांना बळ मिळत असून पर्यायाने काँग्रेस बळकट होण्याच्या दिशेने सकारात्मक संदेश जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या गटबाजीने नागपुरात काँग्रेस भुईसपाट झाली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यापर्यंत प्रकरण गेले. शेवटी चतुर्वेदींना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. महाराष्ट्रातून झालेली ही कारवाई मोडीत काढण्यासाठी चतुर्वेदी समर्थकांनी दिल्ली गाठली. तर त्यांच्यासोबतच कारवाईचे स्वागत करण्यासाठी मुत्तेमवार गटही दिल्लीत दाखल झाला. दोन्ही गटांनी दिल्ली दरबारी हजेरी लावून आपापल्या नेत्यांची बाजू मांडली. दिल्लीकरांनी बाजू ऐकून घेतली व सर्वांच्याच पदरी काहीतरी पाडण्याचा निवाडा केला.

समर्थकांच्या दिल्लीवारीनंतर मुत्तेमवार यांची अ.भा. काँग्रेस कमिटीवर सदस्य म्हणून वर्णी लागली. त्यामुळे चतुर्वेदी गट आणखीनच दुखावल्याचे पाहून काल-परवा माजी मंत्री नितीन राऊत यांची अ.भा. काँग्रेस समितीच्या ‘एससी’ विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. असे करीत दिल्लीने गटबाजीला अधिक हवा न देता नेत्यांमध्ये ‘बॅलेन्स’ साधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीवारीचा फायदा दोन्ही गटांना झाला. तत्पूर्वी पक्षाने युवक काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नागपुरातील कामाची दखल घेत त्यांना अ.भा. युवक काँग्रेसच्या सचिव पदाची जबाबदारी सोपविली.

शेळकेंचे हे प्रमोशनही बरेच काही सांगून गेले. दिल्लीला आता गल्लीतील गटबाजीत ‘इंटरेस्ट’ नाही, तर गल्लीत काम करणाºयासाठी दिल्लीची दारे उघडी आहेत, असा संदेशवजा इशारा दिल्लीने नागपूरकर नेत्यांना दिला आहे. लोकसभा अन् पाठोपाठ विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. स्थानिक गटबाजीमुळे पक्षाचे आधीच बरेच नुकसान झाले आहे. याचे अहवाल दिल्ली दरबारी पोहचले आहेत. त्यामुळे आता फाटलेले शिवण्याऐवजी अधिक फाडण्याचा प्रयत्न करणाºया नेत्यांना प्रसंगी याची किंमतही मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेत्यांनी वेळीच सावध होऊन पक्षनिष्ठा जोपासली नाही तर ‘हात’ दाखविल्याशिवाय सोडणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस