शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 05:49 IST

देशात परकीय गुंतवणूक तर वाढत नाही उलट जी काही गुंतवणूक देशात झालेली आहे, ती काढून घेण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला आहे.

- अभिजित केळकरसध्या भारतीय रुपयाची अंशत: होत जाणारी अधोगती पाहून अभ्यासू तथा प्रथितयश लोकांमध्ये काळजीसदृश वातावरण तयार झाले आहे. आधीच डॉलरची वाढती मागणी आणि वाढणाऱ्या तेल किमती, त्यात नुकताच डॉलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी घसरला त्यामुळे ‘अब तेरा क्या होता रु पिया’ आणि ‘जो डर गया वह मर गया’ अशा दोन वेगवेगळ्या मानसिकता असणाºया लोकांना चर्चेला नवीन इंधन मिळाले आहे.दोन चलनांमधील विनिमय दर हे सतत बदलत असतात आणि जगात जवळजवळ सगळीच चलने ही सतत बदलत्या विनिमय दरांनी चलन बाजारात विकली किंवा घेतली जातात. जगात चलनाच्या मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत बदलणाºया सतत विनिमय दराकरिता कारणीभूत असते. एखाद्या चलनाची वाढती मागणी आणि त्याची अनुपलब्धता त्या चलनाचा दर वाढवीत असतो. कुठल्याही चलनाची घट अथवा वाढ ही महागाई दर, चलनविषयक धोरण, व्याजाचा दर, आर्थिक तथा राजनैतिक परिस्थिती इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत कशामुळे रुपयाची किंमत कमी - जास्त होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.माझ्या मते मुख्यत: अमेरिकेत येऊ जात असणारी मंदी व तिचे बदलते आर्थिक तथा चलनविषयक धोरण याचा सर्वांत जास्त परिणाम भारतीय चलनाच्या अधोगतीस कारणीभूत आहे. देशात नवीन सरकार आल्यापासून रुपयाचे सातत्याने अवमूल्यन चालू आहे. सुरुवातीला डॉलर-रुपया विनिमय दर एक डॉलर, ६२ रुपये असा होता. त्याने आता नीचांकी पातळी गाठली असून, ७१वर आला आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे आयात महाग तर निर्यात स्वस्त होते. अशा परिस्थितीत निर्यात वृद्धीला तर आयात कमी करण्यास संधी असते. परंतु, मागील तीन-चार वर्षांपासून भारताची आयात वाढत असून निर्यातीत घट होत आहे. रुपयाचे अवमूल्यन होत राहिले आणि आयात - निर्यातीची परिस्थिती सध्या आहे तशीच राहिली तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा समतोल बिघडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशात खाद्य तेल, डाळी, औद्योगिक वापरातील धातू तसेच इंधन मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. रुपयाच्या अवमूल्यनाने यांचे दर अजून वाढून महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.भाजपा सत्तेत आल्यापासून देशात परकीय गुंतवणूक वाढावी म्हणून प्रयत्न करीत आहे. मेक-इन-इंडिया, स्टार्ट-अप इंडिया आदी उपक्रमांद्वारे परकीय गुंतवणूकदारांसमोर पायघड्या घातल्या जात आहेत. पंतप्रधान स्वत: जगाच्या कानाकोपºयात फिरून तेथील उद्योजकांना देशात गुंतवणुकीचे आवाहन करीत आहेत. असे असताना देशात परकीय गुंतवणूक तर वाढत नाही उलट जी काही गुंतवणूक देशात झालेली आहे, ती काढून घेण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला आहे. आणि वर नमूद केल्याप्रमाणे रु पयाच्या सध्याच्या घसरगुंडीचे हे एक मुख्य कारण आहे. आर्थिक महासत्तेची स्वप्न पाहणाºया देशाच्या राजकीय आणि अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही, असाच याचा अर्थ अभिप्रेत होतो. शासनासह रिझर्व्ह बँकेकडूनही रुपयाची पडझड थांबविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झालेले जाणवत नाहीत हे मात्र आश्चर्यकारक आहे.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट आहेत.)

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारBJPभाजपाFDIपरकीय गुंतवणूक