शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भारतातील ‘जेरी मॅन्डेरिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 02:48 IST

अल्पसंख्य समाजातील स्त्री-पुरुषांची नावे मतदारांच्या यादीत येणार नाहीत आणि घटनेच्या ३२६ व्या कलमाने त्यांना दिलेला मतदानाचा अधिकार त्यांना बजावताच येणार नाही याची व्यवस्था आताचे राजकारण करीत आहे.

अल्पसंख्य समाजातील स्त्री-पुरुषांची नावे मतदारांच्या यादीत येणार नाहीत आणि घटनेच्या ३२६ व्या कलमाने त्यांना दिलेला मतदानाचा अधिकार त्यांना बजावताच येणार नाही याची व्यवस्था आताचे राजकारण करीत आहे. या गैरप्रकाराची राज्यवार नोंद काही प्रतिष्ठित नियतकालिकांनी नुकतीच प्रकाशित केली आहे. उत्तर प्रदेशात अशा वगळलेल्या मुस्लीम मतदारांची संख्या त्यांच्या एकूण संख्येच्या २५ टक्क्यांएवढी मोठी आहे. तोच प्रकार तामिळनाडूत घडला आहे तर आंध्र प्रदेश व तेलंगण यातील स्थितीही याहून वेगळी नाही. घरात चार माणसे असतील तर त्यातील तिघांची नावे यादीत घ्यायची आणि चौथे नाव गाळायचे अशी या अन्यायाची पद्धत आहे. गुजरात व कर्नाटकातील लोकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला असून आपल्या अधिकाराच्या रक्षणासाठी न्यायालयात धावही घेतली आहे. कर्नाटकात अलीकडेच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचेवेळी त्या राज्यातील ६६ लक्ष मुस्लिमांची नावे मतदारयादीत नसल्याचे आढळले. ऐनवेळी त्या यादीत दुरुस्ती करून तीत १२ लक्ष नावे घातली जाऊन त्या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न झाला. ख्रिश्चन व अन्य समाजातील लोकांची १५ टक्के तर मुसलमानांची २५ टक्के मते मतदारयादीत येणार नाहीत असा हा याद्या तयार करण्याचा राष्ट्रीय पातळीवरचा ‘पॅटर्न’ राहिला आहे. निवडणुका आणि त्यात करावयाचे मतदान हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला मूलभूत अधिकार आहे. हा अधिकारच लोकशाहीचे प्राणतत्त्व ठरणारा आहे. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी सर्व तºहेच्या कारवाया करण्याची राजकीय सवय जडलेले पक्ष व पुढारी या अधिकाराचा आपल्या विरोधकांना वापर करताच येणार नाही अशी व्यवस्था करतात. अशा व्यवस्थांचे प्रकारही अनेक आहेत. भारतात वापरली जाणारी विरोधकांची मते गाळण्याची पद्धत अतिशय अभद्र व खालच्या दर्जाची आहे. काही देशात आपले उमेदवार निवडून यावेत म्हणून मतदारसंघांची आखणीच वेडीवाकडी केली जाते. आपल्याला हवे ते मतदार त्या संघात येतील व नको ते बाहेर राहतील असा त्या आखणीचा हेतू असतो. अमेरिकेत अशी आखणी आहे व तिला जेरी मॅन्डेरिंग असे नाव आहे. मतदारांची नावे गाळणे असो वा मॅन्डेरिंग असो हे सारे लोकशाहीविरुद्धचे अपराध आहेत. मात्र त्यांची नेहमीच फार डोळसपणे दखल घेतली जाते असे नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे हे अपराध घडतात आणि पचतातही. भारतात अल्पसंख्य विरोधी राजकारणाला गेल्या चार वर्षात बळ आले आहे. ख्रिश्चन व मुसलमान या धर्मांच्या लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पूर्वीचे राजकारण जाऊन त्या जागी त्यांना त्या प्रवाहापासून दूर करण्याचे प्रयत्न संघटित पातळीवर सुरू झाले आहेत. आसामातील चाळीस लक्ष मुसलमानांचा नागरी अधिकार काढून घेऊन त्यांना परकीय ठरविण्याचा सध्याच्या सरकारचा प्रयत्नही याच पातळीवरचा आहे. भाजप व संघ यांचे हिंदुत्ववादी म्हणजे एक धर्मवादी राजकारण सध्या सत्तेवर आहे आणि त्याला इतरांचा विरोध वा स्पर्धा मान्य होणारी नाही. एक नेता, एक पक्ष, एक धर्म व एक राष्ट्र अशी जी भाषा एकेकाळी हिटलरने जर्मनीत वापरली तीच सध्या भारतात बोलली जाताना आपण राजकारणात पाहतो. त्याचमुळे मोदींना मत न देणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे किंवा आम्हाला मत देणार नाहीत ते या राष्ट्रात राहू शकणार नाहीत असे सर्रास बोलले जाताना सध्या देशाच्या अनेक भागात दिसते. हे राजकारण संघटित केले व अल्पसंख्यकांना वगळले की सत्ता मिळविता येते ही गोष्ट भाजपच्या लक्षात १९९९ मध्ये प्रथम आली व २०१४ च्या निवडणुकीत त्या पक्षाचा तो समज पक्का केला. आता देशाची सारी प्रशासन व्यवस्था व निवडणूक यंत्रणा त्याच्याच ताब्यात असल्यामुळे त्याला हे दुहीचे राजकारण थेट निवडणुकीत अंमलात आणता येणे जमत आहे. हे राजकारण पराभूत करणे हाच लोकशाहीचा विजय ठरणार आहे.