शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad Encounter: म्हातारी मेल्याचे दु:ख नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 03:10 IST

अशा मंडळींची सुटका होताच कामा नये, अशीच देशभरातील सुजाण नागरिकांची भावना आहे.

हैदराबादच्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये ठार झाल्याचे वृत्त येताच देशभर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. हैदराबाद, तेलंगणासह देशात अनेक ठिकाणी मिठाई वाटण्यात आली, पोलिसांवर फुलेही उधळण्यात आली. बलात्कारातील आरोपींना अशीच शिक्षा व्हायला हवी, असे अनेकांनी बोलून दखविले आहे. त्यात संसदेचे अनेक सदस्य म्हणजेच कायदे तयार करणारेही आहेत. बलात्कारातील दोषींना याच स्वरूपाची शिक्षा व्हायला हवी, याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही. कोणत्याही महिलेवर जबरदस्ती करणे, तिचा विनयभंग करणे वा बलात्कार करणे हे अत्यंत घृणास्पदच कृत्य आहे.

अशा मंडळींची सुटका होताच कामा नये, अशीच देशभरातील सुजाण नागरिकांची भावना आहे. त्यामुळेच या चार जणांना पोलिसांनी ठार मारले, याचे कोणालाच दु:ख झालेले नाही आणि होणारही नाही. आतापर्यंत अनेकदा बलात्कारातील आरोपी पुराव्याअभावी सुटले आहेत, पोलीस तपास नीट न झाल्याने आरोपींना कमी शिक्षा झाल्याचेही प्रकार आहेत. शिवाय न्यायालयात प्रकरणे अनेक वर्षे चालत राहतात. त्यामुळे आरोपींना जामीन मिळतो आणि बाहेर आलेले आरोपी त्या महिलेला, तिच्या नातेवाइकांना धमक्या देतात. उनाव बलात्कारपीडितेला आरोपींनी पेटवून दिल्याचा प्रकार कालचाच आहे. या प्रकारांमुळे जनक्षोभ उसळतो आणि आरोपींना भर चौकात वा रस्त्यांवर आणून ठार करा, अशी मागणी येते. खासदार जया बच्चन यांनीही राज्यसभेत अशीच मागणी केली. त्यातून बलात्काऱ्यांविषयी लोकांत किती संताप आहे, हेच दिसते.

हे खरे असले तरी आरोप सिद्ध होण्याआधीच संशयितांना गोळ्या घालून पोलीस ठार मारत असतील, तर ते योग्य आहे का? याचाही विचार सुज्ञपणे करायला हवा. या चारही संशयितांनी त्या तरुणीवर बलात्कार केला असला तरी तो आरोप सिद्ध होण्याआधी त्यांना ठार केले, ही वस्तुस्थिती आहे. अशा चकमकी खºया असतात का, हाही प्रश्न आहे. मुंबईत एके काळी नेहमी चकमकी होत. त्याच्या बातम्याही ठरावीक प्रकारच्या असत. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून वा त्यांनी हल्ला केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमुक गुन्हेगार मेला, त्याचा एक सहकारी अंधाराचा फायदा घेऊ न पळून गेला, अशा त्या बातम्या असायच्या. हैदराबाद प्रकरणातही पोलिसांनी याच प्रकारे चकमक झाल्याचे आणि त्यात चारही आरोपी मेल्याचे म्हटले आहे. देशातील न्यायालयांनी अनेक पोलीस चकमकींविषयी शंका घेतल्या आहेत. काही प्रकरणांत पोलिसांना शिक्षाही झाली आहे.

त्यामुळे मुंबईतील चकमकी पूर्णत: बंद झाल्या आहेत. मात्र अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट तुरुंगात गेले, तर काहींचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळायची असली तरी आरोपी वा गुन्हेगारांना ठार करण्याचा अधिकार त्यांना असावा का, याचाही अतिशय शांतपणे विचार करायला हवा. हैदराबाद प्रकरणीही काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्याबद्दल मानवाधिकार आयोग, महिला आयोग तसेच अनेक कायदेतज्ज्ञ यांनी तेलंगणा सरकार व पोलिसांकडून अहवाल मागविला आहे.

खरेतर, बलात्काराच्या प्रकरणांचा लवकर निकाल लागावा, पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपींना लगेच शिक्षा व्हावी, यादृष्टीने कायद्यात काही दुरुस्त्या व्हायला हव्यात. निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीला माफी देण्याची विनंती राष्ट्रपतींनी फेटाळून लावतील असे दिसते. तशी शिफारस गृह मंत्रालयाने केली आहे. त्या फाशींमध्ये विलंब झाल्याबद्दल संताप व्यक्त करणाºया निर्भयाच्या पालकांनी हैदराबादच्या चौघांना ठार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. संशयितांना ठार केल्याने हैदराबादमधील युवतींच्या कुटुंबीयांनाही न्याय मिळाला, असेच वाटत आहे. त्यांचे म्हणणे समजण्यासारखे आहे. पण याला न्याय म्हणायचे का? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावण्याची भीती लक्षात ठेवायला हवी

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरण