शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

अहंकाराचा परिणाम शेवटी मुलांवरच होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 06:24 IST

लहान मुलांच्या आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कुटुंबातील असंतोष, आईवडिलांमधील वाद हेही त्यामागील कारण आहे. 

- परेश देसाईलहान मुलांच्या आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कुटुंबातील असंतोष, आईवडिलांमधील वाद हेही त्यामागील कारण आहे. वाद हे अहंकारातूनच येतात़ त्यामुळे आईवडिलांनी अहंकार बाजूला ठेवला तरच अशा घटना टाळता येऊ शकतात. कारण कौटुंबिक वादात सर्वांत जास्त जर कोणी भरडला जात असेल तर ती आहेत निष्पाप मुले. त्यांना आपले आईवडील दोन्ही हवेसे वाटतात. परंतु फक्त आपल्या अहंकारासाठी मुलांना आई किंवा वडिलांपासून दूर ठेवणे योग्य वाटते. वाद कौटुंबिक न्यायालयात गेल्यावर पहिला विषय न्यायालयासमोर मुलांच्या भेटण्याचा अधिकार व मुलांच्या पोटगीचा येतो.ज्या पक्षकाराकडे मुलांचा ताबा असतो म्हणजेच जो पक्षकार मुलांचा संरक्षक आहे़, तो गैरसंरक्षक म्हणजे ज्या पक्षकाराकडे मुलांचा ताबा नसतो त्याला मुलांना भेटण्याचा अधिकार देण्यास सुरुवातीपासून नकार देतो. त्यानंतर गैरसंरक्षक पक्षकार मुलांची मानसिक स्थिती जाणण्यासाठी न्यायालयात मानसशास्त्रज्ञांच्या तपासासाठी अडथळा आणतात. मुलांना न्यायालयाच्या बाल संकुलात भेटण्यात विरोध करतात. मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अडी करतात.जर आपण मानसोपचार तज्ज्ञांचे मत मानले तर विभक्त आई-वडिलांचा सर्वांत जास्त मानसिक परिणाम मुलांवर होतो. मुलं हिंसक होऊ शकतात, मुलं उदास होऊ शकतात, ती अलिप्त राहू लागतात, ती सामाजिक होण्यास घाबरतात, त्यांच्यातला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. हे सर्व परिणाम मुलांच्या वाढीस मारक आहेत. याचा सर्व विभक्त आई-वडिलांनी विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.आज आंतरराष्ट्रीय मूल अपहरण प्रकरण भारतात एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्याला कारण परदेशात जर त्या देशाच्या मुलांना बेकायदेशीर / किंवा गैरसंरक्षक पालकांपासून त्याच्या संमतीविना भारतात आणले किंवा दुसऱ्या देशात नेले तर त्याला आंतरराष्ट्रीय अपहरण मानले जाते व त्यानुसार ज्या देशातून मुलांना संरक्षक पालक घेऊन येतात त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढला जातो. हे वॉरंट दूतावासामार्फत बजावले जाऊ शकते. जर दोन देशांत संधी करार असेल तर सदर वॉरंटची बजावणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे केली जाऊ शकते. कायद्यामध्ये दोन देशांत कामेटी आॅफ कोर्ट म्हणजेच एका देशाने दुसºया देशातील न्यायाचा, आदेशाचा मान ठेवणे.(विभक्त आईवडील) हा विषय मुलांसाठी बराच घातक आहे. कारण मुलांसाठी आई-वडील दोघेही त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात. परंतु कौटुंबिक न्यायालयात अशी प्रकरणे येतात ज्यात बाळंतपणासाठी माहेरी गेलेली पत्नी मुलाच्या जन्मानंतर परत सासरी येतच नाही; आणि पती - पत्नीच्या संभाषणाअभावी आणि अहंकारामुळे नवजात मुलाला त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाला मुकावे लागते. अशा प्रकरणात बºयाच वेळा असे दिसून येते की पती-पत्नीच्या भांडणात पत्नी (आई) मुलाला पतीपासून (वडिलांपासून) दूर ठेवण्याचा प्रयत्न करते व अशा प्रकारे काही काळाने प्रकरण न्यायालयात जाते. निष्कर्ष असा की आई-वडील (पती-पत्नी) दोघांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील मतभेद विसरून जास्तीतजास्त वेळ त्यांच्या मुलांना दिला पाहिजे व देशाच्या भावी पिढीच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे़ यातूनच लहान मुलांच्या आत्महत्याही टाळता येतील.(लेखक कौटुंबिक न्यायालयात वकील आहेत)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपDivorceघटस्फोटmarriageलग्न