शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

वराती मागून निघालेले घोडे किती धावणार?

By किरण अग्रवाल | Updated: April 2, 2023 11:35 IST

Water Scarcity : निसर्गाची अवकृपा हातची नसली तरी त्या संकटाला जेव्हा मानवी हातभार लाभून जातो तेव्हा त्याचे दुःख अंमळ जरा जास्तीचेच ठरते.

-  किरण अग्रवाल

उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक असताना आताशी कुठे पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मंजुरी दिली गेली आहे, त्यामुळे ही कामे साकारणार कधी व तुषार्त जीवाच्या तोंडी ते पोहोचणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जाणे स्वाभाविक आहे.

निसर्गाची अवकृपा हातची नसली तरी त्या संकटाला जेव्हा मानवी हातभार लाभून जातो तेव्हा त्याचे दुःख अंमळ जरा जास्तीचेच ठरते. पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबतीतही तेच झाल्याचे म्हणता यावे. आता उन्हाचा चटका जाणवू लागल्यावर, म्हणजे तहान लागल्यावर आपण विहिरी खोदायला निघाल्याचा प्रकार त्यातूनच घडताना दिसत आहे.

यंदा पाऊस चांगला झाला याबद्दल दुमत असूच नये. त्यामुळे धरणे भरलेली आहेत तर विहिरीमधील पाण्याची पातळीही बऱ्यापैकी टिकून आहे, स्वाभाविकच भूजल पातळीही चांगली आहे; पण म्हणून कुठेच पाणीटंचाई नाही असे म्हणता येऊ नये. पाणी असूनही ते हाती किंवा पिता येत नसेल तर भलेही त्याला शासकीय परिभाषेत कृत्रिम टंचाई म्हणा; पण ती टंचाईच आहे व सामान्यांच्या घशाला कोरड आणणारी आहे हे मान्य करायलाच हवे. अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्याला नुकतीच मिळालेली मान्यता पाहता, जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई मान्य करायला मात्र उशीरच झाला हे स्पष्ट व्हावे.

अकोला जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या विविध सभांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यास मंजुरीची मागणी वेळोवेळी केली गेली, इतकेच नव्हे तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला; परंतु यंदा पाऊस चांगला झाला या समजावर झापडबंद राहात त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. पाऊस चांगलाच झाला, पण धरणात किंवा विहिरीत साठलेले पाणी नळांपर्यंत व घरापर्यंत पोहोचवण्यात अडचणी असतील तर टंचाई जाणवणारच! ग्रामीण भागातील वाडी वस्त्यांवर व विशेषत: खारपाणपट्ट्यात तीच वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी दहा ते बारा दिवस पाणी येत नाही. बरे, इतक्या दीर्घ कालावधीनंतर येणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडे भांडीकुंडी तरी आहेत कुठे? यातही पिण्याचे पाणी कसेतरी साठवून ठेवले जाते, पण दैनंदिन आंघोळ, धुणी भांडीच्या वापरासाठी लागणारे पाणी आणणार कोठून असा प्रश्न अनेक गावांमध्ये आहे.

आता एप्रिल महिन्याचा प्रारंभ आहे, म्हणजे दोनच महिने चटक्याचे उरले. ग्रामीण भागात काही ठिकाणची पाणीटंचाई बिकट होत आहे म्हटल्यावर पाणी टंचाई निवारणाचा आराखडा मंजूर केला गेला आहे, पण यातील उपाययोजनांची कामे पूर्णत्वास जाणार कधी व घरादारातील माठांमध्ये पाणी पोहोचणार कधी हा खरा प्रश्न आहे. उन्हाळा संपण्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या घाई गडबडीत सदर कामांची गुणवत्ता राखता येईल का हा यातील दुसरा आणि अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे व त्याही पुढे जाऊन विचार करता तसेच होणार असेल तर त्यातून जनतेच्याच पैशाचा जो अपव्यय होणार आहे त्याची जबाबदारी कुणाची?

मुळात, उन्हाळ्याच्या या मध्याच्याच चरणात उपाययोजनांची उपरती सूचण्यामागील विलंबाची कारणे शोधून त्याची व्यवहार्य मिमांसा करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक सारखे जे प्रशासनाचे घटक काम करतात ते आपल्या येथील टंचाईचा नीटसा अंदाज बांधू शकले नाहीत, की जिल्हा मुख्यालयी वातानुकूलित कक्षात बसणाऱ्या वरिष्ठांना त्या वस्तुस्थितीचे आकलन होऊ शकले नाही? दुसरे म्हणजे, समस्या समजून घ्यायलाच उशीर करून नंतर घाईगर्दीत कामे आटोपण्याचा व्यवहाराशी संबंध असल्याचे आरोप नेहमीच होत असतात; त्यामुळे प्रस्तुत प्रकरणातही हे सारे जाणीवपूर्वक घडून येत असावे की काय, अशी शंका घेतली जाणे गैर ठरू नये. वराती मागून निघालेले पाणीटंचाई निवारणाचे घोडे उर्वरित वेळेत किती धावणार असा प्रश्न उपस्थित होतो तो त्यामुळेच.

सारांशात, पाणीटंचाई निवारणाच्या कामांना उशिरा का होईना मंजुरी मिळाली असल्याने आता ही कामे गुणवत्ता राखून लवकरात लवकर साकारण्याबाबत काळजी घेतली जाणे गरजेचे बनले आहे. या एकूणच कामातील ''विलंबित ताला''शी जे अर्थकारणाचे अंदाज बांधले जातात ते खोटे ठरवायचे असतील तर त्याकडे अधिकच गांभीर्याने बघणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई