शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वराती मागून निघालेले घोडे किती धावणार?

By किरण अग्रवाल | Updated: April 2, 2023 11:35 IST

Water Scarcity : निसर्गाची अवकृपा हातची नसली तरी त्या संकटाला जेव्हा मानवी हातभार लाभून जातो तेव्हा त्याचे दुःख अंमळ जरा जास्तीचेच ठरते.

-  किरण अग्रवाल

उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक असताना आताशी कुठे पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मंजुरी दिली गेली आहे, त्यामुळे ही कामे साकारणार कधी व तुषार्त जीवाच्या तोंडी ते पोहोचणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जाणे स्वाभाविक आहे.

निसर्गाची अवकृपा हातची नसली तरी त्या संकटाला जेव्हा मानवी हातभार लाभून जातो तेव्हा त्याचे दुःख अंमळ जरा जास्तीचेच ठरते. पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबतीतही तेच झाल्याचे म्हणता यावे. आता उन्हाचा चटका जाणवू लागल्यावर, म्हणजे तहान लागल्यावर आपण विहिरी खोदायला निघाल्याचा प्रकार त्यातूनच घडताना दिसत आहे.

यंदा पाऊस चांगला झाला याबद्दल दुमत असूच नये. त्यामुळे धरणे भरलेली आहेत तर विहिरीमधील पाण्याची पातळीही बऱ्यापैकी टिकून आहे, स्वाभाविकच भूजल पातळीही चांगली आहे; पण म्हणून कुठेच पाणीटंचाई नाही असे म्हणता येऊ नये. पाणी असूनही ते हाती किंवा पिता येत नसेल तर भलेही त्याला शासकीय परिभाषेत कृत्रिम टंचाई म्हणा; पण ती टंचाईच आहे व सामान्यांच्या घशाला कोरड आणणारी आहे हे मान्य करायलाच हवे. अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्याला नुकतीच मिळालेली मान्यता पाहता, जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई मान्य करायला मात्र उशीरच झाला हे स्पष्ट व्हावे.

अकोला जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या विविध सभांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यास मंजुरीची मागणी वेळोवेळी केली गेली, इतकेच नव्हे तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला; परंतु यंदा पाऊस चांगला झाला या समजावर झापडबंद राहात त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. पाऊस चांगलाच झाला, पण धरणात किंवा विहिरीत साठलेले पाणी नळांपर्यंत व घरापर्यंत पोहोचवण्यात अडचणी असतील तर टंचाई जाणवणारच! ग्रामीण भागातील वाडी वस्त्यांवर व विशेषत: खारपाणपट्ट्यात तीच वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी दहा ते बारा दिवस पाणी येत नाही. बरे, इतक्या दीर्घ कालावधीनंतर येणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडे भांडीकुंडी तरी आहेत कुठे? यातही पिण्याचे पाणी कसेतरी साठवून ठेवले जाते, पण दैनंदिन आंघोळ, धुणी भांडीच्या वापरासाठी लागणारे पाणी आणणार कोठून असा प्रश्न अनेक गावांमध्ये आहे.

आता एप्रिल महिन्याचा प्रारंभ आहे, म्हणजे दोनच महिने चटक्याचे उरले. ग्रामीण भागात काही ठिकाणची पाणीटंचाई बिकट होत आहे म्हटल्यावर पाणी टंचाई निवारणाचा आराखडा मंजूर केला गेला आहे, पण यातील उपाययोजनांची कामे पूर्णत्वास जाणार कधी व घरादारातील माठांमध्ये पाणी पोहोचणार कधी हा खरा प्रश्न आहे. उन्हाळा संपण्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या घाई गडबडीत सदर कामांची गुणवत्ता राखता येईल का हा यातील दुसरा आणि अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे व त्याही पुढे जाऊन विचार करता तसेच होणार असेल तर त्यातून जनतेच्याच पैशाचा जो अपव्यय होणार आहे त्याची जबाबदारी कुणाची?

मुळात, उन्हाळ्याच्या या मध्याच्याच चरणात उपाययोजनांची उपरती सूचण्यामागील विलंबाची कारणे शोधून त्याची व्यवहार्य मिमांसा करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक सारखे जे प्रशासनाचे घटक काम करतात ते आपल्या येथील टंचाईचा नीटसा अंदाज बांधू शकले नाहीत, की जिल्हा मुख्यालयी वातानुकूलित कक्षात बसणाऱ्या वरिष्ठांना त्या वस्तुस्थितीचे आकलन होऊ शकले नाही? दुसरे म्हणजे, समस्या समजून घ्यायलाच उशीर करून नंतर घाईगर्दीत कामे आटोपण्याचा व्यवहाराशी संबंध असल्याचे आरोप नेहमीच होत असतात; त्यामुळे प्रस्तुत प्रकरणातही हे सारे जाणीवपूर्वक घडून येत असावे की काय, अशी शंका घेतली जाणे गैर ठरू नये. वराती मागून निघालेले पाणीटंचाई निवारणाचे घोडे उर्वरित वेळेत किती धावणार असा प्रश्न उपस्थित होतो तो त्यामुळेच.

सारांशात, पाणीटंचाई निवारणाच्या कामांना उशिरा का होईना मंजुरी मिळाली असल्याने आता ही कामे गुणवत्ता राखून लवकरात लवकर साकारण्याबाबत काळजी घेतली जाणे गरजेचे बनले आहे. या एकूणच कामातील ''विलंबित ताला''शी जे अर्थकारणाचे अंदाज बांधले जातात ते खोटे ठरवायचे असतील तर त्याकडे अधिकच गांभीर्याने बघणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई