शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विखेंचा घरचा अहेर

By admin | Updated: July 10, 2017 00:05 IST

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे खरंच.

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे खरंच. राजकारणातील हा खळाळ परस्परविरोधी ओंडक्यांना एकत्र आणतो, तसा समविचारी ओंडक्यांची ताटातूटही करतो. सगळ्यांनाच सत्तेची ओढ असते. विरोधी पक्षनेतेपदावर बसलेल्या व्यक्तीचा तर एक डोळा कायम मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असतो. आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री, असे म्हटले जाते. पण मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी पक्षनेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांवर रान उठवून सरकारला सळो की पळो करून सोडायला हवे. जनतेच्या मनात सरकारप्रति रोष उत्पन्न करून विरोधी पक्षाबद्दल विश्वास निर्माण करायला हवा. आजवरच्या विरोधी पक्षनेत्यांनी हेच केले. पण राधाकृष्ण विखे-पाटील त्यास अपवाद आहेत. विखे-पाटलांचा जीव विरोधी पक्षात रमत नाही, ते ‘टिळक भवन’ऐवजी ‘वर्षा’वरच अधिक असतात, सरकारवर तुटून पडण्याऐवजी ते सरकारला सांभाळून घेतात, अशी आजवर दबक्या आवाजात चर्चा होती. पण परवा शिर्डीत विखे यांनी स्वत:च खुलासा करून टाकला की, त्यांना हे सरकार अगदी घरच्यासारखे वाटतं!खरं तर विखेंनी हा खुलासा करण्याची गरज नव्हती. त्यांच्या कृतीतूनच ते दिसून येत होते. कर्जमाफीचे आंदोलन उभे राहू नये, यासाठी विखेंनी केलेला खटाटोप जगजाहीर आहे. पुणतांब्यातील तथाकथित पुढाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांचा संप मोडित काढण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला, हे सर्वांनीच पाहिले. एवढी तत्परता तर सत्ताधाऱ्यांनीही दाखविली नव्हती. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना विखे गावी होते. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून विखेंनी ब्र उच्चारला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीकडे तर ते फिरकलेच नाहीत, हा काँग्रेस आमदारांचा आरोपही खोटा नव्हता. थोडक्यात, विखे विरोधी पक्षनेते पदावर राहून सत्ताधाऱ्यांशी सलग वाढवत आहेत, हे त्यांच्या उक्ती आणि कृतीवरून दिसून येते. विखेंसारखा विरोधी पक्षनेता आपण राज्याच्या इतिहासात आजवर पाहिला नाही, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले प्रशस्तीपत्र बरेच बोलके आहे. या अगोदरच्या युती सरकारच्या काळात विखेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेशी घरोबा केला होताच. आताही त्यांचे पाऊल भाजपाच्या दिशेने पडत आहे का? की बंधू अशोक विखे यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीची फाईल सरकारने उघडू नये म्हणून चाललेली ही धडपड आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. मुख्यमंत्र्यांनी तसे सुतोवाच केले आहे.