शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

विखेंचा घरचा अहेर

By admin | Updated: July 10, 2017 00:05 IST

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे खरंच.

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे खरंच. राजकारणातील हा खळाळ परस्परविरोधी ओंडक्यांना एकत्र आणतो, तसा समविचारी ओंडक्यांची ताटातूटही करतो. सगळ्यांनाच सत्तेची ओढ असते. विरोधी पक्षनेतेपदावर बसलेल्या व्यक्तीचा तर एक डोळा कायम मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असतो. आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री, असे म्हटले जाते. पण मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी पक्षनेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांवर रान उठवून सरकारला सळो की पळो करून सोडायला हवे. जनतेच्या मनात सरकारप्रति रोष उत्पन्न करून विरोधी पक्षाबद्दल विश्वास निर्माण करायला हवा. आजवरच्या विरोधी पक्षनेत्यांनी हेच केले. पण राधाकृष्ण विखे-पाटील त्यास अपवाद आहेत. विखे-पाटलांचा जीव विरोधी पक्षात रमत नाही, ते ‘टिळक भवन’ऐवजी ‘वर्षा’वरच अधिक असतात, सरकारवर तुटून पडण्याऐवजी ते सरकारला सांभाळून घेतात, अशी आजवर दबक्या आवाजात चर्चा होती. पण परवा शिर्डीत विखे यांनी स्वत:च खुलासा करून टाकला की, त्यांना हे सरकार अगदी घरच्यासारखे वाटतं!खरं तर विखेंनी हा खुलासा करण्याची गरज नव्हती. त्यांच्या कृतीतूनच ते दिसून येत होते. कर्जमाफीचे आंदोलन उभे राहू नये, यासाठी विखेंनी केलेला खटाटोप जगजाहीर आहे. पुणतांब्यातील तथाकथित पुढाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांचा संप मोडित काढण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला, हे सर्वांनीच पाहिले. एवढी तत्परता तर सत्ताधाऱ्यांनीही दाखविली नव्हती. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना विखे गावी होते. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून विखेंनी ब्र उच्चारला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीकडे तर ते फिरकलेच नाहीत, हा काँग्रेस आमदारांचा आरोपही खोटा नव्हता. थोडक्यात, विखे विरोधी पक्षनेते पदावर राहून सत्ताधाऱ्यांशी सलग वाढवत आहेत, हे त्यांच्या उक्ती आणि कृतीवरून दिसून येते. विखेंसारखा विरोधी पक्षनेता आपण राज्याच्या इतिहासात आजवर पाहिला नाही, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले प्रशस्तीपत्र बरेच बोलके आहे. या अगोदरच्या युती सरकारच्या काळात विखेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेशी घरोबा केला होताच. आताही त्यांचे पाऊल भाजपाच्या दिशेने पडत आहे का? की बंधू अशोक विखे यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीची फाईल सरकारने उघडू नये म्हणून चाललेली ही धडपड आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. मुख्यमंत्र्यांनी तसे सुतोवाच केले आहे.