शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

इतिहासाची उजळणी

By admin | Updated: October 11, 2015 22:09 IST

असं म्हणतात की, इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विशिष्ट कालावधीनंतर पुनरावृत्त होत असतात. अर्थात अशा घटनांमधील तपशील भिन्न असतो पण सार मात्र एकसमान असते.

असं म्हणतात की, इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विशिष्ट कालावधीनंतर पुनरावृत्त होत असतात. अर्थात अशा घटनांमधील तपशील भिन्न असतो पण सार मात्र एकसमान असते. यातील एक घटना १९८७ सालातली. पंतप्रधान राजीव गांधी यांची पत्रकार परिषद सुरू होती. देशी-विदेशी पत्रकार खच्चून भरले होते. परिषदेचे थेट प्रक्षेपणही सुरू होते. आणि अचानक राजीव गांधी यांनी परराष्ट्र सचिव ए. पी. व्यंकटेश्वरम यांची तिथल्या तिथे उचलबांगडी जाहीर केली. व्यंकटेश्वरम यांनी इस्लामाबाद आणि न्यूयॉर्क येथे केलेल्या काही वक्तव्यांपायी पंतप्रधान अडचणीत आले होते, असे तेव्हा जाहीर केले गेले. अर्थात पंतप्रधानांच्या त्या निर्णयावर बरीच टीकाही झाली होती. दुसरा प्रसंग ए. आर. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा म्हणजे १९८० सालातला. रात्री ते दिल्लीहून परत आले आणि येतानाच त्यांच्या सचिवांनी पत्रकारांना घाईने वर्षावर बोलावून घेतले. ‘शालिनी पाटील यांनी माझा विश्वास गमावला असल्याने त्या आता माझ्या मंत्रिमंडळाच्या सदस्य नाहीत’ इतकीच घोषणा त्यांनी केली व परिषद आटोपती घेतली. आता त्यानंतरची घटना गेल्या शुक्रवारची. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशीच घाईगर्दीत एक पत्रकार परिषद पाचारण केली आणि त्यांचेच एक सहकारी व दिल्लीचे अन्न तसेच पर्यावरण मंत्री असीम अहमद खान यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्याची घोषणा त्यांनी केली. आसीम खान यांनी त्यांच्या मातिया महल मतदारसंघातील एका बिल्डरला मदत करण्यासाठी सहा लाखांची लाच मागितल्यावरून ही कारवाई केली गेल्याचे सांगतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आपल्या मंत्र्यालाही आपण पाठीशी घालीत नाही हे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर आता पंतप्रधानांनीही वसुंधराराजे व शिवराजसिंह चौहान यांना डच्चू देऊन दाखवावे असे आव्हान करताना केजरीवालांनी राजकारणही साधून घेतले. गेल्या आठ महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील बडतर्फ होणारे असीम खान हे दुसरे मंत्री. याआधी शैक्षणिक पात्रतेची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल जितेन्द्रसिंह तोमर यांना घरी जावे लागले होते. थेट पत्रकारांच्या पुढ्यात आपल्याच एका मंत्र्याला घरी पाठविण्याची घोषणा करून आपण सत्कृत्य केले असे जरी केजरीवालांना वाटत असले तरी मूलत: आपली माणसे निवडतानाच कुठेतरी गफलत झाल्याचे त्यांनाही मान्य करावेच लागेल.