शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

इतिहासाची उजळणी

By admin | Updated: October 11, 2015 22:09 IST

असं म्हणतात की, इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विशिष्ट कालावधीनंतर पुनरावृत्त होत असतात. अर्थात अशा घटनांमधील तपशील भिन्न असतो पण सार मात्र एकसमान असते.

असं म्हणतात की, इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विशिष्ट कालावधीनंतर पुनरावृत्त होत असतात. अर्थात अशा घटनांमधील तपशील भिन्न असतो पण सार मात्र एकसमान असते. यातील एक घटना १९८७ सालातली. पंतप्रधान राजीव गांधी यांची पत्रकार परिषद सुरू होती. देशी-विदेशी पत्रकार खच्चून भरले होते. परिषदेचे थेट प्रक्षेपणही सुरू होते. आणि अचानक राजीव गांधी यांनी परराष्ट्र सचिव ए. पी. व्यंकटेश्वरम यांची तिथल्या तिथे उचलबांगडी जाहीर केली. व्यंकटेश्वरम यांनी इस्लामाबाद आणि न्यूयॉर्क येथे केलेल्या काही वक्तव्यांपायी पंतप्रधान अडचणीत आले होते, असे तेव्हा जाहीर केले गेले. अर्थात पंतप्रधानांच्या त्या निर्णयावर बरीच टीकाही झाली होती. दुसरा प्रसंग ए. आर. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा म्हणजे १९८० सालातला. रात्री ते दिल्लीहून परत आले आणि येतानाच त्यांच्या सचिवांनी पत्रकारांना घाईने वर्षावर बोलावून घेतले. ‘शालिनी पाटील यांनी माझा विश्वास गमावला असल्याने त्या आता माझ्या मंत्रिमंडळाच्या सदस्य नाहीत’ इतकीच घोषणा त्यांनी केली व परिषद आटोपती घेतली. आता त्यानंतरची घटना गेल्या शुक्रवारची. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशीच घाईगर्दीत एक पत्रकार परिषद पाचारण केली आणि त्यांचेच एक सहकारी व दिल्लीचे अन्न तसेच पर्यावरण मंत्री असीम अहमद खान यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्याची घोषणा त्यांनी केली. आसीम खान यांनी त्यांच्या मातिया महल मतदारसंघातील एका बिल्डरला मदत करण्यासाठी सहा लाखांची लाच मागितल्यावरून ही कारवाई केली गेल्याचे सांगतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आपल्या मंत्र्यालाही आपण पाठीशी घालीत नाही हे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर आता पंतप्रधानांनीही वसुंधराराजे व शिवराजसिंह चौहान यांना डच्चू देऊन दाखवावे असे आव्हान करताना केजरीवालांनी राजकारणही साधून घेतले. गेल्या आठ महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील बडतर्फ होणारे असीम खान हे दुसरे मंत्री. याआधी शैक्षणिक पात्रतेची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल जितेन्द्रसिंह तोमर यांना घरी जावे लागले होते. थेट पत्रकारांच्या पुढ्यात आपल्याच एका मंत्र्याला घरी पाठविण्याची घोषणा करून आपण सत्कृत्य केले असे जरी केजरीवालांना वाटत असले तरी मूलत: आपली माणसे निवडतानाच कुठेतरी गफलत झाल्याचे त्यांनाही मान्य करावेच लागेल.