शहरं
Join us  
Trending Stories
1
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत परसेल अंधकारा, कोण कोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
4
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
5
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
6
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
7
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
8
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
9
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
10
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
11
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
12
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
13
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
14
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
15
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
16
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
17
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
18
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
20
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाची उजळणी

By admin | Updated: October 11, 2015 22:09 IST

असं म्हणतात की, इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विशिष्ट कालावधीनंतर पुनरावृत्त होत असतात. अर्थात अशा घटनांमधील तपशील भिन्न असतो पण सार मात्र एकसमान असते.

असं म्हणतात की, इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विशिष्ट कालावधीनंतर पुनरावृत्त होत असतात. अर्थात अशा घटनांमधील तपशील भिन्न असतो पण सार मात्र एकसमान असते. यातील एक घटना १९८७ सालातली. पंतप्रधान राजीव गांधी यांची पत्रकार परिषद सुरू होती. देशी-विदेशी पत्रकार खच्चून भरले होते. परिषदेचे थेट प्रक्षेपणही सुरू होते. आणि अचानक राजीव गांधी यांनी परराष्ट्र सचिव ए. पी. व्यंकटेश्वरम यांची तिथल्या तिथे उचलबांगडी जाहीर केली. व्यंकटेश्वरम यांनी इस्लामाबाद आणि न्यूयॉर्क येथे केलेल्या काही वक्तव्यांपायी पंतप्रधान अडचणीत आले होते, असे तेव्हा जाहीर केले गेले. अर्थात पंतप्रधानांच्या त्या निर्णयावर बरीच टीकाही झाली होती. दुसरा प्रसंग ए. आर. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा म्हणजे १९८० सालातला. रात्री ते दिल्लीहून परत आले आणि येतानाच त्यांच्या सचिवांनी पत्रकारांना घाईने वर्षावर बोलावून घेतले. ‘शालिनी पाटील यांनी माझा विश्वास गमावला असल्याने त्या आता माझ्या मंत्रिमंडळाच्या सदस्य नाहीत’ इतकीच घोषणा त्यांनी केली व परिषद आटोपती घेतली. आता त्यानंतरची घटना गेल्या शुक्रवारची. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशीच घाईगर्दीत एक पत्रकार परिषद पाचारण केली आणि त्यांचेच एक सहकारी व दिल्लीचे अन्न तसेच पर्यावरण मंत्री असीम अहमद खान यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्याची घोषणा त्यांनी केली. आसीम खान यांनी त्यांच्या मातिया महल मतदारसंघातील एका बिल्डरला मदत करण्यासाठी सहा लाखांची लाच मागितल्यावरून ही कारवाई केली गेल्याचे सांगतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आपल्या मंत्र्यालाही आपण पाठीशी घालीत नाही हे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर आता पंतप्रधानांनीही वसुंधराराजे व शिवराजसिंह चौहान यांना डच्चू देऊन दाखवावे असे आव्हान करताना केजरीवालांनी राजकारणही साधून घेतले. गेल्या आठ महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील बडतर्फ होणारे असीम खान हे दुसरे मंत्री. याआधी शैक्षणिक पात्रतेची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल जितेन्द्रसिंह तोमर यांना घरी जावे लागले होते. थेट पत्रकारांच्या पुढ्यात आपल्याच एका मंत्र्याला घरी पाठविण्याची घोषणा करून आपण सत्कृत्य केले असे जरी केजरीवालांना वाटत असले तरी मूलत: आपली माणसे निवडतानाच कुठेतरी गफलत झाल्याचे त्यांनाही मान्य करावेच लागेल.