शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आपण लाज-लज्जा गमावली आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 5:44 AM

विद्यार्थी अनेक कारणांनी सध्या तणावात आहेत. कधी स्वत:पाशी पुरेशा पदव्या नसल्याची त्यांना चिंता वाटते तर कधी शिक्षणाच्या दर्जाने ते चिंतित असतात.

- डॉ. एस. एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)विद्यार्थी अनेक कारणांनी सध्या तणावात आहेत. कधी स्वत:पाशी पुरेशा पदव्या नसल्याची त्यांना चिंता वाटते तर कधी शिक्षणाच्या दर्जाने ते चिंतित असतात. वाढलेली फी, रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचा अभाव, परीक्षेनंतर मूल्यांकनातील घोटाळे, उशिरा लागणारे निकाल आणि उत्तीर्ण झाल्यावर रोजगाराच्या संधी न मिळणे, हीदेखील त्यांच्या चिंतेची कारणे असतात. त्यामुळे विद्यार्थी जर तणावाखाली असतील तर ते आपल्या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया देतात किंवा बाह्य जगताचे चुकीचे आकलन करतात. त्यासाठी जबाबदार कोण? अति ताणामुळे किंवा परिस्थितीला तोंड देण्यास कमी पडल्याने विद्यार्थी दबावाखाली येतात. अशावेळी सरकारचे किंवा समाजाचे कर्तव्य काय असते?

कधी कधी अतिरिक्त ताण हा व्यक्तीला अधिक कार्यप्रवणही करू शकतो. अस्तित्वासाठी त्याची गरजही असते. धोका समोर दिसत असताना त्याचा मुकाबला केव्हा करायचा किंवा त्यापासून दूर केव्हा जायचे, हेही आपल्याला समजत असते. पण एखादवेळी अनेक प्रश्नांना एकाचवेळी सामोरे जाण्याचा प्रसंग येऊन त्याचा सामना करण्यास व्यक्ती कमी पडते तेव्हा ती स्थिती अपायकारक ठरू शकते. तेलंगणात अशी स्थिती निर्माण झाल्यावर काय करायला हवे, याचा अंदाज न आल्याने २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. तेलंगणा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल १८ एप्रिलला जाहीर झाला. तो लावताना सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे गुण आणि परीक्षा क्रमांक यांची अनेक ठिकाणी योग्य जुळवणी न झाल्याने अनेक विद्यार्थी नापास घोषित झाले. त्यामुळे निराशेने घेरून काहींनी आत्महत्या केली. एखाद्याने आत्महत्या केल्यावर त्याच्यामागे जे आप्त असतात, त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते, पण याची पूर्वकल्पना तरी कुणाला असते?
जाणीवपूर्वक जर कुणासाठी तणावाची स्थिती निर्माण करण्यात आली तर त्याला तोंड द्यावे लागणाऱ्या व्यक्तीला भावनिक आघाताला सामोरे जावे लागते. या वेळी त्या स्थितीला सामोरे गेलेले विद्यार्थी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसानभरपाई मिळण्यासाठी परतही येऊ शकत नाहीत. त्यांच्या पालकांना तुटपुंज्या नुकसानभरपाईच्या रकमेवर समाधान मानावे लागते. तेवढ्याने समाजाला किंवा सरकारला स्वत:च्या जबाबदारीतून मुक्त होता येते का?मुलांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यावर आणि पालकांकडून त्या घटनांचा निषेध व्यक्त होऊ लागल्यावर तेलंगणा सरकारने सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे विनामूल्य फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. याला न्याय म्हणायचे? जर नियमात फेरमूल्यांकनाची तरतूद होती तर ते यापूर्वीच का करण्यात आले नव्हते? सरकारने या घटनेकडे उपेक्षेने का बघितले? या घटनेला स्वत:हून दखलपात्र ठरवून सर्वोच्च न्यायालयाने त्याविरोधात सार्वजनिक हितयाचिका का दाखल करून घेतली नाही आणि सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर कोरडे का ओढले नाहीत? आपण सर्व जण समाज या नात्याने किंवा एक राष्ट्र म्हणून त्याविषयी शोकदेखील व्यक्त करीत नाही? आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का?आत्महत्या हा तात्पुरत्या प्रश्नाचा कायमचा तोडगा असतो. पण अशा प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आपण एखादी पद्धत निर्माण करू शकलो आहोत का? आत्महत्या ही अनेकदा माणसाच्या भेकडपणातून जन्माला येत असते, पण ती नेहमीच तशी नसते. २०१६ साली १५ ते ३९ या वयोगटातील २,३०,३१४ माणसांनी आत्महत्या केली होती. दरवर्षी संपूर्ण जगात १० लाख लोक आत्महत्या करतात, त्यात १७ टक्के लोक भारतातील असतात! त्यातही दक्षिणेकडील राज्यात हे प्रमाण भयावह आहे आणि त्यात पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चढ-उतार हे येतच असतात. ते जेव्हा आपल्या आवाक्यात असतात तेव्हा आपण त्यांना समर्थपणे तोंड देतो. पण ते जेव्हा आवाक्याबाहेर जातात, तेव्हा माणसाच्या मनात डिप्रेशन येते. त्यामुळे त्याला त्या संकटाला आपण तोंड देऊ शकत नाही, याची लाज वाटते. ती असह्य झाली की माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. तेलंगणात नेमके असेच झाले. तेव्हा समाज या नात्याने आपण अपयशी ठरलो, असे म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांनीही परीक्षेनंतर मन शांत ठेवले पाहिजे. परीक्षेतील यशापयश हेच काही जीवनात सर्वस्व नसते. परीक्षेतील अपयशानंतरही आपण जीवनात यशस्वी ठरू शकू, याचा विश्वास त्यांनी बाळगायला हवा. जीवनात शिस्त असली की ती माणसाला अशा प्रसंगांचा सामना करण्यास शिकवते. अडचणीच्या वेळी मित्रांची आणि कुटुंबाची मदत मागण्यात काहीच गैर नसते.या घटनेने पालकांनासुद्धा योग्य धडा मिळाला आहे. मुलांमध्ये डिप्रेशन निर्माण झाले की ते स्वत:ची विचार करण्याची शक्ती गमावून बसतात. ‘माझ्या नसण्याने कुटुंबाचे फार काही नुकसान होणार नाही.’ या तºहेच्या विचारापासून मुलांना दूर ठेवायला हवे. डिप्रेशनवरही मात करता येते हे मुलांना समजावून सांगावे. मुलांशी आडवळणाने बोलण्यापेक्षा त्यांच्याशी सरळ बोलावे. प्रश्न आपोआप सुटतील असा विचार करून प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये. अल्कोहोल किंवा ड्रग्ज यांच्या आहारी गेलेल्यांना त्यापासून परावृत्त करता येते. त्यासाठी मुलांकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुलांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली की ती भावना त्यांना लाज आणते. त्यापासून मुलांना वाचवायचे असेल तर मुलांवर प्रेम करणे, त्यांना योग्य सल्ला आणि शिक्षण देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र