शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election: बंदे में हैं दम...देशाचा ‘मूड’ बदललेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:15 IST

केवळ सामाजिक पार्श्वभूमी असलेली व्यक्ती दिल्लीची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते याचाच अर्थ राजकीय दडपणात मतदार येत नाहीत. विजय मिळताच अरविंद केजरीवालांनी ‘राष्ट्र निर्माण के लिए आप से जुडे’ असे दिल्लीकरांना आवाहन केले. याचाच अर्थ पुढच्या पाच वर्षांत त्यांची ही नीती मोदींच्या ‘राष्ट्रवादा’पुढे दंड थोपटणार आहे.

अरविंद केजरीवाल हे दिल्लीत सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या केजरीवालांनी ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान दिल्लीतील सुजाण जनतेने त्यांना भरघोस मते देऊन केला आहे. आजच्या निकालाने देशाचा ‘मूड’ बदललेला दिसतो.

जनतेला धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे विषय नकोत, तर सलोखा हवा आहे. पायाभूत सुविधांच्या तुलनेत ३७०, सीएए, एनआरसी हे मुद्दे मतदारांसाठी दुय्यम ठरतात, हेही आजच्या निकालाने सिद्ध झाले आहे. केजरीवालांना आव्हान देण्यासाठी अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ, सव्वादोनशे खासदार, विविध राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री, नेते मैदानात उतरले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेत गल्लीबोळात मंत्री-खासदारांना पाठविले. पत्रके वाटली. कलम ३७०, बाटला हाऊस चकमक, सीएए, एनआरसी, शाहीनबाग, जामिया मिलिया विद्यापीठ ते पाकिस्तान हे विषय भाजप नेत्यांच्या भाषणात होते. काही नेते केजरीवालांना आतंकवादी ठरवून मोकळे झाले. चवताळलेल्या एका मंत्र्याने ‘गोली मारो...’ अशी वक्तव्ये केली. भाजप नेत्यांच्या प्रचारात कोणतेही स्थानिक मुद्दे नव्हते आणि कॉँग्रेसने सुरुवातीपासूनच तलवार ‘म्यान’ केली होती. धुव्रीकरणातून मतविभाजनाचा फटका केजरीवालांना बसू शकतो, हे गृहीत धरूनच भाजपने रणनीती आखली. मोदी-शहा यांची भाषणे केवळ राष्टÑवादापुढेच पिंगा घालणारी होती. ज्यांना स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्टÑवाद महत्त्वाचा वाटत होता असा थोडाफार मतदार भाजपकडे वळला. परंतु निकालाअंती केवळ तीन-चार जागा वाढण्यापलीकडे भाजपच्या हाती विशेष काही लागले नाही.

केजरीवालांकडे केवळ विकासाचा मुद्दा होता. त्यांनी राबविलेल्या योजनांवर दिल्लीकर फिदा होते. हीच नाळ पकडत त्यांनी मी तुम्हाला मोफत पाणी दिले, २०० युनिट मोफत वीज दिली, महिलांना दिल्ली परिवहनच्या बसमध्ये मोफत प्रवास, सरकारी शाळा सर्वोत्तम केल्या, मोहल्ला क्लिनिक, शहिदांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मदत केली तरीही, तुमचा मुलगा आतंकवादी ठरतो का? ही केजरीवालांची भावनिक साद शेवटच्या आठवड्यात आम आदमी पार्टीचा घसरता आलेख सावरण्यास खूपच फलदायी ठरली. त्यांच्या भाषणात विष नव्हते आणि कोणत्याही धर्माबाबत द्वेषभावना नव्हती. उलट त्यांनी ‘हनुमान चालिसा’ वाचून हनुमानापुढे नतमस्तक होत स्वत:ला शाहीनबागपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. २०१५ मध्ये सत्तेत आल्यावर भाजपचे केवळ तीन आमदार होेते. केजरीवालांची सुरुवातीची दोन वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपालांवर आरोप करण्यात गेले. केंद्र सरकार काम करू देत नसल्याचे युद्ध न्यायालयापर्यंत पोहोचले. सर्वोच्च न्यायालयास मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांची कार्यकक्षा आखून द्यावी लागली. त्यानंतरच केजरीवालांना विविध योजना मुक्तपणे राबविता आल्यात. गेल्या तीन वर्षांत केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि त्यांच्या टीमने दिवस-रात्र खूप कामे केलीत.

केवळ सामाजिक पार्श्वभूमी असलेली व्यक्ती दिल्लीची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते याचाच अर्थ राजकीय दडपणात मतदार येत नाहीत. मोठमोठाली मंदिरे, मशिदी उभारून रोजगाराचे प्रश्न मिटतील? महागाई कमी होईल? अन्न-वस्त्र-निवाºयाचा प्रश्न मिटेल? याबाबत मतदार जागरूक झाला आहे. जो धर्माचे विष ओकण्याचे थांबवेल तोच राजकारणात टिकेल. कॉँग्रेसला आणि भाजपला जे जमले नाही ते केजरीवालांनी करून दाखवले. पण या उत्सवी वातावरणात केजरीवालांना नव्या जबाबदारीची जाणीव कायम राहावी. वीज, पाणी, प्रदूषण, परिवहन, शिक्षण, आरोग्य व सुरक्षेसाठी आप सरकार देशभरासाठी नवा प्रवाह निर्माण करू शकते. ही पाच वर्षे त्यासाठीच दिल्लीकरांनी दिली. याचे भान नेहमी जागृत राहावे. कारण नवा सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रवाह दिल्लीतूनच निर्माण होण्याची सद्यस्थितीत नितांत गरज आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस