शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मार्गदर्शक समीक्षक

By admin | Updated: January 28, 2015 04:34 IST

साहित्य आणि ललितकला यांचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात अंत:प्रेरणेने जाणवायचे असते. त्याची वस्तुनिष्ठता म्हणजे पदार्थविज्ञानातील सत्य नसते.

राजेंद्र दर्डा,एडिटर इन चीफ, लोकमत - काळ बदलला. माणसं बदलली. आडव्या पट्ट्याचा कोट, धोतर असणारा आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ मात्र नाही बदलला. त्याच्या चष्म्याचा नंबरही नाही बदलला. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. ३१ मार्च १९९१, लोकमत टाइम्सच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कॉमन मॅन मला औरंगाबादेत भेटला. लोकमत भवनमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमात व्यंगचित्रांचे जादूगार आर. के. लक्ष्मण हे विशेष पाहुणे होते. त्यांनी व्यंगचित्रे काढावीत, अशी सर्वांची अपेक्षा होती. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला स्टँडवर लावलेला फळा आणि त्यावर लटकवलेला पांढरा कागद पाहून स्वत: आर. के. यांना कळून चुकले होते, की व्यंगचित्र काढल्याशिवाय सुटका होणार नाही आणि म्हणूनच मी सूचित करताच ‘मला त्याची कल्पना होतीच’ असे काहीसे हसत बोलून ते फळ्याकडे वळले. ते फळ्याजवळ उभे राहिले. सर्व श्रोते क्षणात प्रेक्षक बनले. नुसते प्रेक्षक नव्हे, तर उत्स्फूर्त प्रेक्षक. आर.कें.नी स्केच पेन काढला आणि फक्त एकच रेषा ओढली. काही कळलं नाही. मात्र दुसरी रेषा काढताच सर्वांनीच ओळखले, हे तर त्यावेळचे पंतप्रधान चंद्रशेखर ! पाच मिनिटांच्या आत चंद्रशेखर यांच्यासमोर राजीव गांधी, खाली व्ही. पी. सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे चेहरे चितारून चौघांच्या मध्ये ‘कॉमन मॅन’ काढला. या चौघांच्या राजकीय तडाख्यात कॉमन मॅन अडकला, असेच सुचवायचे असावे त्यांना. आर.के. यांनी पुन्हा दुसऱ्या कागदावर त्यांचा ‘सामान्य माणूस’ चितारला. या सामान्य माणसाच्या हातात एक काडी आणि त्या काडीवर लावलेला फलक सर्वांची उत्सुकता वाढवत गेला. या फलकावर ‘लोकमत टाइम्सला शुभेच्छा’ असे लिहून स्केच पेन खाली ठेवला. आर.के. यांच्या हस्ते मला अंबाजोगाईत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या ‘कॉमन मॅन’च्या सहवासातील तो सोहळा आजही जशाच्या तसा आठवतो मला. टाईम्स आॅफ इंडियामधील त्यांची व्यंगचित्रे मी तासन्तास पाहत बसायचो. एखाद्या सामान्य माणसाला भेडसावणारे हिमालयाएवढे उत्तुंग विषय हाताळताना आर.के. लक्ष्मण यांच्या रेषेची उंची नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते ते कळतच नाही. अशा या रंगरेषेच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट आर.के. लक्ष्मण यांच्या जाण्याने हा जीवनपट एकदम पुन्हा आठवू लागला आहे.आर.के.लक्ष्मण यांच्या हस्ते आचार्य अत्रे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार अंबाजोगाईच्या ‘सावज’ प्रतिष्ठानच्या वतीने मला देण्याचा मानस जेव्हा तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष भगवानराव लोमटे ऊर्फ बापू यांनी व्यक्त केला, तेव्हा आर.के. लक्ष्मण यांच्या भेटीची उत्सुकता होती. प्रतीक्षा आणि प्रतीक्षेचा दुरावा संपल्यानंतर मिळणारा आनंद शब्दापलीकडचा असतो. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आर.के. लक्ष्मण यांच्या तारखा मिळेनात म्हणून लोमटे बापू अस्वस्थ असायचे. अंबाजोगाई नगरीतील हा मनस्वी माणूस एकदा निर्णय घेतला की तो तडीपार नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा. अखेर काही महिने लोटले आणि लक्ष्मण यांची तारीख मिळाली. अंबाजोगाईचा तो प्रसंग अजूनही मला आठवतो. दिवस होता १३ फेब्रुवारी २००० चा. अंबाजोगाईच्या पब्लिक ग्राऊंडवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधीजींचे अनुयायी, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य ए.मा. कुलकर्णी हे त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. अंबाजोगाई गाव लहान असले तरी विद्येचे माहेरघर आणि दगड काढला तरी अस्खलित इंग्रजीत बोलणारी माणसे असे हे मिश्रण. ए.मा. गुरुजी बोलायला उठले आणि आर.के. लक्ष्मण यांच्या रेषेला स्पर्श करत त्यांनी रेषेच्या फटकाऱ्यात आणि लेखणीच्या माध्यमाची जादु सांगताना कुंचल्याचा जादूगार आर.के.लक्ष्मण आणि लेखणीचा जादूगार आर.के. नारायणन् यांच्या प्रेमात मी कसा पडलो हे सांगत ते अचानक म्हणाले आज माझ्या सोबत फक्त कुंचला आहे. वाक्याचा तो धागा उचलतच आर.के. लक्ष्मण यांनी स्मित करत माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकला आणि ते म्हणाले ‘पेन इधर है’. त्यांचा तो हजरजबाबीपणा आणि माझ्या पाठीवर प्रेमाने फिरविलेला हात, तो क्षण अजूनही मी विसरू शकत नाही. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसे किती साधी असतात याचा अनुभवही लक्ष्मण यांच्या सहज बोलण्यातून मला जाणवला.प्रत्यक्षात कोणाशीही-कधीही न बोलणारा आर.के.यांचा हा कॉमन मॅन सर्वांनाच जवळचा वाटायचा. तो प्रत्येकाच्या मनात डोकवायचा. म्हणून ‘लोकमत’च्या माध्यमातून या ‘कॉमन मॅन’ला बोलते करण्याचा प्रयत्न मी ५ फेब्रुवारी २०१२ला केला. आर.के. यांच्या याच ‘कॉमन मॅन’ने ‘लोकमत’च्या अतिथी संपादकांची जबाबदारी पेलली. या दिवशी ‘लोकमत’च्या वाचकाला प्रत्येक पानावर ‘कॉमन मॅन’ भेटला आणि अनेक बातम्यांच्या माध्यमातून बोललादेखील ! हा अंक पाहून आर. के. देखील भारावून गेले. डोळ्यांतूनच ते अनेक भावना व्यक्त करून गेले. ‘नावात काय?’ असे शेक्सपिअर जरी म्हणत असला, तरी रेषांच्या फटकाऱ्यात काय आहे? याचा अनुभव मी आणि माझ्यासारख्या असंख्य कलारसिकांनी घेतला. गगणाला गवसणी घालणारी निर्भिडता, विषयाची खोली त्या सुक्ष्म रेषा अचुकपणे मांडतात. रेषेतील बोलके चेहरे, समाजातील विदारकता टिपणारी ती रेषा आता फक्त अधोरेखित झालीय न संपणाऱ्या प्रवासाला जाणाऱ्या पांढऱ्या कॅन्व्हॉसवर.