शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

मार्गदर्शक समीक्षक

By admin | Updated: January 28, 2015 04:34 IST

साहित्य आणि ललितकला यांचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात अंत:प्रेरणेने जाणवायचे असते. त्याची वस्तुनिष्ठता म्हणजे पदार्थविज्ञानातील सत्य नसते.

राजेंद्र दर्डा,एडिटर इन चीफ, लोकमत - काळ बदलला. माणसं बदलली. आडव्या पट्ट्याचा कोट, धोतर असणारा आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ मात्र नाही बदलला. त्याच्या चष्म्याचा नंबरही नाही बदलला. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. ३१ मार्च १९९१, लोकमत टाइम्सच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कॉमन मॅन मला औरंगाबादेत भेटला. लोकमत भवनमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमात व्यंगचित्रांचे जादूगार आर. के. लक्ष्मण हे विशेष पाहुणे होते. त्यांनी व्यंगचित्रे काढावीत, अशी सर्वांची अपेक्षा होती. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला स्टँडवर लावलेला फळा आणि त्यावर लटकवलेला पांढरा कागद पाहून स्वत: आर. के. यांना कळून चुकले होते, की व्यंगचित्र काढल्याशिवाय सुटका होणार नाही आणि म्हणूनच मी सूचित करताच ‘मला त्याची कल्पना होतीच’ असे काहीसे हसत बोलून ते फळ्याकडे वळले. ते फळ्याजवळ उभे राहिले. सर्व श्रोते क्षणात प्रेक्षक बनले. नुसते प्रेक्षक नव्हे, तर उत्स्फूर्त प्रेक्षक. आर.कें.नी स्केच पेन काढला आणि फक्त एकच रेषा ओढली. काही कळलं नाही. मात्र दुसरी रेषा काढताच सर्वांनीच ओळखले, हे तर त्यावेळचे पंतप्रधान चंद्रशेखर ! पाच मिनिटांच्या आत चंद्रशेखर यांच्यासमोर राजीव गांधी, खाली व्ही. पी. सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे चेहरे चितारून चौघांच्या मध्ये ‘कॉमन मॅन’ काढला. या चौघांच्या राजकीय तडाख्यात कॉमन मॅन अडकला, असेच सुचवायचे असावे त्यांना. आर.के. यांनी पुन्हा दुसऱ्या कागदावर त्यांचा ‘सामान्य माणूस’ चितारला. या सामान्य माणसाच्या हातात एक काडी आणि त्या काडीवर लावलेला फलक सर्वांची उत्सुकता वाढवत गेला. या फलकावर ‘लोकमत टाइम्सला शुभेच्छा’ असे लिहून स्केच पेन खाली ठेवला. आर.के. यांच्या हस्ते मला अंबाजोगाईत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या ‘कॉमन मॅन’च्या सहवासातील तो सोहळा आजही जशाच्या तसा आठवतो मला. टाईम्स आॅफ इंडियामधील त्यांची व्यंगचित्रे मी तासन्तास पाहत बसायचो. एखाद्या सामान्य माणसाला भेडसावणारे हिमालयाएवढे उत्तुंग विषय हाताळताना आर.के. लक्ष्मण यांच्या रेषेची उंची नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते ते कळतच नाही. अशा या रंगरेषेच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट आर.के. लक्ष्मण यांच्या जाण्याने हा जीवनपट एकदम पुन्हा आठवू लागला आहे.आर.के.लक्ष्मण यांच्या हस्ते आचार्य अत्रे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार अंबाजोगाईच्या ‘सावज’ प्रतिष्ठानच्या वतीने मला देण्याचा मानस जेव्हा तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष भगवानराव लोमटे ऊर्फ बापू यांनी व्यक्त केला, तेव्हा आर.के. लक्ष्मण यांच्या भेटीची उत्सुकता होती. प्रतीक्षा आणि प्रतीक्षेचा दुरावा संपल्यानंतर मिळणारा आनंद शब्दापलीकडचा असतो. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आर.के. लक्ष्मण यांच्या तारखा मिळेनात म्हणून लोमटे बापू अस्वस्थ असायचे. अंबाजोगाई नगरीतील हा मनस्वी माणूस एकदा निर्णय घेतला की तो तडीपार नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा. अखेर काही महिने लोटले आणि लक्ष्मण यांची तारीख मिळाली. अंबाजोगाईचा तो प्रसंग अजूनही मला आठवतो. दिवस होता १३ फेब्रुवारी २००० चा. अंबाजोगाईच्या पब्लिक ग्राऊंडवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधीजींचे अनुयायी, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य ए.मा. कुलकर्णी हे त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. अंबाजोगाई गाव लहान असले तरी विद्येचे माहेरघर आणि दगड काढला तरी अस्खलित इंग्रजीत बोलणारी माणसे असे हे मिश्रण. ए.मा. गुरुजी बोलायला उठले आणि आर.के. लक्ष्मण यांच्या रेषेला स्पर्श करत त्यांनी रेषेच्या फटकाऱ्यात आणि लेखणीच्या माध्यमाची जादु सांगताना कुंचल्याचा जादूगार आर.के.लक्ष्मण आणि लेखणीचा जादूगार आर.के. नारायणन् यांच्या प्रेमात मी कसा पडलो हे सांगत ते अचानक म्हणाले आज माझ्या सोबत फक्त कुंचला आहे. वाक्याचा तो धागा उचलतच आर.के. लक्ष्मण यांनी स्मित करत माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकला आणि ते म्हणाले ‘पेन इधर है’. त्यांचा तो हजरजबाबीपणा आणि माझ्या पाठीवर प्रेमाने फिरविलेला हात, तो क्षण अजूनही मी विसरू शकत नाही. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसे किती साधी असतात याचा अनुभवही लक्ष्मण यांच्या सहज बोलण्यातून मला जाणवला.प्रत्यक्षात कोणाशीही-कधीही न बोलणारा आर.के.यांचा हा कॉमन मॅन सर्वांनाच जवळचा वाटायचा. तो प्रत्येकाच्या मनात डोकवायचा. म्हणून ‘लोकमत’च्या माध्यमातून या ‘कॉमन मॅन’ला बोलते करण्याचा प्रयत्न मी ५ फेब्रुवारी २०१२ला केला. आर.के. यांच्या याच ‘कॉमन मॅन’ने ‘लोकमत’च्या अतिथी संपादकांची जबाबदारी पेलली. या दिवशी ‘लोकमत’च्या वाचकाला प्रत्येक पानावर ‘कॉमन मॅन’ भेटला आणि अनेक बातम्यांच्या माध्यमातून बोललादेखील ! हा अंक पाहून आर. के. देखील भारावून गेले. डोळ्यांतूनच ते अनेक भावना व्यक्त करून गेले. ‘नावात काय?’ असे शेक्सपिअर जरी म्हणत असला, तरी रेषांच्या फटकाऱ्यात काय आहे? याचा अनुभव मी आणि माझ्यासारख्या असंख्य कलारसिकांनी घेतला. गगणाला गवसणी घालणारी निर्भिडता, विषयाची खोली त्या सुक्ष्म रेषा अचुकपणे मांडतात. रेषेतील बोलके चेहरे, समाजातील विदारकता टिपणारी ती रेषा आता फक्त अधोरेखित झालीय न संपणाऱ्या प्रवासाला जाणाऱ्या पांढऱ्या कॅन्व्हॉसवर.