शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती, भाजपाकडे 'महापुरे झाडे जाती'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 07:24 IST

सुजय पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्याच वाटेने जावे

सुजय पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्याच वाटेने जावे हे त्यांच्या चाहत्यांना पटणारे नसले तरी त्यांनी खपवून घेतले. तीन तीन पिढ्या सत्तेची पदे उबविल्यानंतर वाट्याला रिकामेपण येणे ही बाब केवढी दु:खदायक असते, हे ज्यांना कळते, त्यांनाच या विषयांचे दु:ख समजण्यासारखे आहे. आपला इतिहास, त्याचा मानमरातब आणि त्यावरील जनतेचा विश्वास याकडे पाठ फिरवून व तो तुडवून नव्या कुरणात जाणे त्याचमुळे त्यांना जमले आहे. महाराष्ट्रात भाजप-सेना यांच्या युतीची सत्ता आहे आणि दिल्लीतही भाजप मोठ्या बहुमतानिशी सत्तारूढ आहे. सत्तेचे आकर्षण (अन्य कोणत्याही आकर्षणापेक्षा) मोठे असते. त्यामुळे विखे यांची कोलांटउडी आपण सहानुभूतीने समजून घेतली आहे.

आता तशाच मोकळ्या अंत:करणाने आपल्याला नाईक घराण्याची नव्या दिशेने होणारी वाटचाल समजून घेतली पाहिजे. पुसदच्या या वजनदार घराण्याने महाराष्टÑाला दोन मुख्यमंत्री दिले. त्यामध्ये वसंतराव नाईक हे त्या काळी यशवंतरावांच्या विश्वासामुळे (व यशवंतरावांना बाळासाहेब थोरातांचा विश्वास नसल्यामुळे) दीर्घकाळ त्या पदावर राहिले. नंतरचे सुधाकरराव नाईक पवारांचा पाठिंबा असेपर्यंत त्या पदावर टिकले. पुढे त्यांना अपमानित होऊन जावे लागले. तरीही नाईक घराण्याचे तिसरे पाईक मनोहरराव नाईक पवारांसोबत राहिले व मंत्रीही झाले. आता पवारांना सत्ता मिळण्याची शक्यता नाही आणि काँग्रेसही सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे सत्तापदांची कित्येक दशकांची सवय पडलेले नाईक घराणे कासावीस होऊ लागले असेल तर त्यांचीही अवस्था आपण समजून घेतली पाहिजे. त्या घराण्यातील नव्या पिढ्या आधीच भाजप व सेनेत गेल्या. मनोहरराव धीर धरून मागे राहिले. आता त्यांचाही धीर सुटला आहे. आणि आपल्या ‘असंख्य’ (?) अनुयायांसह तेही सेनेत सामील होणार आहेत. विखे आणि भाजप हे समीकरण जसे न पाहण्याजोगे तसेच नाईक आणि सेना हे समीकरणही न ऐकण्यासारखे आहे. पण सत्तातुरांना इतरांच्या पाहण्याबोलण्याची पर्वा नसते. आपल्या इतिहासाची जाण नसते. घराण्याने मिळविलेल्या नावाची व कीर्तीची मातब्बरी नसते. सत्तेच्या खुर्चीवर (मग ती कुणाचीही असोे) सरकार बसले की सर्व माणसे पाठीशी येतात आणि आपला सत्तेचा जयजयकार पुन्हा सुरू होतो, याची त्यांना चांगली जाणीव असते. त्यामुळे मनोहर नाईक सेनेचे सैनिक होतील आणि हातचे घड्याळ काढून तेथे सेनेची शिवबंधनाची राखी बांधून घेतील. तसे काँग्रेस व राष्टÑवादीतील अनेक जण सत्तेवर यायला उत्सुक आहेत. पण महापुरात आधी झाडे जातात व लव्हाळी राहतात तसेच काहींचे होत आहे.

भाजपने कर्नाटकातील कुमारस्वामींचे जेडीयुक्त काँग्रेस सरकार पैशाची खेळी करून पाडले. त्यामुळे सत्तेसाठी पक्षबदल हा आपल्या राष्टÑीय राजकारणाचा आता राष्टÑीय पायंडा झाला असावा, असेही लोकांना वाटू लागले आहे. मात्र आजवर ते काँग्रेसबाबत झाले. आता ते भाजपबाबतही होत असल्याचे पाहून तर हा पायंडाच यापुढे राष्टÑीय राजकारणाचा महामार्ग होईल, असेही आपण वाटून घ्यायला हरकत नाही. मध्य प्रदेशात भाजपच्या दोन आमदारांनी पक्षाला वाकुल्या दाखवत काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा घरोबा स्वीकारला. आता त्या पक्षाचे आणखीही चार आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे ऐकिवात आहे. भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणासाठी, तसेच उत्तर देण्याची क्षमता कमलनाथांनी दाखविली आहे. असो. अखेर राजकारणात सत्ताच तेवढी मिळवायची असते. ती मग विचारांची मिळो, अविचारांची मिळो, नावालाच मिळो, नाहीतर दगाबाजी करून मिळविणे असो. ती मिळवायची असते. लोकांची विस्मरणशक्ती मोठी असते. ते यातील सर्व हिकमती विसरतात आणि धावायच्या कामी लागून पुढाऱ्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देतात. म्हणून विखे यांना दिल्या, तशा नाईकांनाही आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि त्यांचे शिवकल्याण व्हावे, अशी प्रार्थना केली पाहिजे.

सत्तेसाठी पक्षबदल हा आपल्या राष्टÑीय राजकारणाचा आता राष्टÑीय पायंडा झाला असावा, असेही लोकांना वाटू लागले आहे. हा पायंडाच यापुढे राष्टÑीय राजकारणाचा महामार्ग होईल, असेही आपण वाटून घ्यायला हरकत नाही.

टॅग्स :BJPभाजपाSujay Vikheसुजय विखेGanesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेस