शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राज्य संकटात असताना सत्तेसाठीचा खेळ चीड आणणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 07:13 IST

फोडाफोडी करणार नाही, असे सांगत कॉँग्रेसच्या नावाने खडे फोडणाऱ्या आणि आपले राजकारण शुचिर्भूत असल्याचा दावा करणाºया भाजपचे हे कसले राजकारण म्हणायचे? महाराष्ट्र अस्मानी-सुलतानी संकटात असताना सत्तेसाठीचा हा खेळ चीड आणणारा आहे.

सत्तासुंदरीचा मोह कुणालाही सुटलेला नाही. ती प्राप्त करण्यासाठी वाटेल त्या थराला जाणे, हे राजकारणात नवे नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर त्यातही एक नैतिकता होती. मात्र, रात्रभर ज्या पद्धतीने खेळ केला गेला आणि सकाळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली गेली आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने रात्रीत राष्ट्र वादी कॉँग्रेस पक्षालाच भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला; तो राज्याची वैचारिक नीतिमत्ता, राजकीय परंपरा धुळीला मिळविणारा आहे. राज्यात सत्तेसाठी गेला महिनाभर जो काही खेळखंडोबा चालला आहे, तो पाहून तमाम महाराष्ट्रातील जनतेवर ‘याचसाठंी केला होता का मतदानाचा अट्टाहास’ असे म्हणत डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत देऊन पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी कौल दिला; परंतु या दोन्ही पक्षांच्या जागा घटल्या. त्यातूनच शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षेला उभारी आली. मुख्यमंत्रिपदासह ‘फिफ्टी-फिफ्टी’चा आग्रह तिने धरला. अमित शहांंच्या उपस्थितीत सत्तावाटपाचे हे सूत्र ठरल्याचा शिवसेनेचा हा दावा भाजपने फेटाळून लावला आणि इथेच त्यांच्या तीस वर्षांच्या संसाराच्या काडीमोडाची बीजे रोवली गेली. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देत नसाल तर सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसशी संधान साधले.आम्हाला विरोधात बसण्याचा कौल मतदारांनी दिला आहे. आम्ही विरोधातच बसू, असे सांगणारे या दोन्ही पक्षांचे नेते शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेला तयार झाले. त्यासाठी त्यांनी शिवसेनेला तिची विचारधारा गुंडाळून ठेवायला लावली. मात्र, मुख्यमंत्रिपदासह राज्याची सत्ता दृष्टिपथात आली असतानाच अजित पवार रात्रीत भाजपच्या गोटात जाऊन बसले. सोबत त्यांनी दहा आमदारांनाही नेले. यामुळे महाराष्ट्र हादरला. अशी अनेक वादळे लीलया पेलणारे शरद पवार यांनीही पुतण्याच्या या बंडानंतर परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली ती पाहता राजकारणात अजित पवार एकाकी पडल्याचे चित्र सध्या दिसते आहे. शिवसेनेला पाठिंब्याची पत्रे द्यायला मुदतवाढ नाकारणा-या, राष्ट्रवादीलाही अधिक वेळ देण्यास संधी न देणा-या राजभवनाने ज्या गतीने भाजपच्या सत्तेसाठी रात्रीत हालचाली केल्या आणि नव्या सरकारचा शपथविधी उरकून घेतला, हा सारा प्रकारच महाराष्ट्राला नवा आहे. त्यांच्या या कृतीला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यावर रविवारी सुनावणीही झाली. राज्यपालांचे आदेश सादर करा, असा आदेश देत न्यायालयाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. राज्यपालांनी ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. मात्र, इतका वेळ न देता ते कर्नाटकप्रमाणे तातडीने करायला लावावे, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचेच लक्ष आहे.जादा वेळ दिल्यास भाजपला घोडेबाजार करायला वाव मिळेल, असे सांगितले जात असले तरी आपले आमदार फुटू नयेत यासाठी सर्वच पक्षांनी दक्षता घेतली आहे. काय होणार ते विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी कळेलच; मात्र १९७८ मध्ये वसंतदादांच्या विरोधात बंड करून ‘पुलोद’चे सरकार स्थापन करणाºया शरद पवारांपुढे त्यांच्या पुतण्यानेच बंड करून आव्हान दिले आहे. यात भाजप जिंकला काय किंवा शिवसेना जिंकली काय, विश्वासार्हता पवारांचीच पणाला लागली आहे. ती टिकविण्यात काका यशस्वी होणार की पुतण्या, हे त्याचवेळी कळेल. मात्र फोडाफोडी करणार नाही, असे सांगत कॉँग्रेसच्या नावाने सतत खडे फोडणा-या आणि आपले राजकारण शुचिर्भूत असल्याचा दावा करणा-या भाजपचे हे कसले राजकारण म्हणायचे? अवघा महाराष्ट्र अस्मानी आणि सुलतानी संकटात असताना सत्तेसाठी जो खेळ राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मांडला आहे, तो चीड आणणारा आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना