शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 4:55 AM

केंद्र आणि राज्य सरकारचे स्पष्ट नियम असतानाही रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसारख्या १२ पेक्षा कमी आसने असलेल्या वाहनांनाही स्कूल बसचा परवाना दिल्याचे प्रकरण म्हणजे परिवहन विभागाने आपल्याच नियमांचा गळा घोटून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचे स्पष्ट नियम असतानाही रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसारख्या १२ पेक्षा कमी आसने असलेल्या वाहनांनाही स्कूल बसचा परवाना दिल्याचे प्रकरण म्हणजे परिवहन विभागाने आपल्याच नियमांचा गळा घोटून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. मुंबईत एकट्या अंधेरी परिसरात अशा २५ हजारांहून अधिक रिक्षा विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत. गेल्या आठवड्यात ‘लोकमत’नेही ठाण्यात प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कसे कोंबून नेले जाते, त्याचे धडधडीत पुरावे दिले होते. १२ पेक्षा कमी आसनक्षमता असलेल्या वाहनांना स्कूल बस म्हणून परवानगी देऊ नये, असा राज्याचा; तर १३ आसनक्षमतेचा केंद्राचा नियम आहे. गेल्या दशकात पनवेलमध्ये स्कूल बसला आणि मुंबईत बेकायदा वाहतूक करणाऱ्या व्हॅनला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नियम करण्यात आले. पण त्यालाही कसा फाटा दिला जातो, त्याचे उदाहरण पालक-शिक्षक संघटनेच्या याचिकेमुळे समोर आले. अंधेरीतील रिक्षांना स्कूल बसचा परवाना देण्यामागे परिवहन विभागातील अधिकाºयांचे रॅकेट असून हा त्यांचा पर्यायी व्यवसाय आहे आणि कारवाईच्या वेळी ते व्हॅन, रिक्षांच्या पाठीशी उभे राहतात, हेही न्यायालयात उघड झाले. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक या एकमेव मुद्द्याला प्राधान्य देण्याऐवजी त्यातूनही धंदा पाहण्याच्या वृत्तीमुळे बसचा रंग, आपत्कालीन दरवाजे, तातडीच्या उपचाराची साधने, क्लीनर आणि बसमध्ये मुली असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी महिला कर्मचारी ठेवण्यासारख्या मुद्द्यांना वेळोवेळी प्रचंड विरोध झाला; आणि दरवेळी न्यायालयाला हस्तक्षेप करून, समज देऊन, प्रसंगी कठोर इशारे देत हे नियम अंमलात आणावे लागले. आताही दरवर्षी दरवाढीचा मुद्दा याच पद्धतीने समोर येतो आणि अकारण विद्यार्थी, पालक वेठीला धरले जातात. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे परिवहन विभागाला एवढेच वावडे असेल; तर त्यांनी एकदा त्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे त्यासाठी तसा लढा तरी देता येईल. पण मे महिन्यात न्यायालयात दिलेल्या माहितीपेक्षा उफराटी स्थिती जर तीनच महिन्यांत समोर येणार असेल, तर परिवहन विभागाच्या कारभारातील सावळ्यागोंधळाची कल्पना केलेली बरी. परवडणारे वाहन म्हणून जरी रिक्षा, टॅक्सी, व्हॅनचे समर्थन केले जात असले तरी त्यांच्या आणि बसच्या खर्चात फारशी तफावत नाही. विद्यार्थ्यांच्या जिवाची सुरक्षा हा एकमेव निकष लावला तर मोठ्या वाहनांचा आग्रह का धरला जातो, ते स्पष्ट होईल. पण नियमांच्या अंमलबजावणीतही सुरक्षेपेक्षा धंदा पाहिला जात असेल तर नियम कसे फिरवले जातात याची उदाहरणे या याचिकेमुळे समोर आली. त्यात जेवढ्या लवकर सुधारणा होईल, तेवढे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.

टॅग्स :Schoolशाळा