शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या शेजाऱ्यांशी संबंध हे विदेश नीतीचे अपयश

By admin | Updated: May 12, 2015 23:56 IST

२०११ साली प्रकाशित ‘द ट्रिस्ट बिट्रेड : रिफ्लेक्शन आॅन डिप्लोमसी अ‍ॅॅन्ड डेव्हलपमेंट’ या पुस्तकात लेखक जगत मेहता यांनी असा युक्तिवाद केला आहे की,

रामचन्द्र गुहा(इतिहास संशोधक आणि भाष्यकार)२०११ साली प्रकाशित ‘द ट्रिस्ट बिट्रेड : रिफ्लेक्शन आॅन डिप्लोमसी अ‍ॅॅन्ड डेव्हलपमेंट’ या पुस्तकात लेखक जगत मेहता यांनी असा युक्तिवाद केला आहे की, ‘साधर्म्य नसलेल्या शेजारी राष्ट्रांशी मुत्सद्देगिरी ही विसाव्या शतकातील एक अत्यंत अवघड बाब राहील हे नेहरू पूर्णपणे ओळखू शकले नाहीत आणि विदेश मंत्रालयसुद्धा त्यांना तसा सल्ला देऊ शकले नाही’. भारत आणि नेपाळदरम्यान झालेल्या स्थायी आणि हितकारक परस्पर निर्भरतेच्या संबंधावरील अपव्ययाएवढे मोठे उदाहरण इतिहासात दुसरे कुठलेच नाही, असेही ते म्हणतात.मेहतांचे हे शब्द आठवण्यामागचे कारण आहे, नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भयंकर भूकंपानंतर भारताने दिलेला शीघ्र प्रतिसाद. आपल्या सरकारने तातडीने मदतकार्यासाठी तुकड्या पाठवणे कौतुकास्पद होते, पण नेपाळी पंतप्रधानांना आपण केलेल्या ट्विटवरूनच त्यांच्या देशातील भूकंपाचे वर्तमान कळले, अशी जाहीर बढाई मारून नरेन्द्र मोदी यांनी या कार्याला बट्टा लावला. (त्यांचे कथन खरे असले तरी, सभ्यता आणि राजनैतिक हितसंबंध याचा विचार करता, त्यांनी ही बाब खासगीतच ठेवायला हवी होती.)पण याहूनही वाईट होते, भारतातील हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे मती कुंठित करून सोडणारे व दृश्यातिरेकी वार्तांकन. काठमांडूतील संपादक कनकमणी दीक्षित यांनी तर बीबीसीला चक्क सांगूनच टाकले की, ‘कर्कशपणा, कथित राष्ट्रभक्ती, अतिशयोक्ती, उद्धटपणा आणि काही वेळा चुकीच्या वृत्तांकनामुळे इथली जनता प्रचंड चिडली आहे’. दुसऱ्या एका टीकाकाराने तर असे मत नोंदवले की, सुदैवाने सलमान खान प्रकरणाने भारतीय माध्यमांना त्यांचे लक्ष इथून हटविणे भाग पाडले आहे. अर्थात भारताची नेपाळविषयक अरेरावी जुनीच आहे. त्या देशातील लोकशाहीवादी नेते बी.पी.कोईराला यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख सापडतो. कोईराला यांनी तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन नंतर स्वत:च्या देशात हुकुमशाहीविरुद्ध लढा उभारला होता. महात्मा गांधी त्यांच्यासाठी सदैव वंद्य राहिले, तर जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया आणि जवाहरलाल नेहरू त्यांचे जवळचे मित्र होते. १९४७ साली हद्दपारी झालेली असतानाही त्यांनी नेपाळ नॅशनल कॉँग्रेसची स्थापना केली. या पक्षाचे साधर्म्य भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसशी होते. अथक प्रयत्नानंतर १९५९ साली कोईराला आणि त्यांच्या पक्षाने तिथल्या राजाला देशातली पहिली लोकशाही तत्त्वावरची सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी भाग पाडले. या निवडणुकीत त्यांचा पक्ष बहुमताने जिंकला आणि पंतप्रधानपदाची धुरा कोईराला यांच्या हाती आली. व्यक्तिगत आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यांचा कल भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याकडे होता. पण भारताने त्याला कधीच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आपल्या ‘आत्मब्रितांत’ या आत्मवृत्तात कोईराला यांनी असे लिहून ठेवले आहे की, त्यांच्या विरोधात तेव्हा तीन घटक कार्यरत होते. त्यातील दोन घटक म्हणजे, नेपाळातील राजघराणे आणि तेथील अभिजनवर्ग. तिसरा घटक म्हणजे भारतीय संघराज्य व त्याचे प्रतिनिधी.१९४० साली नेहरू आणि कोईराला यांनी ब्रिटिशांविरुद्ध एकत्र लढा दिला होता व ते एकत्रच तुरुंगात गेले होते. पण पंधरा वर्षांनंतर नेहरू सरकारची अशी इच्छा होती की, नेपाळने आपणहून कोणतेही निर्णय न घेता भारताच्या सूचनांचे पालन करावे. भारतीय राजदूत तेव्हा स्वत:ला तिथले राजकीय पूर्णाधिकारी मानीत व आपण नेपाळच्या राजापेक्षाही श्रेष्ठ आहोत असा त्यांचा समज होता. एक राजदूत तर इतका उद्दाम आणि अरेरावीने वागणारा होता की, त्याची जाहीर तक्रार करताना कोईराला यांनी असे म्हटले होते की, भारतीय राजदूताला आमचा देश म्हणजे जिल्हा बोर्ड वाटते व तो स्वत:ला या बोर्डाचा अध्यक्ष मानतो.भारताचे दोन अवघड शेजारी आहेत, चीन आणि पाकिस्तान. दोघांसोबत भारताचे संबंध तणावाचेच राहिले आहेत. चीनला मॅकमोहन सीमारेषा अमान्य, कारण त्यांच्या मते ती ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी लादलेली आहे. काश्मीरवर भारत आणि पाकिस्तान दोघांचाही दावा आहे. चीनची भारतासोबतची स्पर्धा आशिया आणि जगभरात आपला प्र्रभाव वाढवण्याच्या संदर्भात आहे तर पाकिस्तानला १९७१ साली झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. श्रीलंकेत इंदिरा गांधी आणि एम.जी.रामचंद्रन यांनी गुप्तपणे लिबरेशन टायगर आॅफ तामिळ इलमला सामरिक सहाय्य दिले आणि त्यानंतर राजीव गांधी यांनी हेकटपणा दाखवत तामीळ वाघांना शांत करण्यासाठी भारतीय लष्कर पाठवले. भारताच्या या कृतीने सिंहली आणि तामीळ दोघे समुदाय त्याच्या विरोधात गेले व याचमुळे सिंहली लोक चीनकडून साह्याचा शोध घेत होते आणि तामीळ वाघांच्या मनात संताप धुमसत होता. नेपाळप्रमाणेच श्रीलंकेतही आपल्या राजदूतांनी (सगळ्याच नाही) त्यांचे वागणे व्हाईसरॉय असल्याप्रमाणे ठेवले आहे.बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्रच भारताच्या मदतीने आणि हस्तक्षेपाने निर्माण झाले. १९७० साली भारताने ९० लक्ष बांगलादेशी निर्वासितांना अभय दिले. त्याच्या नंतरच्या वर्षी भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. असे असूनही भारताने ही पत जास्त दिवस सांभाळली नाही, कारण अल्पावधीतच पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बांगलादेशसमोर पाण्याचा वाद उभा केला. भारताने तेव्हा अवामी लीगला पाठबळ देऊन बांगलादेशातल्या इतर महत्त्वाच्या राजकीय घटकांचा राग ओढवून घेतला.कोईराला आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ‘ते (भारतीय) विशुद्ध मुत्सद्देगिरी समजू शकले नाहीत’ तर जगत मेहता लिहितात, ‘भारताचे त्याच्या छोट्या शेजारी राष्ट्रांसोबतचे संबंध हे त्याच्या विदेश धोरणाचे मोठे अपयश आहे’. या दोन मतांमधील एक भारताच्या जुन्या मित्राचे तर दुसरे भारतीय राजदूत म्हणून सेवा निभावलेल्या व माजी विदेश सचिव म्हणून काम पाहिलेल्या व्यक्तीचे. दोन्ही सत्यच आहेत. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी, पंतप्रधानांचे ट्विट, खाद्यपदार्थ आणि घरउभारणी साहित्याने भरलेली विमाने, यापेक्षा ही मतेच महत्त्वाची ठरणार आहेत.