शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

आर्थिक अडचण आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 15:48 IST

बेस्ट आणि तिचे कर्मचारी यांच्या व्यथा गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. याची कारणे बेस्ट व तिच्या कर्मचाऱ्यांनीच शोधायला हवीत. 

ठळक मुद्देबेस्टची आर्थिकस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे कर्मचाऱ्यांना काही वेळा वेतन वेळेवर मिळत नाहीवर्षांपासूनच्या मागण्या काही पूर्ण होत नाही. परिणामी दर तीन किंवा सहा महिन्यांनी बेस्टचे कर्मचारी संपाचे हत्यार उपसतातबेस्ट आणि तिचे कर्मचारी यांच्या व्यथा गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. याची कारणे बेस्ट व तिच्या कर्मचाऱ्यांनीच शोधायला हवीत. 

- विनायक पात्रुडकर

कर्मचाऱ्यांच्या मागण्या संपत नाही. मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे संपाचे हत्यार असतेच. आर्थिक अडवणीत असलेल्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य होत नसते. अशा विवंचनेत बेस्ट गेल्या काही वर्षांपासून सापडत आहे. बेस्टची आर्थिकस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.  दुसरीकडे येथील कर्मचाऱ्यांना काही वेळा वेतन वेळेवर मिळत नाही. बोनससाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. न्यायालयाच्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या काही पूर्ण होत नाही. परिणामी दर तीन किंवा सहा महिन्यांनी बेस्टचे कर्मचारी संपाचे हत्यार उपसतात. 

संप करताना सर्वसामान्यांना होणाऱ्या  त्रासाचा विचार केला जात नाही. ही स्वार्थी वृत्ती प्रत्येकाचीच असते. पण बेस्ट आणि तिचे कर्मचारी यांच्या व्यथा गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. याची कारणे बेस्ट व तिच्या कर्मचाऱ्यांनीच शोधायला हवीत. काही वर्षांपूर्वी मुंबईकरांसाठी बेस्ट हा वाहतुकीचा उत्तम पर्याय होता. त्यावेळी बस वेळेवरही येत होती. आता तिला वाहतूक कोंडीचे कारण आहेच म्हणा.  तेव्हा शेअर टॅक्सी नव्हती. त्यामुळे छोट्या अंतरावर जाण्यासाठी मुंबईकरांना बसशिवाय पर्याय नव्हता. अशा प्रकारे तेजीत असलेल्या बसला उतरती कळा लागली. मुंबईकरांना शेअर टॅक्सीचा पर्याय आला. हळूहळू खासगी कंपन्यांच्या अ‍ॅप बेस्ड टॅक्सी आल्या.  बेस्टचे प्रवासी कमी होवू लागले. तिजोरी रिकामी होऊ लागली. याची झळ लागल्यानंतर बेस्टने उपाय सुरू केले. छोट्या अंतरासाठी बस सेवा सुरू केली. फेऱ्या वाढवल्या. तरीदेखील बेस्टच्या अडचणी काही कमी झाल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या मागण्याही या काळात वाढत गेल्या. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, वेतन वाढ करावी, या प्रमुख मागण्या आजवर प्रलंबितच आहेत. याच प्रमुख मागण्या पुढे करून कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. हा संप होऊ नये यासाठी बैठक झाली, पण ती निष्फळ ठरली. त्यामुळे संप अटळ आहे. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचा संप सर्वसार्मान्यांना फटका देणाराचा असतो. त्यामुळे त्याचे समर्थन सर्वसामान्यांकडून होणार नाही. मात्र कामगारांचे प्रश्न सोडवायलाच हवेत. कामगार चळचळ इतिहासजमा झाली आहे. नवीन कार्यप्रणालीत कामगारांना संप करण्याची मुभा ठेवलेली नाही. परिणामी बेस्ट कामगारांना न्याय मिळायलाच हवा, पण त्यात सर्वसामान्य भुरडला जाऊ नये, एवढीच अपेक्षा.

 

टॅग्स :BESTबेस्टMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMumbaiमुंबई