शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

फादर, ही हृदयशून्य ‘व्यवस्था’ तुमची गुन्हेगार आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 07:48 IST

न्याय मागण्याच्या त्रासाने फादर स्टॅन स्वामी यांना थेट मृत्यूच्या दाढेत ढकलले. न्यायालयाआधीच शिक्षा करणारी व्यवस्था लोकशाहीचा आदर करणारी नाही.

आदिवासींच्या हक्कांसाठी सतत कार्यरत मानवतावादी फादर स्टॅन स्वामी यांना आपण योग्य आदर देऊ शकलो नाही व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘आम्हाला फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाचे प्रचंड दुःख आहे; पण त्यांच्या दुर्दैवी मृत्यूसाठी निष्काळजी कारागृह विभाग, द्वेषपूर्ण तपास यंत्रणा आणि उदासीन न्यायव्यस्था हेच दोषी आहेत हे आम्ही स्पष्टपणे सांगतो’, या त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या भावना सगळ्यांना अंतर्मुख करणाऱ्या आहेत. हा नैसर्गिक मृत्यू नसून ‘यंत्रणात्मक खून आहे’ असा आरोपही काही जणांनी केला आहे. एल्गार परिषदप्रकरणी सगळ्यात शेवटी अटक करण्यात आलेले आणि सर्वात वयोवृद्ध असलेले फादर स्टॅन जेलमध्ये गेल्यावर काही दिवसांतच आजारी पडले; पण वैद्यकीय कारणावरून त्यांना जामीन देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात अर्ज करावा लागला. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) कायदा व त्यानुसार नक्षलवादी समर्थक म्हणून अटक झालेल्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीवेळा कलुषित असतो.  जिल्हा न्यायालये, कुणा आरोपीला जामीन  किंवा एखादी आरोग्य सुविधा देताना खूप दक्ष असतात. त्यामुळे प्रकरण पुढे उच्च न्यायालयाकडे ढकलले जाते.कायदाच जेव्हा आरोप सिद्ध न होता संशयित व्यक्तींकडे ‘आरोपी’ म्हणून बघण्याची प्रवृत्ती ग्राह्य मानतो तेव्हा अशा एकतर्फी कायद्यांची अंमलबजावणी करताना चौकशी यंत्रणा, पोलीस, डॉक्टर, न्यायव्यवस्था सगळेच त्यांना असंवेदनशील वागण्याची परवानगी असल्याप्रमाणे व्यक्त व्हायला लागतात. लवकर  सुनावणी व्हावी ही साधी अपेक्षासुद्धा पूर्ण होऊ शकत नाही व माणूस थेट मरणाच्या दारात पोहोचतो, ही वस्तुस्थिती चटका लावणारी आहे. पोलिसांना दिलेला जबाब पुरावा मानण्यात येईल, आरोपीला आपले निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल, अन्यथा तो दोषी आहे असे मानण्यात येईल अशा गोष्टी कायद्याला राक्षसी बनवितात व सरकार, चौकशी अधिकारी, पोलीस यांनाच ‘न्यायाधीश’ होण्याची अवास्तव संधी देतात. न्यायालयाने शिक्षा देण्याआधीच शिक्षा झाली पाहिजे ही व्यवस्था लोकशाहीचा आदर करणारी नाही. भारतीय संविधानाची फसवणूक करणारे असे कायदे न्यायालयालासुद्धा ‘कायद्याची योग्य प्रक्रिया (ड्यू प्रोसेस ऑफ लॉ) वापरण्यापासून परावृत्त करतात. त्यामुळे UAPA सारख्या अमानुष कायद्यांचा विचार यानिमित्ताने केला गेला पाहिजे.अर्थात याला कोठडीतील मृत्यू (कस्टोडियल डेथ) म्हणायचे का, हा प्रश्न आहेच! कारण त्या अर्थाने फादर स्टॅन यांच्यावर तुरुंगात अत्याचार झाला, त्यांना मारहाण झाली असे म्हणता येत नाही. उलट त्यांच्या पसंतीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी ठेवण्यात आले होते; पण कारागृहात त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष झाले. खरे तर कारागृहाचे अधीक्षक हे कैद्यांचे पालक असतात. प्रिझन मॅन्युअलनुसार कैद्यांच्या परिस्थिती व आवश्यकतेनुसार त्यांना काही सुविधा देण्याचे अधिकार अधीक्षक व जेलरला असतात. मग साधा पाणी पिण्याचा सीपर मागण्यासाठी एखाद्या पार्किन्सन झालेल्या कैद्याला न्यायालयात का जावे लागले? संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क विषयाच्या विशेष रॅपोर्टियर मॅरी लावलॉर यांनी आरोप केला आहे की, फादर स्टॅन यांना खोट्या आरोपांखाली कारागृहात ठेवले. एकीकडे आपण वैश्विक होण्याच्या बाता करतो; पण जर आपल्याला जगातील प्रस्थापित न्यायमूल्य जपता येत नसेल तर त्या वैश्विक होण्याला काय अर्थ राहिला?  राष्ट्रीय तपास यंत्रणा स्वतःच्या कौशल्याचा वापर न करता राजकीय पक्षांसाठी त्यांना पाहिजे तेच तपासातून आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा निरापराध्यांचे गुन्हेगारीकरण ठरलेले असतेच. एकीकडे सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगते की, सभा घेण्याचा, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे; पण सरकारविरोधी विश्लेषण व भूमिकेलाच असामाजिक कृत्ये ठरविणारी ताकद त्यापेक्षा तिप्पट वेगाने कार्यरत होते हे क्लेशकारक आहे. हा  इतरांना अतिरेकी ठरविण्याचा अतिरेकीपणाच म्हटला पाहिजे!  न्यायाचा आणि न्याय मागण्याचाच त्रास लोकांना थेट मृत्यूपर्यंत नेत असेल तर ते लोकशाहीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ठरते. 

- अ‍ॅड. असीम सरोदे, मानवीहक्क विश्लेषक वकील, asim.human@gmail.com

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMumbaiमुंबईPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल