शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बळीराजाचे राजकीय नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:07 AM

२०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत उपराजधानीत शेतकरी नेते व बुद्धिजीवींची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकºयांची मुले निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणादेखील करण्यात आली.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत उपराजधानीत शेतकरी नेते व बुद्धिजीवींची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकºयांची मुले निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणादेखील करण्यात आली. सध्याची शेतकºयांची स्थिती लक्षात घेता, हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह म्हटले पाहिजे. निवडणुका आल्या किंवा राजकीय वातावरण तापवायचे असेल त्यावेळी शेतकºयांच्या समस्यांच्या मुद्यावर राजकीय पोळी शेकण्यात येते. प्रसंगी आंदोलने, निदर्शनेदेखील करण्यात येतात. यामुळे पक्षाला ‘मायलेज’ मिळते, प्रसंगी सत्तादेखील प्राप्त होते. परंतु बळीराजाच्या तोंडाला मात्र पानेच पुसण्यात येतात. कधी तो तांत्रिक अडचणींमुळे मदतीपासून वंचित राहतो तर कधी प्रशासकीय अनास्थेमुळे विकासापासून दूर होतो. तसे पाहिले तर शेतकरी आणि राजकारण या दोन्ही भिन्न भिन्न बाजू. मात्र राजकीय सोयीसाठी राजकारण्यांनी शेती, शेतकरी आणि त्यांच्या समस्या यांचा राजकीय स्वार्थासाठी पुरेपूर वापर केल्याचे दिसून येते. शेतकºयांबाबत या मंडळींना खरोखर किती तळमळ आहे, हादेखील संशोधनाचाच विषय आहे. आपल्या देशातील आणि राज्यातील राजकारणाच्या इतिहासाची पाने पलटली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून येते. शेतकरी कुटुंबातून आलेल्या राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या पदांपर्यंत मजल मारली. मात्र यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना यातील अनेक जण आपले मूळ कुठेतरी विसरले आणि स्वत:चा विकास साधत असताना शेतकºयांच्या समस्यांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. पक्ष कुठलाही असो शेतकरी समस्या ‘फिक्स्ड डिपॉझिट’प्रमाणे असून, हवा तसा आवश्यक वेळी वापरच करण्यात येतो. मात्र धरणीमायची सेवा करत शेतकरी मात्र संकटांच्या चक्रव्यूहात फसलेला आहे. आपल्या मेहनतीने पिकवून पोट भरणाºया शेतकºयाला नुकसानभरपाई मागणे खरे तर क्लेशदायकच असते. कुणाला मागणे ही त्याची प्रवृत्तीच नाही. उलट शेतकºयाला तंत्रज्ञान, विज्ञान यांचे बळ देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राजकारण्यांनी पुढाकार घ्यायला हवा. हे होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांना मनापासून समजून घेणारा, त्यांच्याशी समरस असणारा आणि सर्व प्रशासकीय, कायदेशीर बाबी जाणणारा प्रतिनिधी विधिमंडळात जाणे आवश्यक आहे. शेतकºयांनीदेखील यासाठी सर्व भेद विसरून एकत्र यायला हवे व आश्वासक नेतृत्व स्वत:मधून शोधायला हवे. असे झाले तरच शेतकºयाला खºया अर्थाने न्याय मिळेल आणि महाराष्ट्रात शेतकºयांना विकासमार्गावर नेणारे एका आश्वासक चित्र अनुभवायला मिळेल.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक