शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

बळीराजाचे राजकीय नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:07 IST

२०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत उपराजधानीत शेतकरी नेते व बुद्धिजीवींची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकºयांची मुले निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणादेखील करण्यात आली.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत उपराजधानीत शेतकरी नेते व बुद्धिजीवींची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकºयांची मुले निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणादेखील करण्यात आली. सध्याची शेतकºयांची स्थिती लक्षात घेता, हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह म्हटले पाहिजे. निवडणुका आल्या किंवा राजकीय वातावरण तापवायचे असेल त्यावेळी शेतकºयांच्या समस्यांच्या मुद्यावर राजकीय पोळी शेकण्यात येते. प्रसंगी आंदोलने, निदर्शनेदेखील करण्यात येतात. यामुळे पक्षाला ‘मायलेज’ मिळते, प्रसंगी सत्तादेखील प्राप्त होते. परंतु बळीराजाच्या तोंडाला मात्र पानेच पुसण्यात येतात. कधी तो तांत्रिक अडचणींमुळे मदतीपासून वंचित राहतो तर कधी प्रशासकीय अनास्थेमुळे विकासापासून दूर होतो. तसे पाहिले तर शेतकरी आणि राजकारण या दोन्ही भिन्न भिन्न बाजू. मात्र राजकीय सोयीसाठी राजकारण्यांनी शेती, शेतकरी आणि त्यांच्या समस्या यांचा राजकीय स्वार्थासाठी पुरेपूर वापर केल्याचे दिसून येते. शेतकºयांबाबत या मंडळींना खरोखर किती तळमळ आहे, हादेखील संशोधनाचाच विषय आहे. आपल्या देशातील आणि राज्यातील राजकारणाच्या इतिहासाची पाने पलटली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून येते. शेतकरी कुटुंबातून आलेल्या राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या पदांपर्यंत मजल मारली. मात्र यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना यातील अनेक जण आपले मूळ कुठेतरी विसरले आणि स्वत:चा विकास साधत असताना शेतकºयांच्या समस्यांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. पक्ष कुठलाही असो शेतकरी समस्या ‘फिक्स्ड डिपॉझिट’प्रमाणे असून, हवा तसा आवश्यक वेळी वापरच करण्यात येतो. मात्र धरणीमायची सेवा करत शेतकरी मात्र संकटांच्या चक्रव्यूहात फसलेला आहे. आपल्या मेहनतीने पिकवून पोट भरणाºया शेतकºयाला नुकसानभरपाई मागणे खरे तर क्लेशदायकच असते. कुणाला मागणे ही त्याची प्रवृत्तीच नाही. उलट शेतकºयाला तंत्रज्ञान, विज्ञान यांचे बळ देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राजकारण्यांनी पुढाकार घ्यायला हवा. हे होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांना मनापासून समजून घेणारा, त्यांच्याशी समरस असणारा आणि सर्व प्रशासकीय, कायदेशीर बाबी जाणणारा प्रतिनिधी विधिमंडळात जाणे आवश्यक आहे. शेतकºयांनीदेखील यासाठी सर्व भेद विसरून एकत्र यायला हवे व आश्वासक नेतृत्व स्वत:मधून शोधायला हवे. असे झाले तरच शेतकºयाला खºया अर्थाने न्याय मिळेल आणि महाराष्ट्रात शेतकºयांना विकासमार्गावर नेणारे एका आश्वासक चित्र अनुभवायला मिळेल.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक