शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बळीराजाचे राजकीय नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:07 IST

२०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत उपराजधानीत शेतकरी नेते व बुद्धिजीवींची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकºयांची मुले निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणादेखील करण्यात आली.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत उपराजधानीत शेतकरी नेते व बुद्धिजीवींची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकºयांची मुले निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणादेखील करण्यात आली. सध्याची शेतकºयांची स्थिती लक्षात घेता, हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह म्हटले पाहिजे. निवडणुका आल्या किंवा राजकीय वातावरण तापवायचे असेल त्यावेळी शेतकºयांच्या समस्यांच्या मुद्यावर राजकीय पोळी शेकण्यात येते. प्रसंगी आंदोलने, निदर्शनेदेखील करण्यात येतात. यामुळे पक्षाला ‘मायलेज’ मिळते, प्रसंगी सत्तादेखील प्राप्त होते. परंतु बळीराजाच्या तोंडाला मात्र पानेच पुसण्यात येतात. कधी तो तांत्रिक अडचणींमुळे मदतीपासून वंचित राहतो तर कधी प्रशासकीय अनास्थेमुळे विकासापासून दूर होतो. तसे पाहिले तर शेतकरी आणि राजकारण या दोन्ही भिन्न भिन्न बाजू. मात्र राजकीय सोयीसाठी राजकारण्यांनी शेती, शेतकरी आणि त्यांच्या समस्या यांचा राजकीय स्वार्थासाठी पुरेपूर वापर केल्याचे दिसून येते. शेतकºयांबाबत या मंडळींना खरोखर किती तळमळ आहे, हादेखील संशोधनाचाच विषय आहे. आपल्या देशातील आणि राज्यातील राजकारणाच्या इतिहासाची पाने पलटली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून येते. शेतकरी कुटुंबातून आलेल्या राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या पदांपर्यंत मजल मारली. मात्र यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना यातील अनेक जण आपले मूळ कुठेतरी विसरले आणि स्वत:चा विकास साधत असताना शेतकºयांच्या समस्यांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. पक्ष कुठलाही असो शेतकरी समस्या ‘फिक्स्ड डिपॉझिट’प्रमाणे असून, हवा तसा आवश्यक वेळी वापरच करण्यात येतो. मात्र धरणीमायची सेवा करत शेतकरी मात्र संकटांच्या चक्रव्यूहात फसलेला आहे. आपल्या मेहनतीने पिकवून पोट भरणाºया शेतकºयाला नुकसानभरपाई मागणे खरे तर क्लेशदायकच असते. कुणाला मागणे ही त्याची प्रवृत्तीच नाही. उलट शेतकºयाला तंत्रज्ञान, विज्ञान यांचे बळ देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राजकारण्यांनी पुढाकार घ्यायला हवा. हे होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांना मनापासून समजून घेणारा, त्यांच्याशी समरस असणारा आणि सर्व प्रशासकीय, कायदेशीर बाबी जाणणारा प्रतिनिधी विधिमंडळात जाणे आवश्यक आहे. शेतकºयांनीदेखील यासाठी सर्व भेद विसरून एकत्र यायला हवे व आश्वासक नेतृत्व स्वत:मधून शोधायला हवे. असे झाले तरच शेतकºयाला खºया अर्थाने न्याय मिळेल आणि महाराष्ट्रात शेतकºयांना विकासमार्गावर नेणारे एका आश्वासक चित्र अनुभवायला मिळेल.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक