शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
7
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
8
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
9
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
10
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
12
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
13
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
14
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
15
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
16
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
17
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
18
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
19
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
20
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

विषमुक्त शेतीतून घेतले लाखोंचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 05:27 IST

‘पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती’ हा विचार अप्पा कारमरकर यांच्या मनात पक्का रुजला आहे.

- नारायण चव्हाण, सोलापूररासायनिक खतांमधील विष अन्नधान्यात उतरून समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, हा प्रमुख उद्देश समोर ठेवत मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पा कारमरकर यांनी विषमुक्त शेती करण्याचा निर्णय घेतला. रासायनिक खतांचा वापर न करता विषमुक्त शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न कारमरकर यांनी घेतले आहे. शेतीतील त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय ठरत आहे.पदवीधर असलेल्या आप्पा कारमकर यांचा शेतीविषयक अभ्यास चांगला आहे. परिसरातील प्रगतिशील शेतकºयांशी त्यांचा नित्याचा संपर्क असतो. यातूनच त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. अनगरसारख्या दुष्काळी भागात नेहमीच निसर्गाची अवकृपा असते. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करीत कारमरकर यांनी कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणारी पिके निवडली. ‘पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती’ हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला आहे.विषमुक्त शेतीचा ध्यास घेऊन कारमरकर सध्या काम करीत आहेत. त्यांनी शेवगा शेतीचा अवलंब केला. ‘ओडीसी’ जातीच्या वाणाची निवड केली. एक एकर जमिनीत शेवग्याची लागवड केली. अग्निज्वाला मिरची आणि झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड केली. तत्पूर्वी शेणखताचा वापर केला. गांडूळ खत, जीवामृताची शेतातच निर्मिती करून त्याचा पिकासाठी वापर सुरू केला. त्यासाठी त्यांना फारसा खर्च करावा लागला नाही. मात्र कष्ट जास्त करावे लागले. विषमुक्त शेतीमुळे खर्चात बचत होते, उत्पादनात वाढ होते, सुपिकता कायम राहते, हे ध्यानात घेऊन कारमरकर यांनी विषमुक्त शेतीलाच पसंती दिली.फवारणीसाठी जीवामृतदेशी गायीचे गोमूत्र एक मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली. त्यामुळे मावा थ्रिप्स बुरशी नाहीशी होते. दर १५ दिवसांनी पाच किलो काळा गूळ २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येते. त्यामुळे पिकाला कॅल्शियम मिळते.घरीच तयार केले जाते द्रावणएक लिटर तांदळाची पेज, २५० ग्रॅम दही, १०० ग्रॅम मीठ, १०० ग्रॅम काळा गूळ याचे मिश्रण करून सात दिवस अंधाºया खोलीत ठेवले जाते. सकाळ-संध्याकाळ मिश्रण ढवळणे व सात दिवसानंतर म्हणजे एक लिटर पाण्यात ५ मि.लि. द्रावण मिसळून फवारणी केली. यामुळे अळी, थ्रिप्स नाहीसे होतात. या द्रावणाच्या निर्मितीसाठी गोपालन करून विषमुक्त शेती करता येते.नाममात्र खर्च आणि उत्पन्न दीड लाखाचेअप्पा कारमरकर, त्यांच्या मातोश्री भामाबाई, पत्नी प्रियंका हे तिघेही स्वत: शेतीत कष्ट घेतात. गरजेनुसार रोजंदारीवर एखादा मजूरही लावतात; परंतु या शेतीचा खर्च तसा अत्यल्प असतो. खर्चवजा जाता दीड लाख रुपये उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. यापूर्वी त्यांनी तीन एकर जमिनीत शेवग्याची लागवड केली होती. त्यांना १५ लाखांचे विक्रमी उत्पादन मिळाले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर