शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

कोरोनाच्या आपत्तिकाळात महिलांवरील अत्याचाराची भर

By किरण अग्रवाल | Published: January 07, 2021 7:38 AM

कोरोना लसीच्या चाचणीबद्दलची चर्चा सध्या जोरात असून, यात निव्वळ वावड्यांचे किंवा गैरसमजाचेच प्रमाण अधिकतर दिसून येत आहे.

- किरण अग्रवाल

कोरोनापासून संरक्षणासाठी अनेकविध लसी समोर आल्या असल्या तरी, अजूनही कोरोनामुक्ती दृष्टिपथात नाही, कारण काळजी व खबरदारी हा यातील महत्त्वाचा भाग आहे जो जनतेकडून तितक्याशा गांभीर्याने घेतला जाताना दिसत नाही.कोरोनाच्या महामारीने व्यवहार व वर्तनात अनेक बदल घडवून आणले आहेत, नवी जीवनशैली विकसित केली आहे हे खरे; पण यातील वर्तनात सुधारणावादी प्रयत्न अपेक्षित असताना काही कटू अनुभवही समोर येत आहेत हे दुर्दैवी म्हणायला हवे.  कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव राहिलेल्या गत वर्षात सक्तीच्या सुट्ट्या व लॉकडाऊनमुळे बहुतेकांना कुटुंबीयांसोबत वेळ घालवावयास मिळाला याकडे कोरोनाची इष्टापत्ती म्हणून एकीकडे पाहिले जात असताना, दुसरीकडे याच काळात महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराच्या घटना वाढल्याचा राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल पुढे आल्याचे पाहता आपत्तीमधील भर म्हणून त्याकडे पाहिले जाणे स्वाभाविक ठरावे.

कोरोना लसीच्या चाचणीबद्दलची चर्चा सध्या जोरात असून, यात निव्वळ वावड्यांचे किंवा गैरसमजाचेच प्रमाण अधिकतर दिसून येत आहे. अर्थात ही लस घेतल्यानंतरच्या परिणामांवरील चर्चांना वैद्यकीय आधाराने अगर संशोधनाच्या संदर्भाने जी काही उत्तरे द्यावयाची ती दिली जात आहेत व खुलासे होत आहेतही; परंतु कोरोनामुळे झालेल्या भल्याबुऱ्या परिणामांची जी चर्चा होत आहे व त्यात कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची जी बाब पुढे आली आहे, ती अधिक चिंतेची म्हणावयास हवी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका अहवालानुसार गेल्या २०२० या वर्षात महिलांच्या तक्रारींचे प्रमाण कमालीचे वाढले असून, ते त्यापूर्वीच्या सहा वर्षांचा आढावा घेता त्यात सर्वाधिक आहे. यातही कुटुंबातच झालेल्या छळवणुकीच्या तक्रारींचे म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहे.

उत्तर प्रदेश यात आघाडीवर असून, पुरोगामित्वाचा झेंडा मिरवणारा महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. अर्थात, कुणाचा नंबर कितवा हा यातील मुद्दाच असू नये, तर कोरोना कालावधी हा वैद्यकीयदृष्ट्या अनेकांसाठी अडचणींचा ठरलेला असताना अनेक माता भगिनींसाठीही तो वेगळ्या अर्थाने त्रासदायी ठरला हे वेदनादायी आहे. हिंदीत ‘सोच बदलो, समस्या हल हो जायेगी’ असे म्हटले जाते; परंतु येथे तर समस्या कायम असतानाही सोच बदलताना दिसत नाही. समाजात वाढीस लागलेले वैचारिक अध:पतन यातून निदर्शनास यावे, कारण संकटाच्या काळातही काहींची उपद्रवी मानसिकता बदलताना दिसत नाही.

कोरोनाकाळात शासनातर्फे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना सक्तीची सुटी मिळाली .त्यामुळे तो काळ कुटुंबाबरोबर घालवायला मिळाला म्हणून आपत्तीतही इष्टापत्ती घडल्याची भावना अनेक जण बोलून दाखवत आहेत. कामाच्या व्यापात मुलांकडे लक्ष देऊ न शकलेल्या पालकांनी या काळात मुलांबरोबर खेळण्याचा आनंद घेतला, तर काहींनी वृद्ध माता-पित्यांसोबत वेळ घालवून समाधान अनुभवले. बहुतेकांनी मोबाइलद्वारे आपापल्या नातेवाईक व इष्ट मित्रांच्या ख्यालीखुशालीची विचारपूस केली, त्यातून कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ व्हावयास मदत झाली; पण दुसरीकडे ज्या माता-भगिनींना घरात कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत होते त्यांच्या त्रासात मात्र भर पडली. कोरोनामुळे उद्योग-व्यवसाय व बाजार बंद राहिल्याने पुरुष व शाळाही बंद असल्याने मुले घरातच होती, त्यामुळे तसाही गृहिणींवर कामाचा ताण वाढला होताच, त्यात त्यांच्या छळातही भर पडली म्हणायचे.

आपल्याकडील पुरुषप्रधानकी अशी की, काम वाढले म्हणून पुरुषांनी महिलांना घरकामात मदत केल्याचे प्रकार कमीच घडले असावेत; पण तरी अनेक भगिनींनी हा वाढीव ताण आनंदाने व सहर्ष स्वीकारला. पण याच अनुषंगाने काही भगिनींच्या वाट्याला मात्र छळवणुकीचा ताण आला, जो अन्याय, अत्याचाराचा होता हे दुर्दैवी. कोरोनाकाळात महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी वाढल्याची जी आकडेवारी पुढे आली ती म्हणूनच समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने कोरोनाच्या भीतीपेक्षाही अधिक चिंतेत भर घालणारी म्हणायला हवी. कोरोनावरील लसी विकसित झाल्याने या विषाणूचा नि:पात घडून येईलच; परंतु समाजातील काही जणांच्या कुजक्या व सडक्या विचारांचा किंवा मानसिकतेतील बदल कसा घडून यावा, हाच खरा प्रश्न आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या