शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

संपादकीय - कॉपी का करावी वाटते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 10:29 IST

शिक्षण व्यवस्थेतील घटकांशीच हातमिळवणी करून काही विद्यार्थी कॉपी करत असतील तर शाळेतल्या मूल्यशिक्षणाचे आजवरचे पाठ कुचकामी ठरले, असाच त्याचा अर्थ आहे

बोर्डाच्या परीक्षा सुरू होत असताना कॉपीमुक्तीचे बरेच मनावर घेऊन शिक्षण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय काढला आहे. नियमावली कठोर केली. कार्यशाळा घेऊन प्रबोधन केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे केंद्रांवर लक्ष असणार आहे. परिणामी, कॉपीमुक्ती अभियान यशस्वी होईल, यात शंका नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून, मेहनतीनेच गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे, हेही सर्वमान्य आहे; परंतु, मूळ प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना कॉपी का करावी वाटते? कोणत्या कारणामुळे विद्यार्थी कॉपी करतात? अभ्यास झाला नाही अथवा केला नाही, हे स्पष्टच असते. त्यातूनच गैरमार्ग शोधले जातात. मात्र, कॉपीच्या मानसिकतेमागे परीक्षा पद्धतीतील दोषही तितकेच कारणीभूत आहेत. आपल्या परीक्षा बुद्धिमत्तेच्या नव्हे तर स्मरणशक्तीच्या असतात. स्मरणशक्ती हे बुद्धिमत्तेचे एक अंग आहे वाचलेले, पाठांतर केलेले लक्षात ठेवून परीक्षेत उत्तम गुण मिळविणारे पुढे यशस्वी होतात असे नाही अथवा परीक्षेत कमी गुण मिळविलेले यशस्वी होत नाहीत, असेही नाही. परीक्षा पद्धतीमध्ये प्रात्यक्षिक, मुलाखत, लेखी परीक्षा, प्रकल्पलेखन, गृहप्रकल्प अशी मूल्यमापनाची एक ना दहा तंत्रे सांगता येतील. मात्र, आपल्याकडे सर्वाधिक महत्त्व लेखी परीक्षेला! प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी गुण देऊन आपणच त्याचे महत्त्व कमी केले आहे.

लेखी परीक्षा वगळता अन्य मूल्यमापन तंत्रांचा प्रामाणिक विनियोग होत नाही. त्यामुळे व्यवस्थेला लेखी परीक्षेवरच लक्ष केंद्रित करावे लागते. अलीकडे प्राथमिक शिक्षणामध्ये मूल्यांकनाची पद्धत वैविध्यपूर्ण होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांच्या जमेच्या बाजू कौशल्य याचे मोजमाप केले जात आहे; परंतु, तो जसाजसा पुढच्या वर्गात जातो तसे लेखी परीक्षेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. नव्या शैक्षणिक धोरणात मूल्यमापन पद्धत बदलण्यावर भर दिला आहे. हे सर्व बदल पुढील काळात होतील, तूर्त दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक करण्याकडे शासन आणि शिक्षण मंडळाचा कल आहे. त्यासाठी पुढील महिनाभर दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार आहे. विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षक, सबंध शाळेवर नजर ठेवण्यासाठी बैठे पथक; ते काम करते आहे की नाही, हे पाहण्यासाठी फिरते पथक त्यातूनही कोणी सुटते का, पाहण्यासाठी अधिकाऱ्यांचे दौरे असा सगळा माहोल असणार आहे. खरेतर दहावी-बारावीचे महत्त्व आता पुढील वर्गात प्रवेश घेणे इतपतच राहिले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी पूर्व परीक्षा द्याव्या लागतात. पारंपरिक उच्च शिक्षणासाठीही विद्यापीठ, महाविद्यालये परीक्षा घेतात. यापूर्वी वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे अधिक महत्त्व होते. अध्यापक महाविद्यालयाला प्रवेश मिळत होता, त्यावेळी दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आर्थिक उलाढाली होत असत. अनेक परीक्षा केंद्रे खास कॉपी प्रकरणांसाठी प्रसिद्ध होती. हमखास उत्तीर्ण करून देण्याचा ठेका घेतला जात असे. आता ती परिस्थिती नाही. एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाला तर पुरवणी परीक्षा घेऊन त्याचे वर्ष वाया जाणार नाही, अशी सोय असते. तरीही ज्यांचा अभ्यास वेगवेगळ्या कारणांनी कच्चा राहिला, अशा विद्यार्थ्यांना निदान दहावी- बारावी उत्तीर्णतेची गुणपत्रिका हवी असते, त्यामुळे कॉपीचे समूळ उच्चाटन झालेले नाही. शहरांमध्ये नियंत्रण आहे, ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक संवेदनशील केंद्रे असावीत. दहा मिनिटे आधी मिळालेली प्रश्नपत्रिका बाहेर जाणे आणि त्याच्या प्रतिलिपी तयार होणे हा उद्योग बंद झाला पाहिजे. जिथे सामूहिक कॉपी प्रकरणे समोर येतील तेथील शाळा, संस्थांवर कारवाई झाली पाहिजे. गेल्या काही वर्षात आयटीआयच्या प्रवेशासाठी मोठी गर्दी आहे. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकार रोखले गेले तर वर्षभर शाळेत जाणाऱ्या, नियमित अभ्यास करणाऱ्या मुलांना न्याय मिळेल.

शिक्षण व्यवस्थेतील घटकांशीच हातमिळवणी करून काही विद्यार्थी कॉपी करत असतील तर शाळेतल्या मूल्यशिक्षणाचे आजवरचे पाठ कुचकामी ठरले, असाच त्याचा अर्थ आहे. पुस्तक आणि जीवन व्यवहार याचा संबंध आपण मुलांना दाखवून देऊ शकलो नाही. कॉपी करून कदाचित उत्तीर्ण होता येईल; पण, यशस्वी होता येणार नाही, हे पटवून देऊ शकलो नाही. त्याचा दोष विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षण व्यवस्था आणि पालकांकडेच अधिक जातो. त्यामुळे कॉपीमुक्ती अभियान राबविताना विद्यार्थ्यांना अगदी गुन्हेगारच ठरविले जाईल, अशा तन्हेने नियमांची अंमलबजावणी होणार नाही, याची काळजी प्रशासनाला हळुवारपणे घ्यावी लागेल. 

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीPuneपुणे