शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
4
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
5
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
6
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
7
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
8
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
9
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
10
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
11
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
12
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
13
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
14
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
15
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
16
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
17
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
18
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
19
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
20
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: ही राडेबाजी कोणामुळे? जबाबदारी नेमकी कोणाची हेही निश्चित झाले पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 08:12 IST

गृहविभागापासून ज्या यंत्रणांची मदत आयोगाला निवडणुकीसाठी घ्यावी लागते तेथील विभागप्रमुख हे विद्यमान आयएएस, आयपीएस अधिकारी असतात. त्यामुळे ते आयोगाला फार मोजत नाहीत, असे तर नाही?

लोकसभा, विधानसभेलाही जे घडत नाही ते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मंगळवारी बघायला मिळाले. बोगस मतदानाचे प्रकार घडले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या भावाच्या फार्महाउसवर नोटांची बंडले, दारूच्या बाटल्या, बोटावरील शाई पुसण्यासाठीचे द्रव आढळले. गेवराईत तुफान हाणामारी झाली. कुठे गाड्यांची तोडफोड झाली, तर कुठे मारहाणीचे प्रसंग. आमदारच मतदान केंद्रावर जाऊन ‘मत कसे द्यायचे’ ते मतदाराला सांगत असल्याचा प्रकारही घडला. 

‘मेरा गाव, मेरा देश’ अशा पद्धतीने स्थानिक मुद्दे, सामाजिक समीकरणे यावर प्रामुख्याने ही निवडणूक झाली. त्यामुळे गावागावांतील कटुतेचे संदर्भही वेगळे होते. निवडणुकीत राडे करण्याबाबत नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीने एक पाऊल पुढे टाकले. अर्थात अनेक ठिकाणी सूत्रधार हे नेतेच होते. त्यांचा आश्रय असल्याशिवाय कार्यकर्ते हिंमतही करीत नाहीत. आपल्या राजकीय वर्चस्वासाठी एकमेकांना भिडवून देणारे नेते निवडणूक आटोपली की नामानिराळे होतात; पण, निवडणुकीदरम्यान आलेल्या कटुतेचे पडसाद दीर्घकाळ समाजात उमटत राहतात याचे भान कोण बाळगणार?  

लोकशाही प्रक्रियेतून होणाऱ्या निवडणुकीला काळिमा फासणारे लोक उद्या नगरपरिषदांमध्ये निवडून आले तर पाच वर्षांच्या त्यांच्या कारभारातही दादागिरी, खाबूगिरीचे प्रदर्शन होत राहील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मतदानादरम्यान जे धुमशान जागोजागी बघायला मिळाले त्यात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सामील होते. सात-आठ वर्षांपासून न झालेली निवडणूक आली आणि राजकीय इच्छा-आकांक्षा उचंबळून आल्या. 

नगरपरिषदांच्या माध्यमातून होणारी विकासकामे, त्यातील टक्केवारी यामुळे आता नगरपरिषदांना कधी नव्हे एवढे महत्त्व आले आहे. महत्त्वाकांक्षेची जागा राक्षसी महत्त्वाकांक्षेने घेतली असून, त्यातूनच हिडीस प्रसंग घडत आहेत. पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा हे आता खालपर्यंत झिरपले असून, त्याला अटकाव करणे कठीण झाले आहे. असे प्रकार रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची हेही निश्चित झाले पाहिजे.  

या संपूर्ण निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगावर टीकेची सर्वपक्षीय झोड उठली. आयोगाने अनेक घोळ घातले. निवडणूक शांततामय वातावरणात व्हावी यासाठीची सर्वांत मोठी जबाबदारी अर्थातच आयोगाची होती. निवडणुकीच्या काळात संबंधित सर्व यंत्रणा या आयोगाच्या कक्षेत येतात आणि त्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन हे या यंत्रणांना करावेच लागते. निवडणूक म्हटली की प्रत्येक ठिकाणच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखावी लागते. 

राजकीयदृष्ट्या संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, नगरपरिषदा कोणत्या याचे सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित असते. ते गृहविभागाच्या मदतीने आयोगाने करून ठेवलेले होते का? आणि करून ठेवलेले होतेच तर मतदानादरम्यान जे घडले ते रोखता का आले नाही, हा प्रश्न आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेने वेळोवेळी पोलिस दल आणि आयोगाला संभाव्य संवेदनशील केंद्रांबाबत माहिती दिली होती का? दिली असेल तर ती कितपत गांभीर्याने घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या हेही समोर आले पाहिजे. 

आयोगाचे आयुक्त किंवा सचिव हे निवृत्त आयएएस अधिकारी असतात. एका अर्थाने हा आयोग म्हणजे रिटायर्ड क्लबच. गृहविभागापासून ज्या यंत्रणांची मदत आयोगाला निवडणुकीसाठी घ्यावी लागते तेथील विभागप्रमुख हे विद्यमान आयएएस, आयपीएस अधिकारी असतात. त्यामुळे ते आयोगाला फार मोजत नाहीत, असे तर नाही? केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश जेवढ्या गांभीर्याने घेतला जातो तेवढे गांभीर्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांबाबत नसते. 

निवडणुका भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व यंत्रणांमध्ये परस्पर समन्वय नव्हता, हे उघड होते. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका अद्याप बाकी आहेत. नगरपरिषदांचा टप्पा दोनही बाकी आहे. पहिल्या मोठ्या टप्प्यात जे काही विपरीत घडले त्याची पुनरावृत्ती तरी नको.. राडा संस्कृतीने महाराष्ट्राची अप्रतिष्ठा झाली आहेच; ती आणखी होऊ नये एवढेच. 

‘नगरपरिषदांच्या निवडणुकीत आयोगाने घातलेल्या गोंधळाची पुनरावृत्ती नंतरच्या निवडणुकांत होऊ देऊ नका,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहेच. मारपीट, पैसेवाटप, दारूचा महापूर, प्रलोभनांचे पीक, शिवराळ भाषेचा वापर या प्रकारांचीही पुनरावृत्ती होणार नाही याची हमी सर्वच राजकीय पक्षांनी दिली तर महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणखी तडे जाणार नाहीत एवढेच!

English
हिंदी सारांश
Web Title : Who is responsible for the election violence and chaos?

Web Summary : Local body elections marred by violence, bogus voting, and bribery. Leaders instigate, then distance themselves, leaving lasting social divisions. All parties involved; commission faces criticism. Future elections must be peaceful.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElectionनिवडणूक 2024Crime Newsगुन्हेगारीHome Ministryगृह मंत्रालय