शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

...अन्यथा महाआघाडीची ‘पाॅवर’ बळकट हाेत जाईल, याबाबत संदिग्धता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 3:19 AM

‘भाजप विरुद्ध सर्व’ या मस्तीत ते आहेत. भाजप एवढा माेठा भाऊ झाला आहे की, सर्व एकत्र येऊनदेखील पराभव करू शकत नाहीत आणि विधान परिषदेच्या सहाही जागा जिंकू शकताे, असाच दावा करत चंद्रकांत पाटील फिरत हाेते

‘तीन राजकीय पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ‘पाॅवर’ किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं !’ अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या सहा जागांच्या निकालावर दिली आहे. ही प्रतिक्रिया केवळ बाेलकीच नव्हती, तर निकालानंतर आकलन झाल्याने भानावर आल्यासारखी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भानावर येण्याची शक्यता दिसत नाही. ‘असेल हिंमत तर एक एकट्याने लढा’ असे प्रतिआव्हान दिले आहे. ‘भाजपने ही हिंमत बिहारमध्ये दाखवायला हरकत नव्हती,’ असा काेणी पलटवार केला तर...? केवळ वाचाळवीरांनी महाआघाडीची ‘पाॅवर’ भक्कम केली. महाविकास आघाडीचा जन्म काेणत्या राजकीय पार्श्वभूमीवर झाला आहे, याचेही भान भाजपला राहिलेले नाही.

‘भाजप विरुद्ध सर्व’ या मस्तीत ते आहेत. भाजप एवढा माेठा भाऊ झाला आहे की, सर्व एकत्र येऊनदेखील पराभव करू शकत नाहीत आणि विधान परिषदेच्या सहाही जागा जिंकू शकताे, असाच दावा करत चंद्रकांत पाटील फिरत हाेते. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पाेटनिवडणुका अशा निवडणुकीत शरद पवार अलीकडे सहभागी हाेत नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील प्रचारात नव्हते. तरीदेखील चंद्रकांत पाटील यांनी त्या दाेघांवर टीका करून राज्यभर फिरत हाेते. त्याला पवारांच्या अनुयायांनीच उत्तरे दिली. शरद पवार यांनी ‘ब्र’ही काढला नाही. यातच भाजपचा पराभव दडला हाेता. साेलापूरच्या एका सभेत फडणवीस यांना सांगावे लागले की, ‘शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर टीका करताना मर्यादा पाळाव्यात.’  पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला. पुणे आणि नागपूर हा तर भाजप आपला बालेकिल्ला मानत आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काेथरूडची सुरक्षित जागा घेऊन मेधा कुलकर्णी या सक्षम, कार्यक्षम आमदारांना घरी बसवून ठेवले. त्यावर भाजपला मानणाऱ्या मतदारांत प्रचंड नाराजी आहे.

‘पुणे पदवीधर’मधून मेधाताईंना उमेदवारी दिली जाईल, असे मानले जात हाेते. पण त्यांना मराठा उमेदवाराची गरज वाटत हाेती. नागपूरचा निकाल तर भाजपसाठी धक्कादायक आहे. सलग अनेक निवडणुका या मतदारसंघातून भाजपने जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे नागपूर म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच फडणवीस यांची भाषा एकदम बदलली. सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने काेराेना महामारीच्या भीतीने जनता गर्भगळीत झाली असताना समाजात फार माेठा असंताेष आहे, ताे प्रकट हाेणार आहे, आणि महाआघाडीचे सर्व उमेदवार पराभूत हाेणार आहेत. हे भाजपचे आकलनच चुकीचे हाेते. जनताही सरकारला समजून घेते. जनता लाटेवर स्वार हाेऊन सत्ता मिळाली हाेती. त्यानंतर पावणेतीन वर्षांतच सर्व काही विसरून भारतीय जनतेने इंदिरा गांधी यांच्या हाती सत्ता दिली हाेती. याची आठवण सर्वच राजकीय पक्षांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. जनतेचेही आकलन चालू असते, शिवाय महाआघाडीतील घटक पक्षांना एकत्रित ‘पाॅवर’ दाखविण्याची ही पहिलीच संधी हाेती.

मुंबईसह काेकणात शिवसेना स्वत:च्या बळावर आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शिवसेनेत पूर्वाश्रमीच्या काॅंग्रेसवाल्यांचा भरणा आहे. त्यांना काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेणे अवघड जात नाही. एकनाथ खडसे, मेधा कुलकर्णी आदींना दिलेल्या वागणुकीचाही एक परिणाम सुप्तपणे मतदारांत हाेता. सत्ता, पैसा आणि विभाजनवादी राजकारणाने काेणतीही निवडणूक जिंकता येते, असा एक गैरसमज भाजपमध्ये पसरला आहे. ही निवडणूक सुशिक्षित वर्गात आणि महाराष्ट्रातील छत्तीसपैकी चाेवीस जिल्ह्यांत पार पडली आहे. त्यामुळे राज्यात विद्यमान सरकारविषयी असंताेष आहे की नाही, याचीही चाचपणी हाेती. आगामी काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार आहेत. त्यात महाविकास आघाडीचाच कस लागणार आहे. भाजपने या पराभवातून धडा घेतला किंबहुना परिस्थितीचे नीट आकलन करून घेतले तर मतदार साथ देतील. धुळे, नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांची निवडणूक साडेचारशे मतदारांपुरती हाेती. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विराेधी पक्षाने अधिक सामंजस्यपणा दाखवून राजकारण करावे लागेल, अन्यथा महाआघाडीची ‘पाॅवर’ बळकट हाेत जाईल, याबाबत संदिग्धता नाही.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा