शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 07:23 IST

Maharashtra Local Body Elections: ही निवडणुका घेण्याची परवानगी सशर्त आहे आणि त्या शर्तीमुळे जवळपास नऊ-दहा वर्षांनंतर राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर शेवटपर्यंत पोटनिवडणुकांची तलवार टांगती राहणार आहे.

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून लोकप्रतिनिधींना बंद असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे दरवाजे किलकिले होत आहेत. नगरपालिका व नगरपंचायतींच्या रूपाने स्थानिक निवडणुकांचा पहिला टप्पा मार्गी लागतो आहे. उद्या, मंगळवारी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती मिळून २८८ छोट्या शहरांमध्ये मतदान होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयाने महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी या सगळ्याच निवडणुकांचे निकाल पुढे जानेवारीत होणारी संबंधित याचिकांवरील सुनावणी आणि निकालांवर अवलंबून असतील. म्हणजे ही निवडणुका घेण्याची परवानगी सशर्त आहे आणि त्या शर्तीमुळे जवळपास नऊ-दहा वर्षांनंतर राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर शेवटपर्यंत पोटनिवडणुकांची तलवार टांगती राहणार आहे. 

विशेषतः इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्यांसाठी सारे काही प्रचंड मनस्तापाचे असेल. त्याशिवाय अनेक नगरपरिषदा व नगरपालिकांमधील नगराध्यक्ष तसेच काही वॉर्डामधील चुकीचे आरक्षण व इतर बाबी न्यायालयात गेल्या. त्यावरील निकाल लागले नसल्याने त्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार आहे? खेड्यापाड्यातील ग्रामपंचायती, त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदा ही ग्रामीण लोकप्रतिनिधित्वाची व्यवस्था, तसेच मोठ्या गावांमधील नगरपंचायती नगरपालिका, त्याहून मोठ्या शहरांमधील महापालिका ही शहरी प्रतिनिधित्वाची व्यवस्था हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. 

या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्याराज्यांची विधानमंडळे आणि अंतिमतः लोकसभा व राज्यसभा मिळून संसद ही त्रिस्तरीय व्यवस्थाच लोकशाही बळकट करते. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रामुख्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेली चार वर्षे रखडल्या. 

कोणतेही लोकसंख्या सर्वेक्षण किंवा आकडेवारीशिवाय लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२१ मध्ये चाप लावला. 'ट्रिपल टेस्ट'चा दंडक घालून दिला. त्या कारणाने ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका जुलै २०२१ मध्ये थांबवण्यात आल्या. मुंबई, पुणे, नागपूर यासह २९ महानगरपालिकांमधील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये संपला. तेव्हापासून या महापालिका प्रशासकांच्या म्हणजे आयएएस अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. यासोबतच ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांवरही प्रशासकांचे राज्य आहे. 

हे प्रशासक सामान्य नागरिकांचे ऐकत नाहीत. शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता या सेवांना त्यांचे प्राधान्य नसते. त्यांच्या कारभारात पारदर्शकता नाही आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावर अंकुश नाही. परिणामी, अशा प्रशासकांच्या काळातील कथित भ्रष्टाचार हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. ही प्रशासकीय व्यवस्था राज्यातील सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची असते. 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणपणे सव्वा ते अडीच लाख लोक विविध ठिकाणी निवडून येतात. राजकारणासाठी इतक्या सगळ्यांना सांभाळणे किंवा विश्वासात घेण्याऐवजी साडेतीनशेच्या आसपास प्रशासकांना आदेश देणे, त्यांच्यामार्फत हवे ते कार्यक्रम राबविणे, सरकारचे धोरण अंमलात आणणे सोपे असते. झालेच तर आता नगरपालिका- नगरपंचायतींच्या प्रचारात जी 'मते द्या, निधी देतो' ही देवाणघेवाणीची भाषा सुरू आहे, तिचेही मूळ मोजक्या प्रशासकांच्या माध्यमातून कारभार चालवण्याच्या नेत्यांच्या सवयीमध्ये आहे. 

राज्याचे राजकारण करणाऱ्यांना या संस्था कार्यकर्त्यांसाठी सोडायच्या नाहीत. म्हणूनच आई, पत्नी, मुले-मुली, भाऊ-भावजय वगैरे कुटुंबातील माणसे निवडून आणून या संस्था ताब्यातठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशीही आपली एकूणच राजकीय व्यवस्था एक विचार, एक पक्ष, एक नेता अशी एकाधिकारशाहीकडे प्रवास करत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधित्वाची व्यवस्था मोडकळीस येत असल्याबद्दल कुणाला खेद ना खंत. 

राजकारणातील दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांचे या प्रशासकीय राजवटींनी केलेले नुकसान खूप मोठे आहे. जवळपास १० वर्षांच्या खंडानंतर आता हे कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, बदललेल्या राजकारणाशी हे कार्यकर्ते कसे जुळवून घेतात आणि न्यायालयाच्या अंतिम निकालाची टांगती तलवार डोक्यावर असताना कसे काम करतात, हे पाहावे लागेल. एकंदरीत स्थिती अशी आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांची अशी लुळी-पांगळी व्यवस्था अजाणतेपणाने नव्हे तर जाणीवपूर्वक उभी केल्याचा संशय यावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Local Body Polls: Workers Suffer, Officials Escape Accountability?

Web Summary : Maharashtra's local body elections are resuming after four years, but face legal hurdles concerning OBC reservations. Officials responsible for delays face no action, while political workers bear the brunt of uncertainty. The administrative control favored by ruling parties undermines local democracy.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElectionनिवडणूक 2024Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग