शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
4
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
5
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
6
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
7
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
8
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
9
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
10
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
11
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
12
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
13
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
14
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
15
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
16
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
17
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
18
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
19
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
20
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 07:23 IST

Maharashtra Local Body Elections: ही निवडणुका घेण्याची परवानगी सशर्त आहे आणि त्या शर्तीमुळे जवळपास नऊ-दहा वर्षांनंतर राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर शेवटपर्यंत पोटनिवडणुकांची तलवार टांगती राहणार आहे.

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून लोकप्रतिनिधींना बंद असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे दरवाजे किलकिले होत आहेत. नगरपालिका व नगरपंचायतींच्या रूपाने स्थानिक निवडणुकांचा पहिला टप्पा मार्गी लागतो आहे. उद्या, मंगळवारी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती मिळून २८८ छोट्या शहरांमध्ये मतदान होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयाने महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी या सगळ्याच निवडणुकांचे निकाल पुढे जानेवारीत होणारी संबंधित याचिकांवरील सुनावणी आणि निकालांवर अवलंबून असतील. म्हणजे ही निवडणुका घेण्याची परवानगी सशर्त आहे आणि त्या शर्तीमुळे जवळपास नऊ-दहा वर्षांनंतर राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर शेवटपर्यंत पोटनिवडणुकांची तलवार टांगती राहणार आहे. 

विशेषतः इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्यांसाठी सारे काही प्रचंड मनस्तापाचे असेल. त्याशिवाय अनेक नगरपरिषदा व नगरपालिकांमधील नगराध्यक्ष तसेच काही वॉर्डामधील चुकीचे आरक्षण व इतर बाबी न्यायालयात गेल्या. त्यावरील निकाल लागले नसल्याने त्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार आहे? खेड्यापाड्यातील ग्रामपंचायती, त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदा ही ग्रामीण लोकप्रतिनिधित्वाची व्यवस्था, तसेच मोठ्या गावांमधील नगरपंचायती नगरपालिका, त्याहून मोठ्या शहरांमधील महापालिका ही शहरी प्रतिनिधित्वाची व्यवस्था हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. 

या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्याराज्यांची विधानमंडळे आणि अंतिमतः लोकसभा व राज्यसभा मिळून संसद ही त्रिस्तरीय व्यवस्थाच लोकशाही बळकट करते. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रामुख्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेली चार वर्षे रखडल्या. 

कोणतेही लोकसंख्या सर्वेक्षण किंवा आकडेवारीशिवाय लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२१ मध्ये चाप लावला. 'ट्रिपल टेस्ट'चा दंडक घालून दिला. त्या कारणाने ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका जुलै २०२१ मध्ये थांबवण्यात आल्या. मुंबई, पुणे, नागपूर यासह २९ महानगरपालिकांमधील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये संपला. तेव्हापासून या महापालिका प्रशासकांच्या म्हणजे आयएएस अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. यासोबतच ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांवरही प्रशासकांचे राज्य आहे. 

हे प्रशासक सामान्य नागरिकांचे ऐकत नाहीत. शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता या सेवांना त्यांचे प्राधान्य नसते. त्यांच्या कारभारात पारदर्शकता नाही आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावर अंकुश नाही. परिणामी, अशा प्रशासकांच्या काळातील कथित भ्रष्टाचार हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. ही प्रशासकीय व्यवस्था राज्यातील सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची असते. 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणपणे सव्वा ते अडीच लाख लोक विविध ठिकाणी निवडून येतात. राजकारणासाठी इतक्या सगळ्यांना सांभाळणे किंवा विश्वासात घेण्याऐवजी साडेतीनशेच्या आसपास प्रशासकांना आदेश देणे, त्यांच्यामार्फत हवे ते कार्यक्रम राबविणे, सरकारचे धोरण अंमलात आणणे सोपे असते. झालेच तर आता नगरपालिका- नगरपंचायतींच्या प्रचारात जी 'मते द्या, निधी देतो' ही देवाणघेवाणीची भाषा सुरू आहे, तिचेही मूळ मोजक्या प्रशासकांच्या माध्यमातून कारभार चालवण्याच्या नेत्यांच्या सवयीमध्ये आहे. 

राज्याचे राजकारण करणाऱ्यांना या संस्था कार्यकर्त्यांसाठी सोडायच्या नाहीत. म्हणूनच आई, पत्नी, मुले-मुली, भाऊ-भावजय वगैरे कुटुंबातील माणसे निवडून आणून या संस्था ताब्यातठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशीही आपली एकूणच राजकीय व्यवस्था एक विचार, एक पक्ष, एक नेता अशी एकाधिकारशाहीकडे प्रवास करत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधित्वाची व्यवस्था मोडकळीस येत असल्याबद्दल कुणाला खेद ना खंत. 

राजकारणातील दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांचे या प्रशासकीय राजवटींनी केलेले नुकसान खूप मोठे आहे. जवळपास १० वर्षांच्या खंडानंतर आता हे कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, बदललेल्या राजकारणाशी हे कार्यकर्ते कसे जुळवून घेतात आणि न्यायालयाच्या अंतिम निकालाची टांगती तलवार डोक्यावर असताना कसे काम करतात, हे पाहावे लागेल. एकंदरीत स्थिती अशी आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांची अशी लुळी-पांगळी व्यवस्था अजाणतेपणाने नव्हे तर जाणीवपूर्वक उभी केल्याचा संशय यावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Local Body Polls: Workers Suffer, Officials Escape Accountability?

Web Summary : Maharashtra's local body elections are resuming after four years, but face legal hurdles concerning OBC reservations. Officials responsible for delays face no action, while political workers bear the brunt of uncertainty. The administrative control favored by ruling parties undermines local democracy.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElectionनिवडणूक 2024Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग