शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

संपादकीय - दुष्काळात तेरावा महिना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 07:42 IST

बातमी जीव टांगणीला लावणारी, पोटात गोळा आणणारी आहे. या वर्षी पाऊस कमी होणार असे हवामानाचा,

बातमी जीव टांगणीला लावणारी, पोटात गोळा आणणारी आहे. या वर्षी पाऊस कमी होणार असे हवामानाचा, पाऊस-पाण्याचा अंदाज वर्तवणारी ‘स्कायमेट’ नावाची संस्था म्हणते. तिच्या म्हणण्यातही निरीक्षण, संशोधन, वैज्ञानिक सिद्धांत आणि अभ्यासाची जोड असल्याने जोर आहे. म्हणूनच चित्त थाऱ्यावर नाही. सध्या दुष्काळाने कंबरडे मोडले. गेल्या चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. येणारे वर्ष चांगले असेल अशा आशेवर असणाऱ्यांना गेले वर्ष चांगले होते अशी प्रचिती येते. आता पुढचे वर्षही खडतर असणार असे दिसत असताना जगण्यावरची वासनाच उडावी अशी अवस्था आहे. शेती पार मोडून गेली, गावंच्या गावं रोज घाघरभर पाण्यासाठी रात्रंदिवस टँकरची वाट पाहत दिवस ढकलत आहेत. पाणीच नसल्याने खेड्यांमध्ये उदासीनता भरून राहिलेली. कोणाच्या चेहºयावर की वातावरणात कुठेही चैतन्याचा टिपूस नाही. जनावरांना चारा नाही; मिळेल तो चघळचोथा खात ती रानोमाळ भटकताना दिसतात. चारा मिळत नाही आणि मिळालाच तर त्याचे अस्मानाला भिडलेले भाव पाहता विकत घेण्याची ऐपत नाही.

हाताला काम नसल्याने गावागावात लोक हातावर हात ठेवून बसलेले दिसताना आढळतात. जगण्याची उमेदच संपल्याने ना त्यांच्यात्त संवाद होतो ना गप्पांचे फड रंगतात. काय बोलावे हाही प्रश्न आहेच असा विचित्र विळखा या दुष्काळाने घातला असताना आता पुढच्या वर्षी हेच वाढून ठेवल्याचे चित्र ‘स्कायमेट’ने चितारले आणि उरलासुरला जीवनरस आटून गेला. ग्रामीण महाराष्ट्राचे जनजीवन उद्ध्वस्त करणारा हा अंदाज आहे. ‘अल निनो’च्या परिणामाचा अनुभव आपल्या गाठीला आहे. स्कायमेटच्या आजवरच्या अंदाजाचा मागोवा घेतला तर गेल्या चार वर्षांत एकदाच म्हणजे २०१५ साली तो अचूक ठरला. या वर्षीच्या अंदाजाचे विश्लेषण करायचे म्हटले तर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ५५ टक्के आहे. याचाच अर्थ लावायचा तर दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही आणि यामुळे ग्रामीण महाराष्ट्र मोडून पडणार यात शंका नाही. पॅसिफिक महासागरातील ‘अल निनो’ हा प्रवाह आपल्यावर मोठा परिणाम करतो. हा ‘स्कायमेट‘चा अंदाज म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. असे अनेक विचारप्रवाह हवामान क्षेत्रात आहेत. डॉ. श्रीनिवास औंधकर या शास्त्रज्ञांनी तीन वर्षांपूर्वी पृथ्वीवर अल्पकालीन हिमयुग अवतरणार, असा अंदाज वर्तविला होता आणि त्यावरून मोठा गदारोळही उठला होता. परंतु गेल्या तीन वर्षांत पृथ्वीवर झालेली बर्फवृष्टी आणि तापमानात झालेला बदल पाहता त्यांच्या निरीक्षणाला पुष्टी मिळते, असे अल्पकालीन हिमयुग यापूर्वी इ.स. १५०० ते १५५० आणि १७९० ते १८३० या काळात अवतरले होते. हवामानशास्त्रात डालटन मिनिमम आणि माउंडट मिनिमम या नावांनी ती ओळखली जातात. तशीच अवस्था आता निर्माण झाली आहे. पृथ्वीचे वातावरण थंड होत असतानाच विषुववृत्तीय पट्ट्यात ते वाढते आणि त्याचा हा परिणाम असतो. आताची ही अवस्था २०२३ पर्यंत राहील व पुढे २०३२ पर्यंत हळूहळू त्यात सुधारणा होईल, असाही अंदाज आहे.

दुसºया आणखी एका मतप्रवाहानुसार गेल्या वर्षभरात देशभरातील थंडीचे प्रमाण आणि कालावधी वाढला. त्यामुळे चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कारण समुद्रावरून निघालेल्या ढगांना हिमालयातच थंड हवा मिळण्याने तेथे पाऊस वाढला; पण इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहूनही पाऊस पडला नाही. कारण सांद्रीभवनासाठी तेवढे थंड वातावरण या भागात नव्हतेच. आता वातावरण थंड झाले आहे. एरव्ही फेब्रुवारीत ४० चा पारा गाठणारे तापमान या वर्षी एप्रिलपर्यंत लांबले. त्यावरून या वर्षी सांद्रीभवनासाठी योग्य वातावरण असल्याने चांगले पर्जन्यमान होईल, अशी मतमतांतरे असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही; पण या सगळ्याचा एकत्रित परिणाम जनमानसावर होत असतो. वर्ष कसेही गेले, मराठवाड्याच्या भाषेत ‘बखाडी’ पडली, तरी उद्यावर भरवसा ठेवत बळीराजा पुन्हा उभारीने उभा राहतो. कारण दुष्काळाशी दोन हात करणे काही नवे नाही; पण हा अंदाज म्हणजे दुष्काळात तेरावा महिना!.

मैलोन् मैल ओसाड जमीन, नजर थंड होईल असा हिरवाईचा साधा ठिपकाही नाही. गेल्या चार-पाच वर्षांत नदीनाल्यातून पाणी गेले नाही. शेतातूनच ते बाहेर पडले नाही. परिणामी विहिरी आटल्या. त्यात पाण्याचा टिपूस नाही. मग शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसFarmerशेतकरी