शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

संपादकीय - गरीब माणसांना आधार, पण नागरी बँकांच्या मर्यादा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 05:45 IST

शेड्युल्ड बँकांची थकबाकी (एनपीए) गेल्या मार्चअखेर ३.९ टक्के होती. नागरी सहकारी बँकांची थकबाकी ८.७ टक्क्यांवर पोहोचली आहे.

‘बँका या प्रामुख्याने ठेवीदारांवर चालतात. मध्यमवर्गीय, निवृत्त आणि गरीब लोकांनी बँकेत ठेवलेला पैसा राखणे, हे कार्य कोणत्याही देवळात किंवा गुरुद्वारामध्ये जाण्यापेक्षाही पवित्र आहे,’ असे उद्गार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच काढले आहेत. देशातील नागरी सहकारी बँकांच्या संचालकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या, ते बरे झाले. कारण, नागरी सहकारी बँकांमध्ये बसलेले संचालक म्हणजे त्या बँका आणि त्यातील पैशाचे मालक असल्यासारखे वागतात. परिणामत: कर्जरूपाने वाटलेल्या पैशाची वसुली वेळेवर होत नाही. बँका एनपीएमध्ये जातात. त्याचा थेट परिणाम बँकांच्या अर्थकारणावर होतो. अशा शेकड्यांनी बँका बुडाल्या आहेत. बंद पडल्या आहेत. बंद पडलेल्या बँकांची थकीत कर्जे वसूल होण्याची शक्यताच मावळते. त्याचा तोटा मात्र कोणतीही चूक नसणाऱ्या ठेवीदारांना होतो. किमान काही परतावा व्याज रूपाने मिळावा म्हणून सामान्य माणूस बँकेत ठेवी ठेवतो. तो पैसा कर्जरूपाने देत असताना योग्य काळजी घेतली जात नाही.

शेड्युल्ड बँकांची थकबाकी (एनपीए) गेल्या मार्चअखेर ३.९ टक्के होती. नागरी सहकारी बँकांची थकबाकी ८.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. नागरी सहकारी बँकांनी पतपुरवठा करताना जोखीम स्वीकारू नये, त्याचे व्यवस्थापन नीट करावे, अशी अपेक्षाही शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली, वाढली. अलीकडे मात्र या सहकारी चळवळीत विश्वस्तांची भूमिका न निभावता मालकत्वाची भावना वाढीस लागल्याने अनेक बँकांवर कारवाईचा बडगा रिझर्व्ह बँकेला उगारावा लागला. यामध्ये राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचाही समावेश आहे. या सर्व बँका रिझर्व्ह बँकेच्या नियम-निकषानुसार पतव्यवहार करीत असल्या तरी पतजोखमीचे व्यवहार महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० नुसार चालतो. अनेक नागरी सहकारी बँका सामान्य माणसाला छोट्या-छोट्या व्यवहारासाठी पतपुरवठा करतात; पण त्यात जोखीम अधिक असते. अशा बँका चालविणारे त्या-त्या बँकांच्या कार्यक्षेत्रातील कर्जदारास ओळखत असले तरी सहकारी कायद्यातील पळवाटांमुळे थकीत गेलेले कर्ज वसूल करणे अशक्य होते. असंख्य नागरी सहकारी बँकांचे संचालक राजकारण्यांच्या जवळचे असतात.  

थकबाकीदारांशी त्यांचे राजकीय संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची नियमावली कडक केली जात नाही. सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करून थकबाकी वसूल करण्यासाठी बँकांना जादा अधिकार देणे क्रमप्राप्त आहे. शिवाय तारण मालमत्तेवर ताबा मिळविण्यासाठी सहकार तसेच महसुली कायद्यात असंख्य पळवाटा असल्याने ते शक्य होत नाही. अनेकवेळा सहकार खाते, महसुली आणि पोलिस प्रशासनाची मदत घेऊन नागरी सहकारी बँकांना वसुलीचा बडगा उगारावा लागतो. मात्र, ही सर्व खाती राजकारण्यांच्या प्रभावाखाली चालत असल्याने नागरी सहकारी बँकांना विविध विभागांकडे मदत घेऊन कारभार करावा लागतो. त्यात दमछाक होते नागरी सहकारी बँकांची. थकबाकी राहिली तरी कारवाई होण्यास खूप कालावधी लागतो, याची माहिती कर्जदारालादेखील असल्याने त्यावरील वचक राहत नाही. ज्या कर्जाच्या गुंतवणुकीने हमखास परतावा मिळण्याची शक्यता असे कर्जदार राष्ट्रीयीकृत बँकांकडे जातात. असंघटित गरीब माणसाला नागरी बँकांचा आधार असतो. औद्योगिक किंवा व्यावसायिक कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना असल्याने अशा वर्गाला पतपुरवठा होतो. त्यांचा परतावाही चांगला, नियमित राहतो. नागरी सहकारी बँकांच्या एनपीएची वाढती आकडेवारी खरोखर चिंताजनक आहे. त्यात महागाई, चलनवाढ, आर्थिक मंदी आदी कारणेदेखील आहेत. वाढती बेरोजगारीसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिणामांना तोंड देत नागरी सहकारी बँकांना व्यवसाय करावा लागतो. ही बाजू महत्त्वाची असली तरी नागरी बँकांना राज्य सरकारने सहकार कायद्यात महत्त्वाचे बदल करून त्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करायला मदत केली पाहिजे. रिझर्व्ह बँकेला ही बाजूदेखील केंद्र आणि सर्व राज्य सरकारांच्या लक्षात आणून द्यावी लागेल. मध्यम, निवृत्त आणि गरीब वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत असला तरी तो संख्येने मोठा आहे. त्याच्या गरजा भागविण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करून नागरी सहकारी बँकांना बळ द्यायला हवे!

टॅग्स :Shaktikanta Dasशक्तिकांत दासBanking Sectorबँकिंग क्षेत्र