शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 6:02 AM

तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे.

टी-ट्वेन्टीचा जन्म झाला तोच मुळी क्रीडाप्रेमींना झटपट वेळेत जास्तीत जास्त आनंद देण्याच्या हेतूने. पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट कंटाळवाणे झाल्यानंतर मर्यादित षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटचा उतारा शोधला गेला; पण हेही क्रिकेट ‘प्रदीर्घ’ वाटू लागले, कारण स्पर्धा होती ती अवघ्या दीड तासात खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलशी, तासाभरात संपणाऱ्या बास्केटबॉलशी, फार तर तीन तासांत संपणाऱ्या टेनिस या प्रचंड वेगवान खेळांशी. आताचे टी-ट्वेन्टी क्रिकेटही तीन तासांत संपते. या लघुत्तम प्रकाराने क्रिकेटचा दर्जा वाढवणाऱ्या काही गोष्टी नक्की आणल्या. क्षेत्ररक्षणाचा दर्जा अफलातून सुधारला. सीमारेषेवरून जाणारे चेंडू चक्क उडत झेलणारे ‘सुपरमॅन’ तयार झाले. मशीनगनमधून सलग बरसणाऱ्या गोळ्यांप्रमाणे बॅटमधून चौकार-षटकारांचा अथक पाऊस पाडणारे स्फोटक फलंदाज निर्माण झाले. कमालीच्या काटेकोरपणाने, जराही न चुकता सतत गगनभेदी आणि दूर अंतरावर चेंडू भिरकावून देण्याच्या क्षमतेने फलंदाजी वेगळ्याच उंचीवर गेली. वीस षटकांच्या खेळात सहजपणे पंधरा-वीस षटकार, तितकेच चौकार पहायला मिळत आहेत. नुसता धूमधडाका.

प्रश्न हा आहे की ही फलंदाजी अचाट असली तरी प्रत्येकवेळी ती देखणी असतेच असे नाही. कलात्मक असते असेही नाही. आक्रसलेल्या सीमारेषा, हलक्या बॅट, टणक चेंडू आणि थेट व्यायामशाळेतून खेळपट्टीवर येणारे दणकट फलंदाज यामुळे चुकलेला फटकासुद्धा सहजपणे षटकार झालेला असतो. एकूणच या प्रकारामुळे ‘टी-ट्वेन्टी’त उतरणारा गोलंदाज आणि कत्तलखान्याकडे चाललेला बोकड यात फार फरक उरलेला नाही. षटकामागे सात-आठची सरासरीसुद्धा आता ‘उत्तम’ समजली जाते आणि निर्धाव चेंडूला ‘टी-ट्वेन्टी’त ‘गोल्ड डस्ट’ म्हटले जाते.
‘टी-ट्वेन्टी’चा पहिला विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला. पुढच्याच वर्षी क्रिकेट विश्वातील सर्वाधिक बलाढ्य, धनवान या अर्थाने ‘अमेरिका’ असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ऊर्फ ‘बीसीसीआय’ने पहिली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवली. आता जागतिक क्रिकेट खेळण्याचा प्रशस्त मार्ग म्हणून ‘आयपीएल’कडे पाहिले जाते. टी-ट्वेन्टीच्या प्रभावामुळे एकदिवसीय क्रिकेट आणखी वेगवान झाले आणि निकाली निघणाऱ्या कसोटी सामन्यांचीही संख्या वाढली. पण या वेगाच्या नादात चेंडू आणि फळीतला समतोल मात्र हरवला.
क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज मुळातच दुय्यम. नव्या नियमांनी या गोलंदाजांना आणखी जखडून टाकले. म्हणूनच ज्यांच्या स्वत:च्या काळात फलंदाजाला धड हेल्मेटही नव्हते आणि तरी त्यावेळी समोरून येणाऱ्या गोलंदाजांना एका षटकात कितीही ‘बाऊन्सर्स’ टाकण्याची परवानगी असायची; अशा काळात शतकांची माळ लावलेल्या सुनील गावस्कर या महान फलंदाजाला राहवले नाही. ‘टी-ट्वेन्टी’त केविलवाण्या ठरलेल्या गोलंदाजांच्या मदतीला ते धावले. एका षटकात किमान दोन उसळते चेंडू टाकण्याची परवानगी असावी, पहिल्या तीन षटकांत एखादा बळी टिपलेल्या गोलंदाजाला पाचवे षटक टाकू द्यावे, या दोन महत्त्वाच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. कपिल देव, शेन वॉर्न या सार्वकालिक महान गोलंदाजांनीही याचा पुरस्कार केला.
क्रिकेटमधला एकतर्फीपणा घालवायचा तर गोलंदाजांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळायलाच हवी. एकीकडे ‘टी-ट्वेन्टी’ची लोकप्रियता वाढत असतानाच जागतिक क्रिकेटमधल्या गोलंदाजीचा दर्जाही खालावत जातो, हा निव्वळ योगायोग नव्हे. ‘ऑल-टाइम ग्रेट’ म्हणावेत असे चार-दोन गोलंदाजही गेल्या दशकभरात सापडत नाहीत. मार्शल, होल्डिंग, वॉल्श, अ‍ॅम्ब्रोस, लिली, थॉमसन, इम्रान, वकार, अक्रम, कपिल, कुंबळे, मॅकग्रा, वॉर्न, मुरलीधरन, डोनाल्ड, बोथम, अँडरसन या दर्जाची मजा पुन्हा-पुन्हा अनुभवायची असेल तर फलंदाजांइतकीच संधी गोलंदाजांनाही मिळायला हवी. बॅट आणि बॉल यांच्यात संघर्षच रंगणार नसेल तर क्रिकेट ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ची लुटुपुटुची कुस्ती बनून राहील. ‘आयपीएल’च्या निमित्ताने या चर्चेला तोंड तरी फुटले हेही कमी नाही.

टॅग्स :IPL 2020IPL 2020Sunil Gavaskarसुनील गावसकरKapil Devकपिल देव