शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाळा सुरू.. शिक्षण सुरू..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 08:14 IST

School Reopen : ज्याअर्थी राज्यातील ८१ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याला होकार दिला आहे, त्याअर्थी कोविड नियमांचे पालन करून त्या त्या गाव, जिल्ह्यांची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे निर्देश द्यायला आता हरकत नाही.

ठळक मुद्देकोविड नियमांचे पालन करून त्या त्या गाव, जिल्ह्यांची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे निर्देश द्यायला आता हरकत नाही.

ज्याअर्थी राज्यातील ८१ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याला होकार दिला आहे, त्याअर्थी कोविड नियमांचे पालन करून त्या त्या गाव, जिल्ह्यांची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे निर्देश द्यायला आता हरकत नाही. कोरोनाचे संकट टळलेले नाही. अनेकांनी आपल्या जवळची माणसे गमावली आहेत. बाधित कुटुंब म्हणून दु:ख सोसले आहे. परिणामी, अजूनही  १९ टक्के पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवावेसे वाटत नाही, त्यामागे मुलांची काळजी आहे. परंतु, आता कोरोनासोबत जगण्याचे धैर्य समाजाने स्वीकारले पाहिजे. अर्थात, कोणत्याही स्थितीत अनावश्यक जोखीम पत्करायची नाही. मात्र ज्यांच्यापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचू शकले नाही, त्यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय कोलमडले, अनेकांच्या आयुष्यात आर्थिक संकट उभे राहिले. हे सर्व काळानुरूप बदलेल. परंतु, शैक्षणिक नुकसान देशाच्या समग्र विकासाला दीर्घकाळ बाधा निर्माण करणारे ठरू शकते. कोरोनाकाळात ऑनलाइन हाच व्यवहार्य पर्याय होता. शहरी भागातील इंग्रजी शाळा, सेवा सुविधांनी प्रगत असलेल्या मराठी शाळा ऑनलाइन शिक्षणावर भर देऊ शकल्या. जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांनीही प्रामाणिक प्रयत्न केले. पालकांकडे मोबाइल नव्हते. इंटरनेटची सुविधा नव्हती. त्यावेळी शिक्षकांनी अध्ययन मित्र, विषय मित्र असे गट करून जमेल तितके शिक्षण मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. जे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने शिकले, त्यांना लाभही झाला. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या प्रत्यक्ष मदतीची गरज असते, अभ्यासाला बसण्याची सवय लावावी लागते, अशा ५० टक्क्यांहून अधिक मुलांच्या वाट्याला उपेक्षा आली आहे. त्यातच बहुतांश ठिकाणी सुविधांचा अभाव होता. शाळा न पाहताच पहिली आणि दुसरी संपलेले विद्यार्थी आता तिसरीत जाणार आहेत. त्यांना अक्षर ओळख, शब्द ओळख, अंक ओळख कशी करून द्यायची, हा प्रश्न आहे. म्हणूनच कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू करणे हा योग्य मार्ग आहे. 

मध्यंतरी सरकारने जिल्हानिहाय कोरोनास्तर घोषित केले होते. आता गाव आणि तालुका पातळीवर वर्गीकरण करून त्या त्या भागात शाळा सुरू झाली पाहिजे. ग्रामीण भागात ३० विद्यार्थ्यांचे वर्ग आहेत. त्यामुळे संख्या आणि गर्दी हा प्रश्न बहुतांश शाळांना लागू होत नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर लातूर जिल्ह्यातील कांबळेवाडीच्या शाळेत १८ विद्यार्थी आहेत. कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या एकशिक्षकी आणि द्विशिक्षकी हजारो शाळा राज्यात आहेत. तिथे शारीरिक अंतराचा नियम सुलभपणे पाळला जाऊ शकतो. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सव्वापाच लाख पालकांनी शाळा सुरू करण्याची भूमिका नोंदविली आहे. आज शाळा बंद, शिक्षण सुरू म्हणत असलो तरी किती विद्यार्थ्यांपर्यंत कितपत शिक्षण पोहोचले, हा संशोधनाचा आणि चिंतेचा विषय आहे. शाळा सुरू करताना शासन अर्थातच काही निकष लावू शकते. निमशहरी, शहरी भागात विद्यार्थीसंख्या अधिक असणाऱ्या शाळा आहेत. एका वर्गात शंभरावर विद्यार्थी असणारे वर्ग भरतात. तिथे प्रवेशासाठीही गर्दी आहे. अशा शाळांमध्ये सम-विषम तारखांना विद्यार्थी गटाने बोलविता येतील. ५० टक्के उपस्थिती करता येईल. ज्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा पुरेपूर आहेत, जे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने शिकतात त्यांच्यासाठी सध्याची व्यवस्था तितकी अडचणीची नाही.

हे लक्षात घेऊन अध्ययनात मागे पडलेल्या, ऑनलाइन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वर्गात आणण्याची गरज आहे. शाळेत पाठविणे हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून आहे. ज्यांनी परवानगी दिली नाही, ज्यांच्याकडे ऑनलाइन सुविधा उत्तम आहे असे विद्यार्थी बाजूला केले तर ज्यांना आत्यंतिक गरज आहे त्यांना प्रत्यक्ष शिक्षण विनाविलंब उपलब्ध करून देणे शक्य होऊ शकेल.  अन्यथा गळतीचे प्रमाण वाढेल. नेहमीप्रमाणे ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण पुन्हा थांबेल. किंबहुना कोरोनाकाळातील दोन वर्षांत मुलांच्या तुलनेत  मुली उच्चशिक्षण प्रवाहात आल्याच नाहीत हे दिसून येईल. शाळा सुरू करावी की नाही, याबद्दल जसे सर्वेक्षण झाले, तसे किती जणांची शाळा सुटली याचा आढावाही घ्यावा लागेल. 

ऐपतदार कुटुंबांच्याही ऑनलाइन शिक्षणात समस्या आहेत. मोबाइलवरची शाळा कॅमेरा बंद करून मुले घरांत वावरताना दिसतात. आता तिसऱ्या लाटेची चर्चा करताना पुढे काहीसे विपरीत घडले तरी जसा सरसकट लाॅकडाऊन नको, तशा सर्वच शाळाही बंद नकोत. कोरोनासाठी जिल्हास्तर आणि शाळेसाठी गावस्तर निकष ठेवून एकच नारा हवा, शाळा सुरू.. शिक्षण सुरू!

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणStudentविद्यार्थी