शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अग्रलेख : ‘धनुष्यबाणा’चे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 07:21 IST

निवडणूक आयोगापुढे कायदेमंडळ व पक्षसंघटन अशा दोन्ही पातळीवर बलाबलाची तपासणी केल्यानंतरच निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होतो की सुनावणी पूर्ण होईपर्यंत तूर्त धनुष्यबाण चिन्ह गोठविले जाते, यावर मुंबई महापालिकेची सत्ता आणि बरेच काही अवलंबून आहे.

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग व बंधू पशुपती पारस यांनी लोक जनशक्ती पक्षावर मालकी सांगितली तेव्हा वर्षभरापूर्वी, पोटनिवडणुकीआधी निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘बंगला’ हे चिन्ह गोठवून दोघांना अनुक्रमे ‘हेलिकॉप्टर’ व ‘शिलाई मशीन’ ही चिन्हे दिली. २०१७ मध्ये जयललितांच्या निधनानंतर त्यांच्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीवेळी अण्णाद्रमुकचे दोन गट एकमेकांविरूद्ध उभे ठाकले. तेव्हाही अण्णाद्रमुकचे ‘दोन पाने’ हे चिन्ह तात्पुरते गोठवले गेले. भारतीय राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत. काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा प्रवासही याच प्रक्रियेतून झालेला आहे.

बैलजोडी, गायवासरू ते हात असा हा प्रवास होता. या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाचे कोंदण लाभलेल्या घटनापीठाच्या मंगळवारच्या निर्णयानंतर ‘धनुष्यबाण’ या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचे काय होते, ही उत्सुकता सगळ्यांना आहे. हे स्पष्ट आहे, की बंडखोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याचे काय होते, याची भारतीय निवडणूक आयोगाने वाट पाहण्याची गरज नाही.

शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष व मूळ राजकीय पक्ष स्वतंत्र असल्याने मूळ शिवसेना कुणाची व धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यासंदर्भातील फैसला करण्यास आयोगाला काहीच आडकाठी नाही. या निर्णयामुळे गेल्या तीन महिन्यांच्या राजकीय वावटळीची धूळ काहीशी खाली बसली आहे, असे मात्र म्हणता येऊ शकेल. ‘आपलीच शिवसेना खरी’ असल्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यावर आता आयोगापुढे सुनावणी सुरू होईल. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निकाल हा शिंदे गटाला दिलासा मानला गेला. खरेतर निकालाचा तसा अर्थ होत नाही. कदाचित, शिंदे गट भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सत्तेवर आहे आणि भाजप केंद्रात सत्तेवर आहे, हे तसे मानण्याचे कारण असावे.

निवडणूक आयोगापुढे हा संघर्ष बराच काळ चालेल. १९६८ च्या निवडणूक चिन्हविषयक कायद्यानुसार चालणारी ही प्रक्रिया किचकट व वेळकाढूदेखील आहे. पक्षाची घटना व रचना, पदाधिकारी, प्रतिनिधी व सदस्य यांचे संख्याबळ, कायदेमंडळातील प्रतिनिधी व पक्षसंघटनेतील संख्याबळ या पातळ्यांवर बहुमताची पडताळणी होईल. ज्या गटाचे बहुमत असेल त्याला ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळेल. दोन्ही गट तुल्यबळ असतील, तर मात्र चिन्ह गोठवले जाईल आणि दोघांनाही नव्या पक्षाची नोंदणी करावी लागेल, असे या लढाईचे स्वरूप असेल. यापैकी विधानसभा व लोकसभा सदस्यांच्या संख्येबाबत शिंदे गटाचे पारडे जड आहे. शिवसेना पक्षाची घटना व पदाधिकारी, क्रियाशील व प्राथमिक सदस्य यासंदर्भात अजून चित्र स्पष्ट व्हायचे आहे. असे म्हणता येईल, की सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारच्या निर्णयामुळे शिवसेनेतील सत्तासंघर्ष महत्त्वाच्या टप्प्यावर पोहाेचला आहे. गेल्या २१ जूनपासून रोज राजकारणाला उकळ्या फुटताहेत.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा व महाविकास आघाडी सरकारचे पतन हा त्याचा उत्कलन बिंदू होता. त्या बिंदूवर शिवसेनेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. विधानसभा व लोकसभेच्या बहुसंख्य सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. दोन्ही काँग्रेसऐवजी भारतीय जनता पक्षासोबत सत्ता हेच खरे हिंदुत्व आणि तीच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट पक्ष वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. अगदी सुरूवातीला सुरतला गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी सर्वोच्च न्यायालयाला साकडे घालण्यात आले आहे. ती याचिका थेट दिवाळीनंतर सुनावणीला येणार आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांची निवडणूक तोंडावर आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावण्याचा शिंदे गट व भाजपचा प्रयत्न राहील व त्यासाठी धनुष्यबाण हे चिन्ह महत्त्वाचे आहे. खरा प्रश्न आहे, राजकारणाच्या उत्कलन बिंदूप्रमाणे धनुष्यबाण चिन्हाचा गोठनबिंदू जवळ आला आहे का? निवडणूक आयोगापुढे कायदेमंडळ व पक्षसंघटन अशा दोन्ही पातळीवर बलाबलाची तपासणी केल्यानंतरच निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होतो की सुनावणी पूर्ण होईपर्यंत तूर्त धनुष्यबाण चिन्ह गोठविले जाते, यावर मुंबई महापालिकेची सत्ता आणि बरेच काही अवलंबून आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय