शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अग्रलेख : जयपूरची ‘कच्छी घोडी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 10:06 IST

काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यानंतरही राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आपणच राहू, असा हट्ट धरलेले अशोक गेहलोत यांच्यासाठी त्यांच्या आमदारांनी रविवारी जे काही केले, ते पाहून या नृत्याची आठवण यावी.

रणांगणातील मर्दुमकीचे, शौर्याचे प्रतीक मानले जाणारे ‘कच्छी घोडी’ नावाचे एक लोकनृत्य राजस्थानात अत्यंत लोकप्रिय आहे. त्यात केवळ पुरुष नर्तक असतात. धोती, कुर्ता, पगडी घातलेल्या पुरुषांची सोंगे नकली घोड्यांवर स्वार असतात आणि बासरी व ढोलकच्या तालावर तलवारी परजत लुटुपुटुची लढाई लढतात. लग्नात वरपक्षाच्या स्वागतासाठी ही सोंगे आणली जातात. काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यानंतरही राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आपणच राहू, असा हट्ट धरलेले अशोक गेहलोत यांच्यासाठी त्यांच्या आमदारांनी रविवारी जे काही केले, ते पाहून या नृत्याची आठवण यावी. त्या नृत्याचा आणि सध्या राजस्थानात होत असलेल्या राजकीय घडामोडींत फरक इतकाच, की गेहलोत समर्थकांनी पक्षाविरुद्धच तलवारी परजल्या आहेत. ही लढाई लुटुपुटुची अजिबात नाही. काँग्रेस पक्ष कधी नव्हे इतका दुबळा झाला असल्याने पक्षशिस्तीला वाकुल्या दाखविण्याची हिंमत आमदारांमध्ये आली आहे. पक्ष बलवान होता तेव्हा ‘विधिमंडळ नेता निवडण्याचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना देण्या’चा एका ओळीचा ठराव घेतला जायचा.

आता त्या परंपरेला तिलांजली देणारे बंड आमदारांनी पुकारले आहे. विधानसभाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे सामूहिक राजीनामे देऊन आमदार गायब झाले. दिल्लीवरून धावतपळत जयपूरला पोहोचलेले अजय माकन व मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्याचेही सौजन्य त्यांनी दाखविले नाही. काँग्रेससाठी हा खरोखर गंभीर पेच आहे. काल-परवापर्यंत काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद तसेच त्या अनुषंगाने राजस्थानची राजकीय परिस्थिती फारशी गुंतागुंतीची नव्हती. राज्या-राज्यांमधील पक्ष संघटनेने राहुल गांधी यांना अध्यक्षपद देण्याचे ठराव घेतले असले तरी ते त्यासाठी तयार नाहीत.

वय आणि प्रकृती या कारणांनी सोनिया गांधी यांना अगदी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारीदेखील अधिक काळ सांभाळणे शक्य नाही. अर्थात, गांधी परिवारातील कुणीही यावेळी अध्यक्षपद स्वीकारणार नाही. अशावेळी आपण किंवा आपला परिवार कोण्याही एका व्यक्तीला समर्थन देणार नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केल्यानंतरही असे दिसत होते, की शशी थरूर किंवा इतरांऐवजी अशोक गेहलोत यांना अध्यक्षपद दिले जाईल. ‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वानुसार राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी नव्या नेत्याची निवड होईल. त्यासाठी प्रियांका व राहुल गांधी यांची  सचिन पायलट यांना पसंती असेल. तथापि, ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान गेहलोत व पायलट यांनी राहुल गांधी यांची वेगवेगळी भेट घेतली. तेव्हा, जयपूरच्या सत्तेवरून वादाची चिन्हे दिसू लागली.

गेहलोत यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी पूर्ण वेळ द्यावा, अशी गांधी परिवाराची अपेक्षा आहे. गेहलोत यांना मात्र अध्यक्षपदासोबतच राजस्थानची सत्ता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या स्वत:कडेच ठेवायची आहे. एकतर ‘एक व्यक्ती, एक पद’ सूत्र आपल्याला लागू करू नये आणि लागू झालेच तर नवा मुख्यमंत्री आपल्या मर्जीतला असावा, असा त्यांचा आग्रह आहे आणि त्यासोबत असेही स्पष्ट दिसते की दोन वर्षांपूर्वी सचिन पायलट यांनी केलेल्या बंडामुळे दुखावलेले अशोक गेहलोत, त्यांचे पाठीराखे आमदार त्यासाठी पायलट यांना माफ करायला अजिबात तयार नाहीत.

पायलट यांच्याकडे बंड यशस्वी करण्याइतके आमदार नाहीत हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. आताही त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या डझनभराच्या पलीकडे नाही. म्हणूनच गेहलोत समर्थकांनी पक्षाला वेठीस धरले आहे; पण त्यातून अशोक गेहलोत यांच्याबद्दल चांगला संदेश गेलेला नाही. पक्षहितापेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा मोठ्या समजणाऱ्या व्यक्तीकडे अध्यक्षपद नको, असा आग्रह सोनिया गांधी यांच्याकडे धरला जात आहे. कमलनाथ व इतर ज्येष्ठ नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

दिल्लीत पक्ष दुबळा असला की राज्यातील नेते वरचढ ठरतात, हा अनुभव पुन्हा येत आहे. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा यांच्यारूपाने अशीच स्थिती निर्माण झाली, तेव्हा भाजपच्या बलवान राष्ट्रीय नेतृत्वाने ती कशी हाताळली याची आठवण फार जुनी नाही. भाजपइतके काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व मजबूत नाही. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी प्रादेशिक नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर जयपूरमधील घटनाक्रम ही गेहलोत यांच्यासाठी हाराकिरी ठरू शकेल. काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना कदाचित दिले जाणार नाही आणि तसे झाले तर ते पक्षात राहतील का आणि राहिले तरी निष्ठावंत असतील का, ही उत्सुकता देशभर आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थान