शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख : तरंगती खरीप पिके !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 10:54 IST

महाराष्ट्रातील खरीप हंगामातील सर्व प्रकारच्या पिकांचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. सरासरी दहा ते वीस टक्के उत्पादनही हाती लागण्याची शक्यता नाही.

महाराष्ट्रातील खरीप हंगामातील सर्व प्रकारच्या पिकांचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. सरासरी दहा ते वीस टक्के उत्पादनही हाती लागण्याची शक्यता नाही. काढणी आणि मळणीला आलेली पिके परतीच्या जोरदार पावसाने पाण्यात तरंगू लागली आहेत.  संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांत असलेल्या शेतावरील किती हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे याचा अंदाज बांधणे कठीण आहे. उसाचे क्षेत्रवगळता १४६ लाख हेक्टरातील भात, मका, नाचणी, कापूस, तूर, इतर कडधान्ये, बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, भाजीपाला, फळबागा पिके उद्ध्वस्त झाली आहेत. परतीच्या पावसाआधी ३५ लाख २१ हजार हेक्टरवरील पिकांचे पूर्ण नुकसान झाल्याचे पंचनामे सांगतात. परतीच्या पावसाने दीड लाख हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबरअखेर मान्सूनच्या पावसाने अनेक ठिकाणी अतिवृष्टी केली. महापूर आले. शेतात पाणी उभे राहिले. विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात अतिवृष्टीने खूप नुकसान केले.

कृषी विभागाने पंचनामे करून सुमारे चार हजार ६३४ कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी मागणी केली आहे. या नुकसानभरपाईचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज अजून आलेला नाही. कापूस काळा पडला आहे. सोयाबीन कुजू लागले आहे. मका, तूर आदी पिकांची हीच अवस्था आहे. काढलेला शेतमाल वाळविण्यासाठी जागा उपलब्ध नाही. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात खरीप हंगामाचे इतके प्रचंड नुकसान झाले नव्हते. दोन वर्षांच्या कोरोना काळातील बंधनामुळे व्यवहार मर्यादित होत होते. पाऊस वेळेवर सुरू झाल्याने पेरण्या वेळेवर झाल्या. खरीप उत्तम येणार असा अंदाज होता. परतीच्या पावसाने घात केला. राज्य सरकारने या सर्व घटनाक्रमाकडे अधिक संवेनदशीलपणे पाहिले पाहिजे.

अद्याप अतिवृष्टीची नुकसानभरपाई दिलेली नाही. परतीच्या पावसाचं पंचनामे कधी होणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?  हा यक्षप्रश्न आहे. दरम्यान, रब्बीच्या हंगामाची पेरणी दिवाळीनंतर सुरू करावी लागणार आहे. खरिपाची पिके न काढताच शेतीत नांगर चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता दिसते. ऑक्टोबरच्या प्रारंभापासून परतीचा पाऊस पडतो आहे. शेवटचा आठवडा आला तरी तो थांबण्याचे नाव घेत नाही. पश्चिम विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुलनेने अधिक दिवस परतीचा पाऊस कोसळतो आहे. उसाचे उत्पादन घटेल, असा अंदाज आहे. कारण उसाच्या अंतिम वाढीसाठी थोडा कडक उन्हाचा हंगाम लागतो. सतत शेतात पाणी राहिल्याने उसाच्या मुळ्या कुजण्याची वेळ आली आहे. तरी पूर्णत: नुकसान होणार नाही. एवढा ऊसशेतीचा  फायदा आहे.

संपूर्ण खरीप हंगाम हातचा जाण्याची वेळ आली आहे. थंडी चांगली पडली तर रब्बी हंगामाची पिके चांगली येतील. शिवाय भूजल पातळी वाढल्याने रब्बीला विहीर बागायतीचा लाभ होणार आहे. एवढाच या परतीच्या पावसाचा लाभ आहे. राज्य सरकारने आता तातडीने हालचाली करून दिवाळी पहाट साजरी करीत बसण्याऐवजी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. केंद्र सरकारलाही जागे केले पाहिजे. केंद्राचे लक्ष केवळ गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील होणाऱ्या निवडणुकांकडेच आहे. राज्य सरकारने केंद्राचे लक्ष वेधून पाहणी करण्यासाठी पथक पाठविण्याची विनंती करायला हवी. महाराष्ट्राची साखर, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या उताऱ्याचा आयात-निर्यातीवर परिणाम होतो. गत दोन वर्षात निर्यातीपेक्षा शेतमालाची आयात अधिक करावी लागली आहे. त्यामुळे केंद्राने विविध प्रांतात होणाऱ्या शेतातील स्थित्यंतराकडे लक्ष दिले पाहिजे. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे पीक आहे. गेल्यावर्षी उत्पादन घटल्याने दर वाढला होता.

चीनकडून आयात करण्याची वेळ आली होती. एकीकडे शेतकऱ्यांना व्यक्तिगत मदत करून उभे केले पाहिजे. दुसरीकडे राज्याचे आर्थिक गणित सांभाळण्यासाठी शेतमालाचे उत्पादन घटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अद्याप पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत असेच सांगत आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन महिना झाला तरी भरपाई शेतकऱ्यांच्या हाती पडलेली नाही. परतीचा पाऊस थांबत नाही तो शेतातील पिकांना तरंगत ठेवण्यात आनंद मानत आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी मंत्री हालायला तयार नाहीत. अशाने तरंगत्या खरिपाची नुकसानभरपाई होणार कशी?

टॅग्स :Farmerशेतकरी