शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
2
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
3
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
4
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
5
शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
6
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
7
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
8
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
9
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
10
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
11
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
12
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
13
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
14
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
15
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
16
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
17
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
18
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
19
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
20
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले

स्वतंत्र, खुल्या इंटरनेटवरचे हल्ले आणि सुंदर पिचई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 8:35 AM

बड्या इंटरनेट कंपन्यांना दमात घेण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरू असताना गुगलच्या प्रमुखांना वाटणारी चिंता योग्यच असली, तरी पुरेशी नाही!

ठळक मुद्देबड्या इंटरनेट कंपन्यांना दमात घेण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरू असताना गुगलच्या प्रमुखांना वाटणारी चिंता योग्यच असली, तरी पुरेशी नाही!

प्रा. डॉ. विश्राम ढोले, समाजमाध्यमांचे अभ्यासक

गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचई यांची अलीकडची मुलाखत अनेक अर्थाने महत्त्वाची आहे.  मुलाखतीचे खरे महत्त्व पिचई यांनी मांडलेल्या दोन मुद्द्यांशी संबंधित आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वाण्टम संगणक या दोन तंत्रज्ञान शाखांचा. पिचईंच्या मते विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान अख्ख्या मानवी इतिहासासाठी निर्णायक ठरेल. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर आग, वीज आणि इंटरनेट हे तंत्रज्ञान प्रकार जेवढे निर्णायक ठरले त्यासारखेच हे. पण कदाचित त्याहीपेक्षा जास्त निर्णायक. कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व तसे बऱ्यापैकी माहीत असले तरी जगातील बलाढ्य तंत्रज्ञान कंपनीच्या प्रमुखाने त्यावर अशा शब्दात मोहर उमटविणे याला वजन आहे. पिचईंनी मांडलेला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो इंटरनेटवरील स्वातंत्र्याचा. 

चीनसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनचा थेट उल्लेख टाळून त्यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले, स्वतंत्र आणि खुल्या इंटरनेटवर हल्ले सुरू आहेत. अनेक देशांमध्ये माहितीच्या मुक्त प्रवाहावर बंधने आणली जात आहेत. इंटरनेटचे भवितव्य कोणा एका व्यक्तीच्या हाती जाण्यापेक्षा एका व्यापक विचारगटाकडून त्याची आखणी केली जावी.

बड्या इंटरनेट कंपन्यांना दमात घेण्याचे (शिस्त लावण्याचे) प्रयत्न भारतातही सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेकजण पिचईंच्या या विधानाचा वेगळा अर्थ काढत आहेत. प्रत्यक्षात पिचईंना तसे काही सुचवायचे होते का, हे कळायला मार्ग नाही; पण पिचईंचे निरीक्षण सार्वत्रिक आहे. इंटरनेटवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न जगभरात विविध देशांमध्ये होत आहेत. अगदी अमेरिकेतसुद्धा. इंटरनेट कंपन्यांचे प्रतिनिधी असलेले पिचई त्याला स्वतंत्र आणि खुल्या इंटरनेटवरील हल्ले म्हणतात. 

विविध देशांमधील शासनकर्त्यांना विचाराल तर ते कदाचित त्याला नियमन म्हणतील. हा फक्त शब्दांचा खेळ नाही. खोलवरच्या भूमिकांमधील फरक आहे हा. इंटरनेट आणि शासन या दोन बलाढ्य व्यवस्थांमधील हा संघर्ष आहे. इंटरनेटची व्याप्ती, परिणामकारकता आणि जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श करण्याची क्षमता मर्यादित होती तोपर्यंत हा संघर्षही फार तीव्र झाला नव्हता. पण आता तसे अनुभव येत चालले आहेत आणि भविष्यात तर ते वारंवार येतील, अशी स्थिती आहे. कारण या दोन व्यवस्थांची मूळ प्रकृती एकमेकांशी जुळणारी नाही. राष्ट्र चालवू बघणारी शासनव्यवस्था परंपरेने अधिकाराची उतरंड मानणारी, सार्वजनिक हिताची जबाबदारी आणि अधिकार स्वतःकडे घेऊ पाहणारी, जागतिकतेपेक्षा प्रादेशिकतेला महत्त्व देणारी, गोपनीयतेचा-सुरक्षेचा आग्रह धरणारी अशी असते. तर इंटरनेटची व्यवस्था ही उतरंड कमी करणारी, खुलेपणाचा आग्रह धरणारी, (प्रसंगी वाट्टेल ती) मोकळीक देणारी, सार्वजनिक हित हे सामूहिक शहाणपणातून साधले जाईल असे मानणारी, जागतिक राहू इच्छिणारी व्यवस्था आहे. आता मुळातच प्रमाणभूत मानली जाणारी मूल्ये इतकी भिन्न- प्रसंगी विरोधी- असल्याने हा संघर्ष अटळ आहे. पण इंटरनेटच्या खुलेपणा व स्वातंत्र्याला धोका फक्त शासनव्यवस्थेकडूनच आहे का? मुळात हे लक्षात घेतले पाहिजे की इंटरनेटचे स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंटरनेट कंपन्यांचे स्वातंत्र्य नाही. 

लोकांचे जगणे, विचार आणि कृती यावर प्रभाव टाकण्याची क्षमता ही खरी राजकीय शक्ती. सरकार आणि शासनव्यवस्था यांच्याकडे ती असते. पण आज या बड्या इंटरनेट कंपन्यांकडे ही राजकीय शक्ती वेगाने येत चालली आहे. आज तुमच्या-माझ्यासारख्या मध्यवर्गीय व्यक्तीला शासनव्यवस्था जेवढे ओळखत नाही, जेवढे निरखत नाही तेवढे एकटी गुगल कंपनी आपल्याला ओळखते, निरखते. त्या अर्थाने गुगल आणि तिच्यासारख्या बलाढ्य इंटरनेट कंपन्या एका राष्ट्राइतक्याच शक्तिशाली आणि त्यांचे प्रमुख एखाद्या राष्ट्रप्रमुखाइतकेच प्रभावी मानले पाहिजेत. 

इंटरनेट कंपन्यांकडे येणारा डेटा, त्यावर बसविले जाणारे अल्गोरिदम, गोपनीयता आणि गुंतागुंत, कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान आदी गोष्टी लक्षात घेतल्या तर या आभासी राष्ट्रांची आणि त्यांच्या प्रत्यक्षातील प्रमुखांची आपल्या जगण्यावरची प्रभावक्षमता किती प्रचंड आहे आणि असेल याची कल्पना करता येऊ शकते. म्हणूनच इंटरनेटच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्यांबाबत पिचईंची चिंता रास्तच आहे; पण ती पुरेशी नाही. इंटरनेट चालविणाऱ्या बलाढ्य कंपन्यांच्या भूमिकांचीही चिकित्सा केली तरच खऱ्या अर्थाने इंटरनेटच्या स्वातंत्र्याचा विचार पूर्ण होईल.vishramdhole@gmail.com

 

टॅग्स :googleगुगलSundar Pichaiसुंदर पिचईInternetइंटरनेटcyber crimeसायबर क्राइम