शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय : शेवटच्या शांत श्वासासाठी...; दयामरण - कायदा, धर्म आणि मानवतेचा संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 08:38 IST

आयुष्यभरासाठी केवळ यातना वाट्याला आलेल्या, फक्त आणि फक्त मृत्यू अपरिहार्य असलेल्या व्यक्तीला शांतपणे अखेरचा श्वास घेऊ देण्याची ही पहिली परवानगी.

गेली १३ वर्षे गाढ बेशुद्धीत असलेल्या हरीश राणा नावाच्या ३२ वर्षीय तरुणाचा नैसर्गिक मृत्यूचा, दयामरणाचा मार्ग मोकळा करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकूणच नीतितत्त्वे, संस्कृतीमूल्ये, धर्माची शिकवण, राज्यघटना, कायदेकानू या सगळ्या जंजाळात मानवतेचा कंगोरा अधोरेखित करणारा आहे. भारतीय न्यायव्यवस्थेतील अशा प्रकारचा हा पहिला निवाडा. आयुष्यभरासाठी केवळ यातना वाट्याला आलेल्या, फक्त आणि फक्त मृत्यू अपरिहार्य असलेल्या व्यक्तीला शांतपणे अखेरचा श्वास घेऊ देण्याची ही पहिली परवानगी. 

गाझियाबादचा हरीश चंडीगडच्या पंजाब विद्यापीठात शिकत होता. अपघाताने तो इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरून पडला. डोक्याला जबर दुखापत झाली. कोमामध्ये गेला. निर्मला व अशोक राणा या मातापित्यांनी मुलासाठी सारे काही केले. डाॅक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली; पण काही उपयोग झाला नाही. तेरा वर्षे तो नावालाच जिवंत हाेता. एका नलिकेद्वारे अन्नपाणी देऊन त्याची चयापचय प्रक्रिया सुरू होती. वैद्यक भाषेत यास ‘क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन ॲण्ड हायड्रेशन’ म्हणतात. पण, तेवढ्याने तो कधीच उभा राहणार नाही, हिंडू-फिरू शकणार नाही, याची पूर्णत: जाणीव झाल्यानंतर मातापित्यांनी त्याच्यासाठी दयामरण मागितले. 

मध्यंतरी, २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दुर्मीळ प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला असा नैसर्गिक मृत्यू तत्त्वत: मान्य केला होता. तीन वर्षांपूर्वी परवानगीची नेमकी प्रक्रिया निश्चित झाली. हा विषयच मुळात वैद्यकशास्त्राशी निगडित असल्याने मेडिकल बोर्डाने ‘पॅसिव्ह युथनेशिया’ म्हणजे दयामरण मान्य केले की, न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी ही प्रक्रिया आहे. हरीश राणा प्रकरणात दोन मेडिकल बोर्डांनी हाच अंतिम पर्याय असल्याचे म्हटले आणि न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांनी तो मान्य केला. सोबतच केंद्र सरकारने यासंबंधी योग्य तो कायदा करावा, अशी सूचनाही केली. 

हरीश राणा आता शांतपणे अखेरचा श्वास घेईल, तेव्हा भविष्यातील अशा प्रकरणांसाठी दयामरणाला कायद्याची चाैकट गरजेची आहेच. कारण आपली सामाजिक व्यवस्था, धर्माचरणाच्या मुळाशी अहिंसातत्त्व आहे. मग परजीवाशी संबंधित असो, की स्वत:शी. अहिंसेच्या तत्त्वाला नीतिमत्तेचे वेष्टण आहे. मोक्ष मिळविण्यासाठी, नश्वर मानवी देह, इहलोक त्यागून परलोकात जाण्यासाठी काही धर्मांत परवानगी आहे. समाधी, सल्लेखना किंवा संथारा या मार्गाने देहाचा त्याग धर्ममान्य आहे. देश मात्र राज्यघटनेनुसार चालतो. राज्यघटनेचे २१वे कलम प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार देते. भलेही काहीवेळा मृत्यू हा त्या सन्मानाचा घटक असला तरी कायदा कोणाला जीव देण्याचा किंवा घेण्याचा अधिकार देत नाही. म्हणूनच हत्या हा अपराध आहे आणि आत्महत्या किंवा आत्महत्येला प्रवृत्त करणे हादेखील अपराधच आहे. 

अशावेळी प्रचंड वेदना, यातना, जिवाची घालमेल या अवस्थांचे अनंत असे दुष्टचक्र वाट्याला आलेला हा हरीश किंवा पंधरा वर्षांपूर्वी अशीच दयामरणाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेली अरुणा शानबाग असो, की अन्य कोणी, या दुर्दैवी जिवांचे काय? मानवतेने कायद्याला विचारलेला हा जटिल प्रश्न आहे. हा प्रश्न तमाम मानवजातीचा आहे आणि त्याला उत्तर म्हणून अनेक देशांत दयामरणाला मान्यता आहे. हरीश व अरुणाचे प्रकरण वेगळे होते व आहे. अरुणाच्या वाट्याला हरीशसारखा अपघात आला नव्हता. मुंबईच्या केईएम इस्पितळात परिचारिका असलेली अरुणा तिथल्याच सोहनलाल वाल्मीकीच्या वासनेची शिकार होती. त्यावेळच्या झटापटीत अरुणाचे आयुष्य थांबले. तब्बल बेचाळीस वर्षे तिने नरकयातना भोगल्या. लैंगिक अत्याचाराविरोधातील संघर्षाचे प्रतीक बनलेल्या अरुणाची तिच्या सहकारी परिचारिकांनी अव्याहत शुश्रूषा केली. 

अरुणाच्या त्या सहकाऱ्यांनी दयामरणाच्या अर्जाला विरोध केला. हरीशच्या मदतीला आलेला मेडिकल बोर्डाचा नियम तेव्हा नव्हता. २०११ मध्ये न्यायालयाने जगण्याने छळलेल्या अरुणाची मरणाच्या रूपातील सुटका नाकारली. चार वर्षांनंतर अरुणा या जगातून गेली. हरीशवर इतक्या प्रतीक्षेची वेळ आली नाही म्हणून साऱ्या संवेदनशील माणसांनी न्यायदेवतेचे आभार मानले पाहिजेत. सोबतच यासंदर्भातील नव्या कायद्याचीही प्रतीक्षा करूया. वैद्यकशास्त्र दररोज प्रगतीचे नवे अवकाश कवेत घेतेय. नवनवे तंत्रज्ञान असाध्याला साध्य बनवतेय. अशावेळी एखाद्यासाठी मृत्यू हाच अंतिम पर्याय निश्चित करण्याचा कालावधी किती आणि प्रयत्न किती हवेत, याचा सांगोपांग विचार करून हा नवा कायदा अरुणा, हरीश यांसारख्या अनेकांची जगण्याची नव्हे तर मृत्यूची धडपड योग्यवेळी थांबवील, अशी आशा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Euthanasia: A confluence of law, religion, and humanity for final peace.

Web Summary : Supreme Court allows passive euthanasia for Harish Rana, a comatose man. This landmark ruling balances ethics, religion, and human rights, prompting calls for euthanasia legislation. The case highlights the complex intersection of law, morality, and mercy.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय