शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

चिराग यांची वाकडी चाल; नितीश यांना कमजोर करण्यासाठी भाजपचा डाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:45 IST

बिहारमध्ये राजद, काँग्रेस यांची स्थिती फार चांगली नसताना भाजप नेते मात्र स्वत:चे स्थान मजबूत करण्यासाठी चिराग यांच्यामार्फत नितीश यांना संपवू पाहत आहेत. त्यामुळे नितीश कुमार काय चाल खेळतात, हे पाहायला हवे.

एकेकाळी स्वत:ला कट्टर समाजवादी म्हणवून घेणारे राम विलास पासवान हे कायमच काँग्रेस आणि भाजप यांचे वर्णन नागनाथ आणि सापनाथ असे करीत. हे पक्ष लोकविरोधी आहेत आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपला विरोध आहे, असे बोलून दाखवत. प्रत्यक्षात मात्र डॉ. मनमोहन सिंग, इंदरकुमार गुजराल, देवेगौडा, वाजपेयी अशा सर्वांच्या मंत्रिमंडळात ते होते. केवळ स्वार्थ हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला, त्यामुळेच ते रामदास आठवले यांच्याप्रमाणे कुठेही उड्या मारणारे राष्ट्रीय नेते बनले. ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आहेतच. ते सध्या आजारी असून, त्यांचे हेच स्वार्थी राजकारण पुढे नेण्याचे काम त्यांचे पुत्र खा. चिराग पासवान सध्या वेगाने करीत आहेत.

बिहारमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकांत त्यांच्या पक्षाचे दोन जणच निवडून आले. तरीही त्यांनी यावेळी एकूण २४३ पैकी १४३ जागा लोक जनशक्ती पार्टी म्हणजेच लोजपाला मिळाव्यात, अशी मागणी केली. ती मान्य होणे शक्यच नव्हते. त्यांनाही ते माहीत होते. पण रालोआमध्ये राहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे राजकारण संपविण्याची सुपारी त्यांनी घेतली असून, भाजप त्यांना चाप लावते का, हे पाहायला हवे. भाजप आणि जदयू एकत्र असताना त्यातील केवळ जदयूविरोधात आपण सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. नितीश आणि भाजप एकत्र, राम विलास पासवान भाजप सरकारमध्ये आणि त्यांचे पुत्रच बिहारमध्ये नितीश यांचे राजकारण संपवू पाहत आहेत, हे विचित्र आहे.
भाजप नेते आतापर्यंत त्याविषयी काहीच बोलायला तयार नव्हते. नितीश यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढविणार असल्याचे भाजपने घोषित केले आहे. त्यामुळे त्यात अडथळे आणणाऱ्या पासवान यांना भाजपने दूर करायला हवे. जदयू व नितीश यांच्याविरोधात भूमिका म्हणजे रालोआलाच विरोध. त्यामुळे पासवान आणि त्यांच्या पक्षाला भाजप नेत्यांनी ताबडतोब रालोआतून आणि पासवान यांना सरकारमधून बाहेर काढायला हवे. तसे न केल्यास भाजपच्या सांगण्यावरूनच चिराग पासवान ही वाकडी चाल खेळत असल्याची शंका खरी ठरेल. चिराग पासवान यांच्या पक्षाने आणि उमेदवारांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागू नयेत, असे भाजपने बजावले आहे.
भाजपला खरेच नितीश यांचे नेतृत्व मान्य असेल तर पासवान यांना असले भलते उद्योग बंद करा वा केंद्र सरकारमधून बाहेर पडा, असे स्पष्टपणे सांगावे लागेल. पण चिराग यांच्या राजकारणात भाजप नेते स्वार्थ पाहणार असतील तर ते तोंडघशी पडतील. नितीश हेही मग गप्प न राहता, भाजपची अडचण करतील. त्यात तेही वाकबगार आहेत. बिहारमध्ये नितीशना कमजोर केल्याचे श्रेय मिळेल, असे चिराग यांना वाटते, पण दोन चार जागाच पुन्हा मिळाल्यास लोजपाही फुटेल. भाजपचे काहीच बिघडणार नाही आणि नितीश यांचे अधिक आमदार आलेच तर भाजप दुय्यम स्थान घ्यायला तयार आहेच. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि नितीश यांनी दुय्यम स्थान मान्य केले नाही तर महाराष्ट्राप्रमाणेच तिथेही राजद नेत्यांना फोडून सरकार बनविण्याचा खेळ भाजप नेते नक्कीच खेळू शकतील.
नितीश कुमारही सत्तेसाठी राजद व काँग्रेस यांच्या महाआघाडीशी जवळीक करू शकतील. या सर्वात वाकडी वा तिरपी चाल खेळणाऱ्या चिराग पासवान यांच्या हाती फारसे काही लागणार नाही. चिराग यांच्यामुळे आपला फायदा होईल, याची खात्री भाजपलाही दिसत नाही. तरीही काही भाजप नेते पाहुण्याच्या काठीने जनावर मारण्याचे प्रयत्न करीत आहेत. नितीश यांची लोकप्रियता गेल्या पाच वर्षात कमी झाली आहे, त्याचा फायदा उठविण्याचा चिराग यांचा प्रयत्न आहे. पण नाराज असलेले लोक अजूनही मुख्यमंत्री या पदासाठी नितीश यांनाच पसंती देत आहेत. त्यांच्या खालोखाल लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी लोकप्रिय आहेत. त्यामुळे सत्तासोपान गाठण्यासाठी भाजपला चिराग नव्हे, तर नितीशच महत्त्वाचे आहेत. उंटाप्रमाणे तिरप्या खेळीने पुढे जाणाऱ्या चिराग पासवान यांना भाजपने आताच अडवले नाही, तर सारा खेळच उलटून जाईल. तुमच्या पक्षावर केंद्रातील सरकार अवलंबून नाही, याची जाणीव या छोट्या पासवान यांना भाजपने करून द्यायलाच हवी.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेस