शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निष्पक्ष न्यायाचा हक्क शाबूत कसा राहील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 07:19 IST

कोणाहीबद्दल भय वा विशेष प्रीती न बाळगता, आपले मत व्यक्त करण्याची क्षमता न्यायाधीशांपाशी असणे हाच लोकशाहीमधल्या न्यायव्यवस्थेचा गाभा आहे.

कपिल सिब्बल, राज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ

कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश हा संपूर्ण न्यायव्यवस्थेचा कणा असतो. आपल्या न्यायव्यवस्थेची पायाभूत रचना अनेक वर्षे हळूहळू विकसित होत आलेली आहे. ब्रिटिश राजवटीत तिची स्थापना झाली १९३० साली आलेल्या सायमन कमिशनने. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरेल अशा स्वतंत्र, सक्षम आणि निष्पक्षपाती न्यायव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले १९३३-३४ साली भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक संयुक्त समितीने. भारत सरकार अधिनियम, १९३५ साठी एक पार्श्वभूमी तयार केली. त्यात म्हटले होते की, केंद्रीय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका ब्रिटिश राजाकडून होत असल्याने त्या यंत्रणेचे स्वातंत्र्य अबाधित आहे (मला याबाबत शंका वाटते.). परंतु निम्न न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका भारतीय अधिकाऱ्यांकडूनच होणे क्रमप्राप्त आहे. अर्थात त्यांच्या नेमणुका, बढत्या आणि बदल्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारित असल्यामुळे अशा न्यायाधीशांवर काही प्रमाणात नियंत्रण राहतेच.

  समितीने पुढे म्हटले की, न्यायाधीशांच्या बढत्या मंत्र्यांच्या हाती असल्या की न्यायव्यवस्थेवर सरकारचा दबाव असतो. त्यामुळे न्यायाधीशांचे स्वातंत्र्य धोक्यात येते. नव्वद वर्षापूर्वी व्यक्त केलेली ही भावना आजही प्रसंगोचित वाटते. आता सरकार या नेमणुका करत नाही. त्या त्या राज्यातील उच्च न्यायालयाच्या हाती कनिष्ठ न्यायालयांचे दोर असतात. १९३५ च्या कायद्यानुसार कनिष्ठ न्यायालयातील नेमणुका प्रांतांच्या गव्हर्नरांनी, उच्च न्यायालयाचा सल्ला घेऊन करावयाच्या होत्या.परिणामतः जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका आणि बदल्या यासंबंधीची सर्व सत्ता पूर्वीप्रमाणे गव्हर्नरांच्याच हाती राहिली होती. शेवटी १९४८ साली झालेल्या केंद्रीय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या परिषदेत, ही सत्ता पूर्णतः उच्च न्यायालयाच्या हाती सोपवण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली.

राज्यघटनेतील २३५ व्या कलमानुसार, कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका, सेवाशर्ती, बढत्या आणि बदल्या याबाबत प्रत्येक उच्च न्यायालयाचे स्वतःचे वेगळे नियम आहेत. तरीही आपल्या कारकिर्दीवर परिणाम होण्याच्या धास्तीने, कनिष्ठ न्यायालये आपले न्यायालयीन अधिकार वापरताना कचरतात, असेच सर्वसामान्य माणसाला वाटते. सगळ्याच कनिष्ठ न्यायाधीशांना आपली उच्च न्यायालयात नेमणूक व्हावी, असे तर वाटतच असते. उच्च न्यायालयातील ६५% न्यायाधीश, ज्येष्ठतेनुसार बढती देत, जिल्हा न्यायाधीशांमधूनच नेमले जात असतात. १०% खात्यांतर्गत परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार नेमले जातात आणि उरलेले २५% वकिली करणाऱ्यांतून नेमले जातात. न्यायव्यवस्थेतील कनिष्ठ स्तरावरील सदस्यांवर उच्च न्यायालयाचे प्रशासकीय नियंत्रण असते. याचा प्रभाव त्यांच्या निर्णयस्वातंत्र्यावर नक्कीच पडतो.

  PMLA किंवा UAPA सारख्या विशेष कायद्यांखाली निर्माण केलेल्या खास न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका अतिशय महत्त्वाच्या असतात. हे खटले चालवायला खास न्यायाधीश निवडले जातात. यामुळे या न्यायाधीशांवर सार्वजनिक महत्त्व असलेल्या प्रकरणांचा प्रकाशझोत पडतो. सरकारच्या मनमानी आदेशांना विरोध करत, लोकांच्या निदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे जामीन मंजूर होत नसल्याचे आपल्याला दिसते. अगदी उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीही अशा खटल्यात जामीन मंजूर करायला नाखुश दिसतात. काही खास कायद्यांत जामिनासाठी कडक तरतुदी करण्यात आल्य आहेत, हेही त्याचे एक कारण असू शकेल. उच्च स्तरावरील न्यायालयीन नेमणुकीच्या प्रक्रियेत सरन्यायाधीश सरकारबरोबर विचारविनिमय करतात कायदेमंडळ आणि न्यायपालिका यात चार हात अंत असलं पाहिजे, असा संकेत आहे. उच्च न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीला बांधील असलेल्य न्यायाधीशांच्या नेमणुका मुळीच होता कामा नयेत. य संस्थात्मक चौकटीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो या सगळ्या व्यवस्थेतच आमूलाग्र बदल करण्याच गरज आहे. निकाल देताना बढतीविषयक विचार मना असतील तर कोणता न्यायाधीश आपले कर्तव्र निःपक्षपातीपणाने बजावू शकेल? कनिष्ठ न्यायालयातील नेमणूक, बढती आणि बदली यांचे अधिकार सरकारकडू काढून घेऊन उच्च न्यायालयांकडे सुपुर्द करण्यामागचं तार्किकता आजही तितकीच प्रस्तुत आहे. बदल झाल असेल तर तो इतकाच की, नियंत्रणाचे अधिकार आत कार्यकारी मंडळाकडून न्यायमंडळाच्या हाती आलेत.

 सुप्त किंवा स्पष्ट बाह्य प्रभावापासून न्यायसंस्थेल मुक्त करण्याचे उपाय शोधण्याची आवश्यकता आहे कोणाहीबद्दल भय वा विशेष प्रीती न बाळगता, आपल मत व्यक्त करण्याची क्षमता न्यायाधीशांपाशी असण हाच न्यायव्यवस्थेचा गाभा आहे. जनतेच्या मनातील न्यायाधीश आणि न्यायव्यवस्था यांच्याबद्दलच्या पुरेपू विश्वासाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्याला जाणार बारीकसाही तडा आपल्या लोकशाहीचा पाया डळमळी करू शकतो.