शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बाल्यावस्थेतील आसाम...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 10:15 IST

आसाम सरकार, तिथले मुख्यमंत्री आणि प्रशासन सारेच बाल्यावस्थेत असल्याप्रमाणे हा सामाजिक प्रश्न हाताळून अनेक समस्या गरीब वर्गापुढे उभे करीत आहोत. बालविवाह रोखणे आवश्यक आहेच.

बालविवाह ही समस्या देशात नवीन नाही. मुलगी पाळण्यात असताना विवाह लावून देण्यापासून आपण आता मुलींच्या विवाहाचे वय अठरा आणि मुलांचे एकवीस करण्याचा कायदा करण्यापर्यंत वाटचाल केली आहे. बालविवाह प्रथेविरुद्ध संघर्ष केला आहे. तरीदेखील दोन शतकांच्या सुधारणानंतर आसामसारख्या राज्यातील एकतीस टक्के विवाह बालविवाह प्रकारात मोडतात. परिणामी बालमृत्यू आणि माता मृत्यूंचे प्रमाण आसाममध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक  आहे. सुमारे एकतीस टक्के (हजारात एकतीस) बालमृत्यू होतात. मध्य प्रदेशात हेच प्रमाण ४३ टक्के आहे. ही अत्यंत चिंतनीय बाब आहे.

उत्तरेकडील बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा आदी राज्यांमध्ये सामाजिक सुधारणांचा परिणाम कमीच जाणवतो. तशीच स्थिती पूर्व भारतातील आसामची  आहे. यावर धडक कारवाई करण्याचा निर्णय आसाम सरकारने २३ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यासाठी खूप आग्रही आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर लगेच आदेश निघाले आणि बालविवाह करणाऱ्या आणि ते लावणाऱ्यांना अटक करण्याची मोहीम सुरू झाली. तीन दिवसात ४ हजार ७४ गुन्हे दाखल करीत २ हजार ४४१ जणांना अटक करण्यात आली.  यातील बहुतांश त्या मुलींचे पती आहेत. त्यांना तुरुंगात टाकण्यात आल्याने कष्ट करून जगणाऱ्या या  कुटुंबांची उपासमार होण्याची वेळ आली आहे. अनेक विवाहित मुली माता झाल्या आहेत. त्यांना सांभाळणारे कोणी नाही. त्या अशिक्षित असल्याने आवश्यक कागदपत्रे जमवून पतीला जामीन मिळविता येत नाही. काही मुलींना सुधारगृहात धाडण्यात आले आहे. वास्तविक बालविवाह घडल्याची माहिती  मिळताच संबंधितांना नोटीस देऊन तपास करावा, बालविवाह करण्यात आल्याचे कागदोपत्री सिद्ध झाल्यावरच कारवाई करावी त्याशिवाय अटक करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आसाम सरकार, तिथले मुख्यमंत्री आणि प्रशासन सारेच बाल्यावस्थेत असल्याप्रमाणे हा सामाजिक प्रश्न हाताळून अनेक समस्या गरीब वर्गापुढे उभे करीत आहोत. बालविवाह रोखणे आवश्यक आहेच. त्यातून बाल आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी करता येतेच; शिवाय जन्माला येणारी मुले आरोग्यदायी असतील यासाठी बालविवाह रोखले पाहिजेत. आसाम सरकारने अशा मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे, याचा अभ्यास करून त्या शालेय तसेच माध्यमिक शिक्षण घेऊ शकतील याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार पातळीवर आणि सामाजिक संस्थांचा आधार घेऊन बालविवाह विरोधी जाणीव जागृती केली पाहिजे. आसाममध्ये  बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६मध्ये लागू करण्यात आला तरी त्याची अंमलबजावणी होत नव्हती, हे आता स्पष्टच दिसते आहे. हे राज्य सरकारच्या प्रशासनाचे मोठे अपयश आहे. शिवाय या जोडीला शिक्षणाचा प्रसार करणे, मुलींना शिक्षणासाठी सवलती देणे आदींवर भर दिला पाहिजे होता. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी ही कारवाईची मोहीम २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकापर्यंत चालेल, असे म्हटले आहे. सामाजिक सुधारणांसाठी कोणत्याही मोहिमेचा निवडणुकांशी कोणता संबंध असू शकतो? ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

काही जणांच्या आरोपानुसार बालविवाह सर्व जाती-धर्मामध्ये कमी अधिक प्रमाणात असताना अल्पसंख्याक समाजातील बालविवाह करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली आहे. त्यांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यामध्ये अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावरून सरकारच्या हेतूमागे राजकीय गणितेदेखील मांडलेली दिसतात. अन्यथा मुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारचे वक्तव्य झाले नसते. जात-धर्माचा विचार न करता बालविवाह होण्यापूर्वी ते रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. विनाचौकशी थेट अटक करून पुरुषांना तसेच लग्ने  लावणाऱ्यांना  तुरुंगात टाकून दहशत निर्माण करण्याने प्रश्न सुटणार नाहीत. समाजात विनाकारण गैरसमज निर्माण होतील. कायद्याची कायमच अंमलबजावणी झाली पाहिजे. इतक्या मोठ्या संख्येने बालविवाह होत असताना प्रशासनाने कायद्याची बूज राखण्यासाठी त्याची अंमलबजावणी का केली नाही? त्याबद्दल कोणाला जबाबदार धरण्यात येणार आहे ? कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आसामचे प्रशासनच बाल्यावस्थेत आहे, असे या प्रकरणावरून वाटू लागले आहे.

टॅग्स :Assamआसामmarriageलग्न