शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

बाल्यावस्थेतील आसाम...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 10:15 IST

आसाम सरकार, तिथले मुख्यमंत्री आणि प्रशासन सारेच बाल्यावस्थेत असल्याप्रमाणे हा सामाजिक प्रश्न हाताळून अनेक समस्या गरीब वर्गापुढे उभे करीत आहोत. बालविवाह रोखणे आवश्यक आहेच.

बालविवाह ही समस्या देशात नवीन नाही. मुलगी पाळण्यात असताना विवाह लावून देण्यापासून आपण आता मुलींच्या विवाहाचे वय अठरा आणि मुलांचे एकवीस करण्याचा कायदा करण्यापर्यंत वाटचाल केली आहे. बालविवाह प्रथेविरुद्ध संघर्ष केला आहे. तरीदेखील दोन शतकांच्या सुधारणानंतर आसामसारख्या राज्यातील एकतीस टक्के विवाह बालविवाह प्रकारात मोडतात. परिणामी बालमृत्यू आणि माता मृत्यूंचे प्रमाण आसाममध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक  आहे. सुमारे एकतीस टक्के (हजारात एकतीस) बालमृत्यू होतात. मध्य प्रदेशात हेच प्रमाण ४३ टक्के आहे. ही अत्यंत चिंतनीय बाब आहे.

उत्तरेकडील बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा आदी राज्यांमध्ये सामाजिक सुधारणांचा परिणाम कमीच जाणवतो. तशीच स्थिती पूर्व भारतातील आसामची  आहे. यावर धडक कारवाई करण्याचा निर्णय आसाम सरकारने २३ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यासाठी खूप आग्रही आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर लगेच आदेश निघाले आणि बालविवाह करणाऱ्या आणि ते लावणाऱ्यांना अटक करण्याची मोहीम सुरू झाली. तीन दिवसात ४ हजार ७४ गुन्हे दाखल करीत २ हजार ४४१ जणांना अटक करण्यात आली.  यातील बहुतांश त्या मुलींचे पती आहेत. त्यांना तुरुंगात टाकण्यात आल्याने कष्ट करून जगणाऱ्या या  कुटुंबांची उपासमार होण्याची वेळ आली आहे. अनेक विवाहित मुली माता झाल्या आहेत. त्यांना सांभाळणारे कोणी नाही. त्या अशिक्षित असल्याने आवश्यक कागदपत्रे जमवून पतीला जामीन मिळविता येत नाही. काही मुलींना सुधारगृहात धाडण्यात आले आहे. वास्तविक बालविवाह घडल्याची माहिती  मिळताच संबंधितांना नोटीस देऊन तपास करावा, बालविवाह करण्यात आल्याचे कागदोपत्री सिद्ध झाल्यावरच कारवाई करावी त्याशिवाय अटक करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आसाम सरकार, तिथले मुख्यमंत्री आणि प्रशासन सारेच बाल्यावस्थेत असल्याप्रमाणे हा सामाजिक प्रश्न हाताळून अनेक समस्या गरीब वर्गापुढे उभे करीत आहोत. बालविवाह रोखणे आवश्यक आहेच. त्यातून बाल आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी करता येतेच; शिवाय जन्माला येणारी मुले आरोग्यदायी असतील यासाठी बालविवाह रोखले पाहिजेत. आसाम सरकारने अशा मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे, याचा अभ्यास करून त्या शालेय तसेच माध्यमिक शिक्षण घेऊ शकतील याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार पातळीवर आणि सामाजिक संस्थांचा आधार घेऊन बालविवाह विरोधी जाणीव जागृती केली पाहिजे. आसाममध्ये  बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६मध्ये लागू करण्यात आला तरी त्याची अंमलबजावणी होत नव्हती, हे आता स्पष्टच दिसते आहे. हे राज्य सरकारच्या प्रशासनाचे मोठे अपयश आहे. शिवाय या जोडीला शिक्षणाचा प्रसार करणे, मुलींना शिक्षणासाठी सवलती देणे आदींवर भर दिला पाहिजे होता. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी ही कारवाईची मोहीम २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकापर्यंत चालेल, असे म्हटले आहे. सामाजिक सुधारणांसाठी कोणत्याही मोहिमेचा निवडणुकांशी कोणता संबंध असू शकतो? ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

काही जणांच्या आरोपानुसार बालविवाह सर्व जाती-धर्मामध्ये कमी अधिक प्रमाणात असताना अल्पसंख्याक समाजातील बालविवाह करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली आहे. त्यांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यामध्ये अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावरून सरकारच्या हेतूमागे राजकीय गणितेदेखील मांडलेली दिसतात. अन्यथा मुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारचे वक्तव्य झाले नसते. जात-धर्माचा विचार न करता बालविवाह होण्यापूर्वी ते रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. विनाचौकशी थेट अटक करून पुरुषांना तसेच लग्ने  लावणाऱ्यांना  तुरुंगात टाकून दहशत निर्माण करण्याने प्रश्न सुटणार नाहीत. समाजात विनाकारण गैरसमज निर्माण होतील. कायद्याची कायमच अंमलबजावणी झाली पाहिजे. इतक्या मोठ्या संख्येने बालविवाह होत असताना प्रशासनाने कायद्याची बूज राखण्यासाठी त्याची अंमलबजावणी का केली नाही? त्याबद्दल कोणाला जबाबदार धरण्यात येणार आहे ? कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आसामचे प्रशासनच बाल्यावस्थेत आहे, असे या प्रकरणावरून वाटू लागले आहे.

टॅग्स :Assamआसामmarriageलग्न